शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

कोरोना घेऊन आलेले अखेर दिल्लीला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

दीड महिन्यांपासून दिल्ली येथून ११ जण धामणगाव रेल्वे मार्गे यवतमाळात दाखल झाले होते. त्यांनी बाभूळगाव, सावर, नेर येथेही भेटी दिल्या होत्या. या ११ पैकी आठ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. भोसा परिसरात त्यांचे वास्तव्य होते. तेथूनच त्या भागात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे मानले जाते. कोरोनाबाधित या आठ जणांवर गेली महिनाभरा उपचार करण्यात आले.

ठळक मुद्दे‘मरकज’चे आठ पॉझिटिव्ह झाले निगेटिव्ह : उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालच्या नागरिकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिल्लीतील मरकजच्या संमेलनाला हजेरी लावून जिल्ह्यात दाखल झालेल्या व येताना सोबत कोरोना आजार घेऊन आलेल्या परप्रांतीय नागरिकांना शुक्रवारी अखेर दिल्लीला रवाना करण्यात आले. त्यामध्ये उत्तरप्रदेश व पश्चिम बंगालच्या नागरिकांचाही समावेश आहे.दीड महिन्यांपासून दिल्ली येथून ११ जण धामणगाव रेल्वे मार्गे यवतमाळात दाखल झाले होते. त्यांनी बाभूळगाव, सावर, नेर येथेही भेटी दिल्या होत्या. या ११ पैकी आठ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. भोसा परिसरात त्यांचे वास्तव्य होते. तेथूनच त्या भागात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे मानले जाते. कोरोनाबाधित या आठ जणांवर गेली महिनाभरा उपचार करण्यात आले. या पॉझिटिव्ह परप्रांतीय नागरिकांचे नमुने आता निगेटिव्ह आले आहे. कोरोनामुक्त झाल्याने या आठ जणांसह ११ जणांना शुक्रवारी बडनेरा रेल्वे मार्गे दिल्लीकडे रवाना करण्यात आले. तेथून ते पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेशाला आपल्या गावी जाणार आहेत.वास्तविक दिल्लीच्या मरकज कनेक्शनचे एकूण २२ लोक आढळून आले होते. त्यापैकी ११ जण रवाना झाले. उर्वरित ११ जण पश्चिम बंगालचे असून त्यांनाही पुढील तीन-चार दिवसात आपल्या गावी रवाना केले जाणार आहे. या ११ पैकी एकाची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले जाते.कोरोनाबाबत एकूणच जिल्ह्यात दिलासादायक चित्र आहे. सुरुवातीला मुंबई, पुण्यानंतर यवतमाळातच कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे यवतमाळ अचानक देशाच्या नकाशावर चमकले.भोसा येथे उद्रेक झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली होती. एवढेच नव्हे तर नेर व उमरखेड तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला होता. परंतु आता कोरोना संसर्ग सध्यातरी जिल्ह्यात नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. प्रशासन व शासकीय यंत्रणेचे परिश्रम, नागरिकांची जागरुकता, व्यापारी-व्यावसायिकांचा संयम याला हे संपूर्ण श्रेय दिले जात आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा शंभरवर गेला आहे. परंतु त्यातील रुग्ण पॉझिटिव्हमधून निगेटिव्हमध्ये येत आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा वेग चांगला आहे. सध्या ४५ बाधितांवर उपचार सुरू आहे.५५ जण झाले कोरोनामुक्त, आता केवळ ४५ बाधितांवर उपचारजिल्ह्यात अचानक वाढलेला कोरोना गेल्या आठवडाभरापासून चांगलाच नियंत्रणात आला आहे. ५५ जण कोरोनामुक्त झाले आहे. आता केवळ ४५ जण बाधित म्हणून उपचार घेत आहे. तेसुद्धा लवकरच कोरोनामुक्त होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी सतत जागरुक राहून दाखविलेला संयम फायद्याचा ठरल्याचे मानले जाते. नागरिकांनी घरात राहून लॉकडाऊनचे काटेकोर पालन केल्यानेच आज जिल्ह्याने कोरोनासारख्या महामारीवर मात केल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या