शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

कोरोनाचा झाला उद्रेक, संयमाचा लावला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठेवर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच शुक्रवारी रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ७ पर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश आहेत. परंतु, जिल्हाभरात लाॅकडाऊन नको म्हणून प्रशासनाकडे निवेदनांचा खच पडत आहे. असे असताना शनिवार व रविवारी संपूर्ण संचारबंदीला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो की नाही, याबाबत साशंकता होती.

ठळक मुद्देलाॅकडाऊनला स्वयंस्फूर्त प्रतिसाद : बाजारपेठ बंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, हे अपघात टाळणारे ब्रीदवाक्य कोरोनाची साखळी तोडण्यासाठीही प्रभावी असल्याचे नागरिकांनी आता ओळखले आहे. त्यामुळेच शनिवारी लाॅकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, कुठेही पोलिसांचा ससेमिरा नसतानाही नागरिकांनी स्वत:हून गर्दी टाळत प्रशासनाच्या कर्फ्यूला जनता कर्फ्यूचे रूप दिल्याची प्रचिती आली. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठेवर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच शुक्रवारी रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ७ पर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश आहेत. परंतु, जिल्हाभरात लाॅकडाऊन नको म्हणून प्रशासनाकडे निवेदनांचा खच पडत आहे. असे असताना शनिवार व रविवारी संपूर्ण संचारबंदीला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो की नाही, याबाबत साशंकता होती. प्रत्यक्षात ही शंका खोटी ठरवित नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोर पालन केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यासाठी कुठेही पोलीस बंदोबस्त दिसून आला नाही. तरीही संचारबंदीचे उल्लंघन झाले नाही, हे विशेष. शुक्रवारी रात्री ८ वाजता बाजारपेठ बंद झाल्यावर ती थेट सोमवारीच उघडली जाणार, हे माहीत असूनही नागरिकांनी शुक्रवारीही दुकानांमध्ये गर्दी केली नाही. कोरोनाला रोखायचे असेल, तर प्रत्येकाने थोडी कळ सोसलीच पाहिजे, हे सामंजस्य यवतमाळकरांनी दाखविल्याने प्रशासनालाही दिलासा मिळाला. शनिवारी बसस्थानक चौक, नेताजी मार्केट, दत्त चौक, आर्णी रोड, गोधणी रोड, दाते काॅलेज चौक, बाजार समिती चौक, पोस्ट ऑफिस चौक, तिरंगा चौक, एसबीआय चौक, सिव्हिल लाइन आदी नेहमी गजबजणारे परिसर शनिवारी दिवसभ चिडीचूप होते. अत्यावश्यक कामासाठी आलेल्या मोजक्या माणसांशिवाय रस्त्यावर चिटपाखरूही फिरकले नाही. आता हाच संयम नागरिकांनी रविवारीही दाखविण्याची गरज आहे, शिवाय दोन दिवसांच्या बंदनंतर सोमवारी सकाळी काही दुकाने उघडताच एकदम गर्दी होणार नाही, याचीही काळजी घेण्याची गरज आहे.संचारबंदीतही अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने आणि दूध विक्रीला मुभा देण्यात आली आहे. मात्र शनिवारी संभ्रमातून या दुकानदारांनीही दुकाने उघडली नाही. मात्र नागरिकांच्या सोईसाठी त्यांना रविवारी दुकाने उघडता येणार आहे.  

इतरांसोबत अत्यावश्यक सेवेचीही दुकाने बंद शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत ६० तासांची संचारबंदी जाहीर करताना जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवांना सूट दिली होती. अत्यावश्यक सेवांची दुकाने या संचारबंदीतही सुरू ठेवणे शक्य होते. मात्र अनेक दुकानदारांनी शनिवारी अत्यावश्यक सेवा असूनही दुकाने बंद ठेवल्याचे दिसून आले. पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स, दवाखाने या सेवा वगळता इतर दुकाने शनिवारी बंद होती. दूधविक्रेते, फळविक्रेते यांचा समावेश प्रशासनाने अत्यावश्यक सेवांमध्ये केला आहे. तरीही ही दुकाने बंद होती. ग्राहकांनाच फिरण्यासाठी बंदी आहे, तर दुकाने सुरू ठेवून करायचे काय, असा सवाल या व्यावसायिकांनी उपस्थित केला.

जिल्ह्यात बस वाहतूक सुरळीत सुरू होती एकीकडे संचारबंदी असतानाही सार्वजनिक वाहतूक मात्र सुरू होती. परिवहन महामंडळाच्या ग्रामीण बसफेऱ्या नियोजित वेळेनुसार दिवसभर धावल्या. विशेष म्हणजे, या गाड्या भरूनही गेल्या. त्यामुळे संचारबंदी असतानाही प्रवासी नेमके कोणत्या कारणासाठी जात-येत होते, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, ग्रामीण भागातून यवतमाळात येणारे बहुतांश प्रवासी हे दवाखान्याच्या कारणासाठी आले होते, तर यवतमाळातील अनेक प्रवासी दोन दिवसांची सुटी मूळ गावी घालविण्यासाठी खेड्याकडे निघाल्याचे स्पष्ट झाले.  

 बायपास मार्गावर कुठेही ‘अडवणूक’ नाही यवतमाळ शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास मार्गावर सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत सुरू होती. जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित विचारपूस वगळता, पोलिसांकडून इतर कोणत्याही वाहनांची ‘अडवणूक’ केली गेली नाही. संचारबंदीच्या नावाखाली कोणत्याही दुचाकी चालकाला अडविण्यात आले नाही. पांढरकवडा मार्गावरील चौकी, लोहारा परिसर येथे वळण मार्गावर मुक्त संचार सुरू होता. 

  संध्याकाळी मात्र मुक्त संचार !  दिवसभर नागरिकांनी संचारबंदीचे तंतोतंत पालन केले. मात्र, संध्याकाळ होताच अनेकांनी घराबाहेर पाऊल टाकले. त्यामुळे दिवसभराच्या संचारबंदीला नागरिकांच्या संयमासोबतच सूर्याचा कोपही कारणीभूत ठरला. सायंकाळ होताच अनेक चहा टपऱ्याही उघडल्या अन् अनेक शौकिनांनी घोटही घेतला. शहराच्या अंतर्गत भागात तर सायंकाळी तरुणांनी चक्क गल्ली क्रिकेटचा आनंदही लुटला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या