शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

यंदाही कापसाची शेती आतबट्ट्याची

By admin | Updated: October 21, 2015 02:50 IST

यंदाच्या खरीप हंगामातील प्रतिकूल हवामान आणि अस्थिर बाजार भावामुळे सोयाबीनसह कापसाची शेती

उत्पन्नात घट : शेतकरी हवालदिल, सोयाबीनच्या उतारीतही आली घटशिंदोला : यंदाच्या खरीप हंगामातील प्रतिकूल हवामान आणि अस्थिर बाजार भावामुळे सोयाबीनसह कापसाची शेती आतबट्ट्याची ठरवण्याचा अंदाज शिंदोला, शिरपूर परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहे.यावर्षीच्या हंगामात सुरूवातीला मृग नक्षत्रात पावसाला समाधानकारक सुरूवात झाली. त्यामुळे २० जूनपूर्वी साधारणत: सर्वच खरीप पिकांच्या पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र अनियमित आणि खंडित पावसामुळे कपाशी व सोयाबीन पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी जिवाचा आटापिटा करून भारनियमनाला तोंड देत पिकांना जगविले. परंतु उत्तरा नक्षत्रात गणेश चतुर्थीच्या पर्वावर वादळी वाऱ्यासह २४ तासांपेक्षा अधिक काळ पडलेल्या पावसाने कपाशी जमीनदोस्त झाली. परिणामी फळधारणा झालेल्या कपाशीचे प्रचंड नुकसान झाले आहे.निसर्गाच्या या लहरीपणामुळे उत्पादकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. परंतु दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी होणार असल्याचे शेतकरी सांगत आहे. एकूणच चित्र लक्षात घेता कोरडवाहू कापसाच्या उत्पादनात निम्म्याने, तर बागायती कपासाच्या उत्पादनात ३० टक्यांनी घट होण्याचा अंदाज शिंदोला येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत. भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्यामुळे बागायती कपाशी जगविण्याच्या बाबतीतही पुढे जाऊन अडचणी उभ्या राहू शकतात. त्यातच कापसाच्या अल्प भावामुळे उत्पादन खर्च भरून निघतो किंवा नाही, याबद्दल शेतकरी चिंतीत आहे. सोबतच पणन महासंघासह सीसीआयच्या माध्यमातून कापूस खेरदी सुरू करण्यात येते. मात्र दसरा, दिवाळी जवळ येत असताना संबंधित यंत्रणेकडून कोणत्याच हालचाली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्याची मागणी येथील सरपंच संजय निखाडे, परमडोहचे उपसरपंच संदीप थेरे यांनी केली आहे. (वार्ताहर)