शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

सहकारी दूध उत्पादक संस्थांना टाळे

By admin | Updated: September 29, 2014 23:12 IST

दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या महागाव तालुक्यासह जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थांना कायमचे टाळे लागले. त्यामुळे आता ग्रामीण भागातही पाकिटाचे दूध शहरातून आणावे लागत असून

रितेश पुरोहित - महागाव दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या महागाव तालुक्यासह जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थांना कायमचे टाळे लागले. त्यामुळे आता ग्रामीण भागातही पाकिटाचे दूध शहरातून आणावे लागत असून पॅकेजमधून शेतकऱ्यांना अनुदानावर आलेल्या दुधाळ जनावरांचाही उपयोग शून्य होत आहे. परिणामी दुधाची गरज भागविण्यासाठी खासगी डेअरींवर अवलंबून राहावे लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यात २५ ते ३० वर्षांपूर्वी दुधाची गंगा वाहात होती. जिल्ह्यात ७१२ दूध उत्पादक सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली होती. त्यातील ४० संस्था महागाव तालुक्यात होत्या. गावागावातून दूध संकलित होऊन शासकीय योजनेला दिले जात होते. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय असलेल्या दूध उत्पादनातून मोठे पैसे मिळत होते. मात्र अंतर्गत राजकारण आणि खासगी डेअरींचे चढते भाव यातून सहकारी संस्था डबघाईस आल्या. जिल्ह्यातील ५४ संस्था अवसायनात निघाल्या तर ४४५ संस्था कायमच्या बंद झाल्या आहे. यामुळे यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी आपले दूध खासगी डेअरींना देणे सुरू केले आहे. जिल्ह्याची दुधाची गरज पाच लाख लिटर आणि महागाव तालुक्यातील ३० हजार लिटर दुधाची दररोजची गरज आहे. परंतु एवढे दूध सध्या तालुक्यात निर्माणच होत नाही. त्यामुळे शहरातून येणाऱ्या पाकिटातील दुधावर अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यात २ लाख १२ हजार हेक्टर जंगल क्षेत्र असून महागाव तालुक्यात ४० हजार हेक्टरवर जंगल आहे. पाणी, चारा आणि इतर सुविधा सर्व उपलब्ध आहे. अशा स्थितीतही दूध उत्पादन वाढताना दिसत नाही. शेकडोंनी असणारी गावागावातील जनावरेही आता कमी होताना दिसत आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे दुधाळ गाई, म्हशी असायच्या. परंतु चाराटंचाई व इतर कारणांनी जनावरांची संख्या घटत गेली. अनेक शेतकऱ्यांकडे तर नाहीच्या बरोबरीच जनावरे आहेत. त्यामुळे ज्यांच्या घरी दुधाची गंगा वाहात होती त्या शेतकऱ्यांनाही आता पाकिटातून दूध आणावे लागत आहे.