शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुसद शहरामध्ये कोरोना विषाणूचे तांडव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

रविवारी एकाच दिवशी १५ रुग्णांची भर पडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या १५ जणांच्या संपर्कातील १२० नागरिकांची त्वरित रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. याशिवाय १४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी ९० जणांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविले जाणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देरविवारी १५ रुग्णांची भर : १२० नागरिकांची रॅपिड टेस्ट, १४० जण क्वारंटाईन, ५२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व परिसरात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. एकट्या रविवारी १५ रुग्णांची भर पडली. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली. तर एकूण बाधितांची संख्या ७० झाली आहे. बाधितांच्या संपर्कातील १४० नागरिक क्वारंटाईन आहे.रविवारी एकाच दिवशी १५ रुग्णांची भर पडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या १५ जणांच्या संपर्कातील १२० नागरिकांची त्वरित रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. याशिवाय १४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी ९० जणांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविले जाणार असल्याची माहिती आहे.शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. शनिवारी उशिरा रात्री ८ जणांचे तर रविवारी ७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. रामनगरमधील १०० व पत्रे ले-आऊटमधील २८ अशा १२८ जणांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी सांगितले. तंत्रज्ञ पंकज आडे, भाऊ वाघमारे, स्वाती फुके, शिव डाखोरे आदींचे पथक ही तपासणी करीत आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने प्रशासनावरील ताणही वाढत आहे. नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे. मात्र अनेकजण अद्यापही बिनधास्त वावरताना दिसत आहे. त्यामुळे पुढील काळात कठोर उपाययोजनांची गरज आहे.दुकाने उघडू नयेकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलावे. भाजीपाला, दूध, फळे आणि किराणा दुकाने उघडण्यापूर्वी टेस्ट करण्यात यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करीत आहे. दरम्यान, २१ ते २५ जुलैपर्यंत शहरातील कापड व रेडीमेड दुकाने बंद राहणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय गजबी, सचिव नरेंद्र माजरा यांनी सांगितले आहे.तिन्ही आमदार लॉकडाऊनसाठी आग्रहीआमदार इंद्रनील नाईक, आमदार अ‍ॅड.नीलय नाईक आणि आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यातून त्यांनी सात ते १० दिवसांचा कठोर लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी केली. या पत्रावरून सात ते दहा दिवसांच्या लॉकडाऊनसंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या