शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

कोरोना घेऊन आलेले अखेर दिल्लीला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

दीड महिन्यांपासून दिल्ली येथून ११ जण धामणगाव रेल्वे मार्गे यवतमाळात दाखल झाले होते. त्यांनी बाभूळगाव, सावर, नेर येथेही भेटी दिल्या होत्या. या ११ पैकी आठ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. भोसा परिसरात त्यांचे वास्तव्य होते. तेथूनच त्या भागात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे मानले जाते. कोरोनाबाधित या आठ जणांवर गेली महिनाभरा उपचार करण्यात आले.

ठळक मुद्दे‘मरकज’चे आठ पॉझिटिव्ह झाले निगेटिव्ह : उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालच्या नागरिकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिल्लीतील मरकजच्या संमेलनाला हजेरी लावून जिल्ह्यात दाखल झालेल्या व येताना सोबत कोरोना आजार घेऊन आलेल्या परप्रांतीय नागरिकांना शुक्रवारी अखेर दिल्लीला रवाना करण्यात आले. त्यामध्ये उत्तरप्रदेश व पश्चिम बंगालच्या नागरिकांचाही समावेश आहे.दीड महिन्यांपासून दिल्ली येथून ११ जण धामणगाव रेल्वे मार्गे यवतमाळात दाखल झाले होते. त्यांनी बाभूळगाव, सावर, नेर येथेही भेटी दिल्या होत्या. या ११ पैकी आठ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. भोसा परिसरात त्यांचे वास्तव्य होते. तेथूनच त्या भागात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे मानले जाते. कोरोनाबाधित या आठ जणांवर गेली महिनाभरा उपचार करण्यात आले. या पॉझिटिव्ह परप्रांतीय नागरिकांचे नमुने आता निगेटिव्ह आले आहे. कोरोनामुक्त झाल्याने या आठ जणांसह ११ जणांना शुक्रवारी बडनेरा रेल्वे मार्गे दिल्लीकडे रवाना करण्यात आले. तेथून ते पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेशाला आपल्या गावी जाणार आहेत.वास्तविक दिल्लीच्या मरकज कनेक्शनचे एकूण २२ लोक आढळून आले होते. त्यापैकी ११ जण रवाना झाले. उर्वरित ११ जण पश्चिम बंगालचे असून त्यांनाही पुढील तीन-चार दिवसात आपल्या गावी रवाना केले जाणार आहे. या ११ पैकी एकाची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले जाते.कोरोनाबाबत एकूणच जिल्ह्यात दिलासादायक चित्र आहे. सुरुवातीला मुंबई, पुण्यानंतर यवतमाळातच कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे यवतमाळ अचानक देशाच्या नकाशावर चमकले.भोसा येथे उद्रेक झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली होती. एवढेच नव्हे तर नेर व उमरखेड तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला होता. परंतु आता कोरोना संसर्ग सध्यातरी जिल्ह्यात नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. प्रशासन व शासकीय यंत्रणेचे परिश्रम, नागरिकांची जागरुकता, व्यापारी-व्यावसायिकांचा संयम याला हे संपूर्ण श्रेय दिले जात आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा शंभरवर गेला आहे. परंतु त्यातील रुग्ण पॉझिटिव्हमधून निगेटिव्हमध्ये येत आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा वेग चांगला आहे. सध्या ४५ बाधितांवर उपचार सुरू आहे.५५ जण झाले कोरोनामुक्त, आता केवळ ४५ बाधितांवर उपचारजिल्ह्यात अचानक वाढलेला कोरोना गेल्या आठवडाभरापासून चांगलाच नियंत्रणात आला आहे. ५५ जण कोरोनामुक्त झाले आहे. आता केवळ ४५ जण बाधित म्हणून उपचार घेत आहे. तेसुद्धा लवकरच कोरोनामुक्त होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी सतत जागरुक राहून दाखविलेला संयम फायद्याचा ठरल्याचे मानले जाते. नागरिकांनी घरात राहून लॉकडाऊनचे काटेकोर पालन केल्यानेच आज जिल्ह्याने कोरोनासारख्या महामारीवर मात केल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या