शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

कोरोनाने वर्षभरात बाटविले 50 हजार नागरिकांचे जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST

गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायमच आहे. त्यातच मंगळवारी कोरोनामुळे आणखी २५ जणांचा जीव गेला. तर जिल्ह्यात एक हजार नागरिकांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांचा आकडा ५० हजारांच्या पार गेला आहे. तर जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही सात हजारांच्यावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ११८२ जणांचा मृत्यू झाला. 

ठळक मुद्देमंगळवारी २५ मृत्यू : एक हजार बाधित, ॲक्टिव्ह रुग्ण ७ हजारांवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायमच आहे. त्यातच मंगळवारी कोरोनामुळे आणखी २५ जणांचा जीव गेला. तर जिल्ह्यात एक हजार नागरिकांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांचा आकडा ५० हजारांच्या पार गेला आहे. तर जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही सात हजारांच्यावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ११८२ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६४, ६५, ७२, ७५ वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील ५३ वर्षीय पुरुष, नेर येथील ७७ वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील ४०  व ६० वर्षीय पुरुष, केळापूर येथील ४५ वर्षीय पुरुष व ४९ वर्षीय महिला, कळंब येथील ६० व ७५ वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील ७७ वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील ६०वर्षीय  पुरुष, दारव्हा तालुक्यातील ७८ वर्षीय  पुरुष, आर्णी तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष, आर्णी शहरातील ५० वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील ६७ वर्षीय  पुरुष, घाटंजी तालुक्यातील ७० वर्षीय  महिला आणि वर्धा येथील ६४ वर्षीय  महिलेचा समावेश आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये पुसद येथील ६९ वर्षीय पुरुष तर खासगी रुग्णालयात यवतमाळ येथील  ५२ व ६६ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ७३ वर्षीय पुरुष, वणी येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मंगळवारी पाॅझिटिव्ह आलेल्या एक हजार जणांमध्ये ५९३ पुरुष तर ४०७ महिला आहे. यात यवतमाळ येथील ३०१, मारेगाव ११०, घाटंजी १०६, पांढरकवडा ८०, दिग्रस ७०, पुसद ६६, वणी ५३, नेर ४९, बाभूळगाव ४२, आर्णी ३३, झरी ३०, कळंब २२, महागाव ११, दारव्हा १०, उमरखेड ९, राळेगाव २ तर अन्य शहरातील सहा रुग्णांचा समावेश आहे. तीन लाख ९३ हजार ८१८ अहवाल आले असून ६०२९ अप्राप्त आहे.  तीन लाख ४३ हजार ६८६ नमुने निगेटिव्ह आले.  

४१ हजार ७९२ रुग्ण झाले कोरोनामुक्त  जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पाच हजार ६०८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४६०८ निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात सात हजार १५८ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. त्यातील दोन हजार ६९० जण रुग्णालयात भरती आहे. तर चार हजार ४६८ रुग्ण गृहविलगीकरणात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांचा आकडा ५० हजार १३२ झाला. मंगळवारी ५२० जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४१ हजार ७९२ झाली आहे.  

 मंगळवारी २० जणांचा मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला.चार मृत्यू खासगी रुग्णालयात तर एक मृत्यू डीसीएचसीमध्ये झाला.  जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी तर १२.५४ तर मृत्यू दर २.३६ आहे.