शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मुुख्यालयात कापसाचे दर पाडले

By admin | Updated: December 18, 2015 02:51 IST

खासगी बाजारात कापसाचे दर ४४०० रूपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. मात्र यवतमाळच्या बाजारात कापसाचे दर ४२०० रूपये क्विंटलपर्यंत मर्यादित राहिले आहे.

नियंत्रण सुटले : यवतमाळात ४२०० तर, इतरत्र ४४०० रूपये रूपेश उत्तरवार यवतमाळखासगी बाजारात कापसाचे दर ४४०० रूपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. मात्र यवतमाळच्या बाजारात कापसाचे दर ४२०० रूपये क्विंटलपर्यंत मर्यादित राहिले आहे. यामध्ये क्विंटलमागे २०० रूपयांची तफावत आहे. शेतकऱ्यांची यातून अक्षरश: लूट होत आहे. मात्र त्यावर चाप लावण्यात सहकार विभागाला सपशेल अपयश आले आहे. कापूस विक्रीसाठी येणारे वाहन थेट व्यापाऱ्यांच्या दारात पोहोचत आहे. यामुळे बाजार समितीचा सेस बुडला आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १६ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यामध्ये १० लाख क्विंटल कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याची नोंद झाली आहे. खेडा खरेदीच्या माध्यमातून जिल्ह्यात हजारो क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे, याची नोंद नाही. जिल्हा मुख्यालयात परवाना नसताना अनेक व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केली आहे. या खरेदीला आता उधाण आले आहे. कापसाची विक्री करण्यासाठी बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी बोली बोलण्याचा सहकारचा नियम आहे. प्रत्यक्षात बाजार समितीच्या आवारात कापसाची बोली लावली जात नाही. खासगी व्यापारी परस्पर जिनात कापूस घेऊन जातात. याची नोंद बाजार समितीकडे होत नाही. विशेष म्हणजे, बोली न लागल्याने व्यापारी मनमानी दराने कापसाची खरेदी करतात. हा प्रकार राजरोसपणे सुरू झाला आहे. पणनची वाहने केवळ त्याला अपवाद ठरली आहेत. या गंभीर प्रकाराने बाजार समितीचा सेस दररोज बुडत आहे. याच संधीचा फायदा परवाना न घेतलेल्या व्यापाऱ्यांनी घेतला आहे. कुठलीही शासकीय प्रक्रिया न करता हे व्यापारी जिल्ह्याच्या ठिकाणी परस्पर कापसाची खरेदी करीत आहेत. यातून कापूस उत्पादकांची अक्षरश: लूट सुरू झाली आहे. खासगी बाजारात कापसाचे दर ४३०० रूपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. यवतमाळमध्ये ३९०० ते ४२०० पर्यंत कापसाची खरेदी सुरू केली आहे. यवतमाळ वगळता लगतचे तालुके अमरावती, अचलपूर, धामणगाव या ठिकाणी कापसाचे दर ४३०० रूपये क्विंटलपर्यंत आहेत. यामध्ये क्विंटलमागे २०० ते ३०० रूपयांची तफावत आहे. लगतच्या तालुक्यांपेक्षा यवतमाळात अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. जिल्हा मुुख्यालयात शेतकऱ्यांची लूट होत असताना सहकार विभाग आणि बाजार समिती गप्प आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. जागतिक बाजारात कापसाची मागणी वाढल्यानंतर खासगी बाजारात कापसाचे दर वाढले. मात्र यवतमाळात कापसाचे जुनेच दर शेतकऱ्यांवर लादले जात आहे.