शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कोरोनाचे रुग्ण चारशेच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

यवतमाळ शहर व जिल्ह््यात कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना व पोलिसांच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे शनिवारी सायंकाळी यवतमाळात दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याकडून रानडे यांनी विविध मुद्यांवर आढावा घेतला.

ठळक मुद्देअ‍ॅक्टिव्ह १२२ । २० रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारीसुद्धा जिल्ह्यात २० जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून यात १३ पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ४१७ झाली आहे. तर १२२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले दोन जण उपचारानंतर बरे झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.शनिवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांमध्ये यवतमाळ शहरातील तायडेनगर येथील एक पुरुष व एक महिला, लहान वडगाव येथील तीन पुरुष व दोन महिला आणि यवतमाळ येथील आणखी एक महिला यांचा समावेश आहे. दिग्रस शहरातील बालाजीनगर येथील एक पुरुष, बाराभाई मोहल्ला येथील एक महिला, देवनगर येथील एक महिला तसेच दिग्रस येथील सहा पुरुष, पुसद शहरातील गांधी वॉर्ड येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील शास्त्री वॉर्ड येथील एक पुरुष आणि पुसद येथील एका महिलेचा समावेश आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शनिवारी एकूण ३०६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० पॉझिटिव्ह, २६८ निगेटिव्ह तर १८ नमुन्यांचे अचूक निदान झाले नाही. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१७ आहे. यापैकी २८७ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत १४ मृत्यू झाले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी ८० नमुने तपासणीकरिता पाठविले.पोलीस महानिरीक्षक दाखलयवतमाळ शहर व जिल्ह््यात कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना व पोलिसांच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे शनिवारी सायंकाळी यवतमाळात दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याकडून रानडे यांनी विविध मुद्यांवर आढावा घेतला. जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये गुन्हे शाबिती व शिक्षेचे प्रमाण गेल्या तीन वर्षात तीन पटीने वाढल्याच्या निमित्ताने रानडे यांनी समाधान व्यक्त केले.परिक्षेत्रातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे मकरंद रानडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या