शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

पुसद शहरामध्ये कोरोना विषाणूचे तांडव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

रविवारी एकाच दिवशी १५ रुग्णांची भर पडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या १५ जणांच्या संपर्कातील १२० नागरिकांची त्वरित रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. याशिवाय १४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी ९० जणांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविले जाणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देरविवारी १५ रुग्णांची भर : १२० नागरिकांची रॅपिड टेस्ट, १४० जण क्वारंटाईन, ५२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व परिसरात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. एकट्या रविवारी १५ रुग्णांची भर पडली. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली. तर एकूण बाधितांची संख्या ७० झाली आहे. बाधितांच्या संपर्कातील १४० नागरिक क्वारंटाईन आहे.रविवारी एकाच दिवशी १५ रुग्णांची भर पडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या १५ जणांच्या संपर्कातील १२० नागरिकांची त्वरित रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. याशिवाय १४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी ९० जणांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविले जाणार असल्याची माहिती आहे.शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. शनिवारी उशिरा रात्री ८ जणांचे तर रविवारी ७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. रामनगरमधील १०० व पत्रे ले-आऊटमधील २८ अशा १२८ जणांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी सांगितले. तंत्रज्ञ पंकज आडे, भाऊ वाघमारे, स्वाती फुके, शिव डाखोरे आदींचे पथक ही तपासणी करीत आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने प्रशासनावरील ताणही वाढत आहे. नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे. मात्र अनेकजण अद्यापही बिनधास्त वावरताना दिसत आहे. त्यामुळे पुढील काळात कठोर उपाययोजनांची गरज आहे.दुकाने उघडू नयेकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलावे. भाजीपाला, दूध, फळे आणि किराणा दुकाने उघडण्यापूर्वी टेस्ट करण्यात यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करीत आहे. दरम्यान, २१ ते २५ जुलैपर्यंत शहरातील कापड व रेडीमेड दुकाने बंद राहणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय गजबी, सचिव नरेंद्र माजरा यांनी सांगितले आहे.तिन्ही आमदार लॉकडाऊनसाठी आग्रहीआमदार इंद्रनील नाईक, आमदार अ‍ॅड.नीलय नाईक आणि आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यातून त्यांनी सात ते १० दिवसांचा कठोर लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी केली. या पत्रावरून सात ते दहा दिवसांच्या लॉकडाऊनसंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या