शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

कोरोना पाॅझिटिव्ह दीडशेच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 05:00 IST

गुरुवारी झालेल्या चार मृत्यूंपैकी दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. बाभूळगाव तालुक्यातील ६१ वर्षीय महिला व ७२ वर्षीय पुरूषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात महागाव तालुक्यातील ५२ वर्षीय पुरूष आणि पुसद तालुक्यातील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या १४४ जणांमध्ये ९२ पुरुष आणि ५२ महिला आहेत.

ठळक मुद्देविषाणूची चांगली घसरगुंडी : १४४ नवे रुग्ण, चार मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेले काही दिवस जिल्ह्याला जेरीस आणणाऱ्या कोरोना विषाणूची घसरगुंडी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. आठवडाभरापासून नव्या रुग्णांची संख्या घटत असताना गुरुवारी नव्या पाॅझिटिव्हचा आकडा दीडशेच्याही खाली म्हणजे १४४ इतकाच नोंदविला गेला. तर दहाहून अधिक बळींचा सपाटाही थंडावला असून गुरुवारी चार बळी नोंदविले गेले. दरम्यान २८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांनी अजूनही निष्काळजीपणे फिरणे धोक्याचे ठरू शकते.गुरुवारी झालेल्या चार मृत्यूंपैकी दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. बाभूळगाव तालुक्यातील ६१ वर्षीय महिला व ७२ वर्षीय पुरूषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात महागाव तालुक्यातील ५२ वर्षीय पुरूष आणि पुसद तालुक्यातील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या १४४ जणांमध्ये ९२ पुरुष आणि ५२ महिला आहेत. यात आर्णी येथील ५, बाभूळगाव येथील ७, दारव्हा येथील १९, दिग्रस येथील २०, घाटंजी येथील ४, कळंब येथील २, महागाव येथील १, मारेगाव येथील ४, नेर येथील ६, पांढरकवडा १, पुसद येथील १७, राळेगाव १, उमरखेड ४, वणी येथील २२, यवतमाळ २९, झरी जामणी १ आणि इतर शहरातील १ रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.  

पाच हजारांवर अहवाल निगेटिव्ह जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त आकडेवारीनुसार, गुरुवारी एकूण ५२९६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४४ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ५१५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात २२६१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १०६४ रुग्णालयात भरती आहेत. तर ११९७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१ हजार ४२६ झाली आहे. २४ तासात २८९ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६७ हजार ४२० आहे. तर जिल्ह्यात एकूण १७४५ मृत्यूची नोंद आहे.

सहा लाखांवर चाचण्या, सव्वापाच लाख निगेटिव्हजिल्हयात आतापर्यत सहा लाख दोन हजार ४६३ चाचण्या झाल्या. त्यापैकी पाच लाख २९ हजार ७४२ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.८६ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.७२ आहे. तर मृत्युदर २.४४ इतका आहे. मृत्यूदर अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे काळजी कायम आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या