शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पाॅझिटिव्ह दीडशेच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 05:00 IST

गुरुवारी झालेल्या चार मृत्यूंपैकी दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. बाभूळगाव तालुक्यातील ६१ वर्षीय महिला व ७२ वर्षीय पुरूषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात महागाव तालुक्यातील ५२ वर्षीय पुरूष आणि पुसद तालुक्यातील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या १४४ जणांमध्ये ९२ पुरुष आणि ५२ महिला आहेत.

ठळक मुद्देविषाणूची चांगली घसरगुंडी : १४४ नवे रुग्ण, चार मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेले काही दिवस जिल्ह्याला जेरीस आणणाऱ्या कोरोना विषाणूची घसरगुंडी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. आठवडाभरापासून नव्या रुग्णांची संख्या घटत असताना गुरुवारी नव्या पाॅझिटिव्हचा आकडा दीडशेच्याही खाली म्हणजे १४४ इतकाच नोंदविला गेला. तर दहाहून अधिक बळींचा सपाटाही थंडावला असून गुरुवारी चार बळी नोंदविले गेले. दरम्यान २८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांनी अजूनही निष्काळजीपणे फिरणे धोक्याचे ठरू शकते.गुरुवारी झालेल्या चार मृत्यूंपैकी दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. बाभूळगाव तालुक्यातील ६१ वर्षीय महिला व ७२ वर्षीय पुरूषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात महागाव तालुक्यातील ५२ वर्षीय पुरूष आणि पुसद तालुक्यातील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या १४४ जणांमध्ये ९२ पुरुष आणि ५२ महिला आहेत. यात आर्णी येथील ५, बाभूळगाव येथील ७, दारव्हा येथील १९, दिग्रस येथील २०, घाटंजी येथील ४, कळंब येथील २, महागाव येथील १, मारेगाव येथील ४, नेर येथील ६, पांढरकवडा १, पुसद येथील १७, राळेगाव १, उमरखेड ४, वणी येथील २२, यवतमाळ २९, झरी जामणी १ आणि इतर शहरातील १ रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.  

पाच हजारांवर अहवाल निगेटिव्ह जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त आकडेवारीनुसार, गुरुवारी एकूण ५२९६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४४ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ५१५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात २२६१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १०६४ रुग्णालयात भरती आहेत. तर ११९७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१ हजार ४२६ झाली आहे. २४ तासात २८९ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६७ हजार ४२० आहे. तर जिल्ह्यात एकूण १७४५ मृत्यूची नोंद आहे.

सहा लाखांवर चाचण्या, सव्वापाच लाख निगेटिव्हजिल्हयात आतापर्यत सहा लाख दोन हजार ४६३ चाचण्या झाल्या. त्यापैकी पाच लाख २९ हजार ७४२ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.८६ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.७२ आहे. तर मृत्युदर २.४४ इतका आहे. मृत्यूदर अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे काळजी कायम आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या