शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीने कॉटन इंडस्ट्री अडचणीत, कापसाचे उत्पादन निम्मे घटले, शेतक-यांचे कंबरडे मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:38 IST

कापसाला मिळणारा अत्यल्प हमीभाव दरवर्षी गाजतो. पण ही लूटही कमी वाटावी इतका गंभीर हल्ला यंदा बोंडअळीने केला आहे. हिरव्यागार बोंडाकडे पाहून शेतकरी खूश होते. पण बोंड फोडून पाहिले तर, प्रत्येक बोंडात अळी.

- राजेश निस्ताने यवतमाळ : कापसाला मिळणारा अत्यल्प हमीभाव दरवर्षी गाजतो. पण ही लूटही कमी वाटावी इतका गंभीर हल्ला यंदा बोंडअळीने केला आहे. हिरव्यागार बोंडाकडे पाहून शेतकरी खूश होते. पण बोंड फोडून पाहिले तर, प्रत्येक बोंडात अळी. आता फवारणी करूनही कापूस पिकविण्याची संधी नाही. उभ्या झाडांचे मरण पाहणे एवढेच शेतकºयाच्या हाती उरले आहे. त्याचा मोठा फटका कॉटन इंडस्ट्रीजलाही सहन करावा लागत आहे. बोंडअळी रोखण्यासाठी केलेल्या फवारणीने विदर्भातील ५० पेक्षा अधिक शेतकरी-शेतमजूर मरण पावले, ते वेगळेच.बोंडअळीच्या हल्ल्याची व्याप्ती विदर्भ, मराठवाडा व तेलंगणापर्यंत आहे. देशातील सर्वाधिक टेक्सटाईल इंडस्ट्रीज दक्षिणेत आहेत. त्या इंडस्ट्रीजला नेहमीच यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक लांबी व तलम असलेल्या कापसाची प्रतीक्षा असते. परंत बोंडअळीमुळे गुणवत्ता घसरल्यामुळे त्यांनी यवतमाळच्या कापसाकडे पाठ फिरविली आहे. त्याचा फटका खासगी जिनिंग-प्रेसिंग व्यावसायिकांनाही बसतो आहे. विदर्भात ४०० पेक्षा अधिक खासगी जिनिंग-प्रेसिंग असून त्यातील शंभरहून अधिक जिनिंग बंद आहेत. सध्या शेतकºयांच्या हाती जो कापूस येतोय त्याची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. कवडी, किडक, बारक बोंड याचा सामना करावा लागत आहे. शेतकºयांकडून विक्रीसाठी येणारा कापूस दर्जेदार नाही, कीडयुक्त कापसापासून तयार झालेल्या रूईगाठी निर्यात योग्य नाहीत. हा माल विक्री करताना जिनिंग व्यावसायिकांच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे भविष्यात कापसाला भाव वाढण्याची चिन्हे नाहीत. सद्यस्थितीत चांगल्या कापसाला अधिकाधिक ४६०० रुपयापर्यंत भाव मिळत आहे.बोगस बिटीमुळे चांगले बियाणे वांद्यातराज्यात काही भागात स्वस्तात मिळणाºया बोगस बिटीचा पेरा झाला. या बोगस बिटीवर बोंडअळीचे आक्रमण झाले. नंतर याच अळ्यांनी नामांकीत बिटी बियाण्यांवरही हल्ला चढविला. ही बोंडअळी जमिनीत रुजली असून पुढच्या वर्षीसुद्धा कपाशीवर बोंडअळीचा हल्ला होण्याची शक्यता आहे.दरवर्षी फरदड कापूस निघत असल्याने फेब्रुवारी-मार्चपर्यंत शेतकरी प्रतीक्षा करतात. परंतु यावर्षी डिसेंबर अखेरच पºहाटीच्या शेताची उलंगवाडी (हंगाम संपणे) करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. अर्थात शेतकºयांचा कापसाचा सिझन यंदा डिसेंबरमध्येच संपणार आहे.बोंडअळीने कापसाची गुणवत्ताच संपविली. त्यामुळे अशा कापसापासून तयार होणाºया रूईगाठींना दक्षिणेत मागणीच नाही. टेक्सटाईल इंडस्ट्रीजकडून मालाला उठावच नसल्याने विदर्भातील खासगी कॉटन उद्योग संकटात सापडले आहेत. बोंडअळीचा कृषी खात्याने आत्ताच बंदोबस्त करणे अपेक्षित आहे. अन्यथा पुढच्या वर्षी खरीप हंगामात पुन्हा बोंडअळीचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- नौशाद काराणी, संचालक,खासगी जिनिंग-प्रेसिंग, यवतमाळबोंडअळीच्या आक्रमणामुळे कापसाचे सरासरी उत्पन्न आणि गुणवत्ताही घटली आहे. पुढील वर्षी या अळीचे आक्रमण होऊ नये म्हणून यंदा शेतक-यांनी फरदड घेऊ नये, यासाठी कृषी विभाग जनजागृती करीत आहे.- सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावतीउत्पादन अर्ध्यावर : राज्यात ४० लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड होते. यंदा हे क्षेत्र २५ टक्क्याने वाढले आहे. त्यापैकी अर्ध्या क्षेत्रावर बोंडअळीचा हल्ला आहे. बोंडअळीमुळे कापसाचे सरासरी उत्पादन घटले असून ते अर्ध्यावरच येण्याची शक्यता आहे. काही भागात तर संपूर्ण पºहाटीच उपटून फेकण्याची दुर्दैवी वेळ शेतक-यांवर आली आहे.

टॅग्स :cottonकापूस