शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही कापसाची शेती आतबट्ट्याची

By admin | Updated: October 21, 2015 02:50 IST

यंदाच्या खरीप हंगामातील प्रतिकूल हवामान आणि अस्थिर बाजार भावामुळे सोयाबीनसह कापसाची शेती

उत्पन्नात घट : शेतकरी हवालदिल, सोयाबीनच्या उतारीतही आली घटशिंदोला : यंदाच्या खरीप हंगामातील प्रतिकूल हवामान आणि अस्थिर बाजार भावामुळे सोयाबीनसह कापसाची शेती आतबट्ट्याची ठरवण्याचा अंदाज शिंदोला, शिरपूर परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहे.यावर्षीच्या हंगामात सुरूवातीला मृग नक्षत्रात पावसाला समाधानकारक सुरूवात झाली. त्यामुळे २० जूनपूर्वी साधारणत: सर्वच खरीप पिकांच्या पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र अनियमित आणि खंडित पावसामुळे कपाशी व सोयाबीन पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी जिवाचा आटापिटा करून भारनियमनाला तोंड देत पिकांना जगविले. परंतु उत्तरा नक्षत्रात गणेश चतुर्थीच्या पर्वावर वादळी वाऱ्यासह २४ तासांपेक्षा अधिक काळ पडलेल्या पावसाने कपाशी जमीनदोस्त झाली. परिणामी फळधारणा झालेल्या कपाशीचे प्रचंड नुकसान झाले आहे.निसर्गाच्या या लहरीपणामुळे उत्पादकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. परंतु दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी होणार असल्याचे शेतकरी सांगत आहे. एकूणच चित्र लक्षात घेता कोरडवाहू कापसाच्या उत्पादनात निम्म्याने, तर बागायती कपासाच्या उत्पादनात ३० टक्यांनी घट होण्याचा अंदाज शिंदोला येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत. भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्यामुळे बागायती कपाशी जगविण्याच्या बाबतीतही पुढे जाऊन अडचणी उभ्या राहू शकतात. त्यातच कापसाच्या अल्प भावामुळे उत्पादन खर्च भरून निघतो किंवा नाही, याबद्दल शेतकरी चिंतीत आहे. सोबतच पणन महासंघासह सीसीआयच्या माध्यमातून कापूस खेरदी सुरू करण्यात येते. मात्र दसरा, दिवाळी जवळ येत असताना संबंधित यंत्रणेकडून कोणत्याच हालचाली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्याची मागणी येथील सरपंच संजय निखाडे, परमडोहचे उपसरपंच संदीप थेरे यांनी केली आहे. (वार्ताहर)