शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

कोरोनाने वर्षभरात बाटविले 50 हजार नागरिकांचे जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST

गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायमच आहे. त्यातच मंगळवारी कोरोनामुळे आणखी २५ जणांचा जीव गेला. तर जिल्ह्यात एक हजार नागरिकांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांचा आकडा ५० हजारांच्या पार गेला आहे. तर जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही सात हजारांच्यावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ११८२ जणांचा मृत्यू झाला. 

ठळक मुद्देमंगळवारी २५ मृत्यू : एक हजार बाधित, ॲक्टिव्ह रुग्ण ७ हजारांवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायमच आहे. त्यातच मंगळवारी कोरोनामुळे आणखी २५ जणांचा जीव गेला. तर जिल्ह्यात एक हजार नागरिकांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांचा आकडा ५० हजारांच्या पार गेला आहे. तर जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही सात हजारांच्यावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ११८२ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६४, ६५, ७२, ७५ वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील ५३ वर्षीय पुरुष, नेर येथील ७७ वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील ४०  व ६० वर्षीय पुरुष, केळापूर येथील ४५ वर्षीय पुरुष व ४९ वर्षीय महिला, कळंब येथील ६० व ७५ वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील ७७ वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील ६०वर्षीय  पुरुष, दारव्हा तालुक्यातील ७८ वर्षीय  पुरुष, आर्णी तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष, आर्णी शहरातील ५० वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील ६७ वर्षीय  पुरुष, घाटंजी तालुक्यातील ७० वर्षीय  महिला आणि वर्धा येथील ६४ वर्षीय  महिलेचा समावेश आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये पुसद येथील ६९ वर्षीय पुरुष तर खासगी रुग्णालयात यवतमाळ येथील  ५२ व ६६ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ७३ वर्षीय पुरुष, वणी येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मंगळवारी पाॅझिटिव्ह आलेल्या एक हजार जणांमध्ये ५९३ पुरुष तर ४०७ महिला आहे. यात यवतमाळ येथील ३०१, मारेगाव ११०, घाटंजी १०६, पांढरकवडा ८०, दिग्रस ७०, पुसद ६६, वणी ५३, नेर ४९, बाभूळगाव ४२, आर्णी ३३, झरी ३०, कळंब २२, महागाव ११, दारव्हा १०, उमरखेड ९, राळेगाव २ तर अन्य शहरातील सहा रुग्णांचा समावेश आहे. तीन लाख ९३ हजार ८१८ अहवाल आले असून ६०२९ अप्राप्त आहे.  तीन लाख ४३ हजार ६८६ नमुने निगेटिव्ह आले.  

४१ हजार ७९२ रुग्ण झाले कोरोनामुक्त  जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पाच हजार ६०८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४६०८ निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात सात हजार १५८ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. त्यातील दोन हजार ६९० जण रुग्णालयात भरती आहे. तर चार हजार ४६८ रुग्ण गृहविलगीकरणात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांचा आकडा ५० हजार १३२ झाला. मंगळवारी ५२० जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४१ हजार ७९२ झाली आहे.  

 मंगळवारी २० जणांचा मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला.चार मृत्यू खासगी रुग्णालयात तर एक मृत्यू डीसीएचसीमध्ये झाला.  जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी तर १२.५४ तर मृत्यू दर २.३६ आहे.