शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

कापूस व सोयाबीनवर मंदीचे सावट

By admin | Updated: October 27, 2014 22:44 IST

कापसाची व सोयाबीन या नगदी पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दगा दिला. यात दशकातील सर्वात कमी उत्पन होत आहे. अशाच स्थितीत बाजारपेठेमध्ये कापूरस व सोयाबीन

यवतमाळ : कापसाची व सोयाबीन या नगदी पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दगा दिला. यात दशकातील सर्वात कमी उत्पन होत आहे. अशाच स्थितीत बाजारपेठेमध्ये कापूरस व सोयाबीन मंदीच्या सावाटात सापडले आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने आश्वासीत हमीभावने दोन्ही पिकांची खरेदी करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. हमीभावापेक्षा कमी भावात व्यापारी माल घेत आहे. एकीकडे उत्पन जेमतेम ३० टक्के होत असतांना लागवडीचा खर्च दुपटीने वाढला आहे. पहिलेच कर्जबाजारी असलेले शेतकरी उपासमारीला तोंड देत आहे. अशा कठीण समयी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी लागवड खर्च आणि त्यावर ५० टक्के नफा या प्रमाणे हमीभाव देऊन कापसाची व सोयाबीनची खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. आता आश्वासनाचा विसर पडल्याचे दिसून येते. विदर्भातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी भाजपला लोकसभेत व विधानसभेत खुला पाठींबा देणारे विदर्भ जन आंदोलन समितीचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे . जगात कापसाचे भाव प्रती पौंड १३४ सेंट वरून ६६ सेंटवर आले आहे. चीनसुद्धा भारताच्या कापसाची आवक ५० टक्के कमी करणार या मंदीच्या वातावरणात विदर्भातील कापुस उत्पादक शेतकरी नडला जाणार आहे. दोन महिन्यात विदर्भात ३०० च्या वर तर यावर्षी ९०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. मागील लोकसभेत महायुतीने लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव व संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन सत्ता काबीज केली होती. मात्र आज कोणताही नेता यावर बोलत नाही यामुळे शेतकरी फसवल्यागेल्या सारखे झाले आहे. मोदींनी तत्काळ महाराष्ट्राच्या शेती संकटावर दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी तिवारी यांनी केली आहे. सोयाबीन सोंगण्यापूर्वीच भूईसपाट झाल्याचे दिसत आहे. तर कापसाची बोंडे गळून पडली आहे. या परिस्थितीतून वाचण्यासाठी शेतकरी ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र कृषी फिडरवरील २२ तासाचे भारनियमन यावरही पाणी फेरत आहे, निसर्ग प्रकोप शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. मृग आणि रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. उशिरा आलेल्या पावसाने पेरणी उशिरा झाली. सर्वाधिक फटका बसला तो सोयाबीनला व कापूस या नगदी पिकाला मात्र पावसाचा लपंडाव सुरूच होता. त्यामुळे आधीच कुपोषित असलेले पीक रोगाला बळी पडले. शेंगा हिरव्या अवस्थेत असतानाच सोयाबीनची पानगळ झाली. सोयाबीनच्या झाडाला पाने नाही आणि अपरिपक्व शेंगा दिसत आहे. अशा स्थितीत काही शेतकरी रात्री बे रात्री जाऊन ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही शक्य होत नाही. वीज वितरणपुढे शेतकऱ्यांनी आता हात टेकले आहे, मात्र शेतकऱ्यांचा . कोणीच वाली दिसत नाही अशा अडचणीत शेतकऱ्यांना पंतप्रधानांनीच मदतीचा हात द्यावा, अशी आशा मागणी विदर्भ जनआंदोलन समितीकडून करण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)