शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

शेतकऱ्यांसाठी समुपदेशन कक्ष

By admin | Updated: November 27, 2015 02:45 IST

राज्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमध्ये विशेष समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

पहिला टप्पा : प्रेरणा प्रकल्प-शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमयवतमाळ : राज्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमध्ये विशेष समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये यवतमाळ, अकोला, नांदेड, औरंगाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांमध्ये उपजिल्हा रुग्णालयात तर अमरावती, बीड, बुलडाणा, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, परभणी, वाशीम व वर्धा या नऊ जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्णालयात विशेष समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात विशेष समुपदेशन केंद्रासह, आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत मार्गदर्शन तसेच कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आदींचा समावेश आहे. आकस्मिकता निधीतील अग्रीमामधून ही योजना राबविण्यात येत असून या प्रकल्पास ‘प्रेरणा प्रकल्प-शेतकरी समुपदेशन आरोग्य सेवा कार्यक्रम’ असे संबोधण्यात येणार आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ७.६५६६ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. यामध्ये कंत्राटी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. समुपदेशन तज्ञ, चिकित्सालयीन समुपदेशन तज्ञ, समुपदेशन सामाजिक कार्यकर्ता, परिचारीका, लेखापाल आदी पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. सोबतच समुपदेशन कक्षातील पायाभूत सुविधा, वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, वाहन, १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचे सर्वेक्षण, आजाराचे वर्गीकरण, आशा कार्यकर्ती, गट प्रवर्तक यांना मानसिक आरोग्य व राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेचे प्रशिक्षण आदींसह इतरही उपक्रम राबविले जाणार आहेत. थेट सबंधित जिल्ह्यात समुपदेशन केंद्र सुरू होत असल्यामुळे याचा लाभ निश्चितच होणार आहे. शेतकऱ्यांना योग्य व वेळेवर मार्गदर्शन उपलब्ध होऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केल्यास शेतकरी आत्महत्या थांबतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. (प्रतिनिधी)