शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

ढाणकी येथे कोरोनाचा ब्लास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:40 IST

शहरातील खासगी दवाखाने रुग्णांनी खाचाखच भरले आहे. कोणता रुग्ण साधा आणि कोणता कोरोनाचा, हे ओळखणे कठीण झाल्याने सर्व रुग्णांकडे ...

शहरातील खासगी दवाखाने रुग्णांनी खाचाखच भरले आहे. कोणता रुग्ण साधा आणि कोणता कोरोनाचा, हे ओळखणे कठीण झाल्याने सर्व रुग्णांकडे संशयाने पहिले जात आहे. शहरात सध्या मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. परिसरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गळा खवखवणे, अंग दुखणे, सर्दी, ताप अशा दुखण्याने अनेक जण ग्रस्त आहेत. त्यामुळे प्रत्येकाला कोरोना झाला की काय, अशी भीती वाटत आहे. येथील नगरपंचायत नव्यानेच स्थापन झाल्याने नवीन नगरसेवकांनासुद्धा काय करावे आणि आपली जबाबदारी काय, हे कळेनासे झाले आहे.

काही नगरसेवक सोडले, तर उर्वरितांनी आपल्या प्रभागात जनजागृतीही केली नाही. केवळ सोशल मीडियावर चर्चा करण्यातच ते धन्यता मानत आहे. त्यामुळे जनतेत रोष व्यक्त होत आहे. मुख्याधिकारीसुद्धा मुख्यालयी न राहता अपडाऊन करण्यात. त्यामुळे त्यांचेही सपशेल दुर्लक्ष होत आहे. सध्या शहरात जनजागृती करणे गरजेचे आहे. बाजारपेठ बंद असून नागरिक आपापल्या घरी बसून आहे. कोरोनाच्या धास्तीने प्रत्येकाला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे. गेल्या चार दिवसांपासून कोणी ना कोणी मृत्यूच्या जबड्यात सापडत आहे. काही नागरिक कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुढे येत नसल्याने पॉझिटिव्ह असणारेसुद्धा घरामध्ये दडून बसले आहे. या सर्व गंभीर बाबींवर नगरपंचायतीकडून उपाययोजना होणे गरजेचे आहे.

उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी ढाणकीतील वाढती रुग्णसंख्या पाहता लक्ष ठेवून आहे. आरोग्य विभागानेही लक्ष देऊन शहरातील प्रत्येक नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याची गरज आहे. अन्यथा शहरांमध्ये कोरोनाचे तांडव होऊन मृतांची संख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. नगरपंचायतीने आपली जबाबदारी ओळखून आणि आपसी मतभेद दूर करून गावाच्या हितासाठी काही ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.