शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

तंटामुक्त समित्यांचे गावांवरील नियंत्रण सुटले

By admin | Updated: October 15, 2015 03:01 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या व पोलीस विभागातील समन्वयाअभावी पुरस्कारप्राप्त गावात आता वाद निर्माण होत असून या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटले आहे.

पुसद : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या व पोलीस विभागातील समन्वयाअभावी पुरस्कारप्राप्त गावात आता वाद निर्माण होत असून या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटले आहे. तसेच गावात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले असून पुरस्कारप्राप्त गावांचेच आता सर्वेक्षण करण्याची वेळ आली आहे.गावात उद्भवणाऱ्या लहानसहान तंट्यांचे मोठ्या भांडणात रूपांतर होवू नये, गावातील वाद गावातच सोडविला जावा, वेळ आणि पैशाची बचत व्हावी, गावात सामाजिक सलोखा व शांतता टिकावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. तंटामुक्त गाव समिती आणि पोलिसांच्या सहकार्यातून अनेक गावातून अवैध व्यवसायांचे उच्चाटन झाले. गावात शांतता व सुव्यवस्था नांदू लागली. परंतु आता या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटल्याचे दिसत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीनुसार काम करणाऱ्या तंटामुक्त समित्यांना लोकसंख्येच्या निकषावर पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार राशी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होताच तंटामुक्त समिती व नियंत्रकांचा ग्रामपंचायत कमिटीला विसर पडला. त्यांना विश्वासात न घेता सरपंच, सचिवांनी निकष धाब्यावर बसवून नियमबाह्य खर्च करणे सुरू केले. या प्रकारामुळे तंटामुक्त समित्यांची गावावरील पकड सैल झाली. गावात पुन्हा अवैध धंदे फोफावू लागले. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय केला जात आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वच मटका, जुगार, दारू आदींच्या मागे लागले आहे. यातून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गावात भानगडीही निर्माण होत आहे.पुरस्कारप्राप्त गावांचीच ही अवस्था असेल तर इतर गावांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आता पुरस्कारप्राप्त गावांचे सर्वेक्षण पुन्हा करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातून गाव समित्यांना पुन्हा ऊर्जा मिळेल आणि नव्या दमाने काम करण्याची संधी निर्माण होईल. (तालुका प्रतिनिधी)