शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

तंटामुक्त समित्यांचे गावांवरील नियंत्रण सुटले

By admin | Updated: October 15, 2015 03:01 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या व पोलीस विभागातील समन्वयाअभावी पुरस्कारप्राप्त गावात आता वाद निर्माण होत असून या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटले आहे.

पुसद : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या व पोलीस विभागातील समन्वयाअभावी पुरस्कारप्राप्त गावात आता वाद निर्माण होत असून या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटले आहे. तसेच गावात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले असून पुरस्कारप्राप्त गावांचेच आता सर्वेक्षण करण्याची वेळ आली आहे.गावात उद्भवणाऱ्या लहानसहान तंट्यांचे मोठ्या भांडणात रूपांतर होवू नये, गावातील वाद गावातच सोडविला जावा, वेळ आणि पैशाची बचत व्हावी, गावात सामाजिक सलोखा व शांतता टिकावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. तंटामुक्त गाव समिती आणि पोलिसांच्या सहकार्यातून अनेक गावातून अवैध व्यवसायांचे उच्चाटन झाले. गावात शांतता व सुव्यवस्था नांदू लागली. परंतु आता या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटल्याचे दिसत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीनुसार काम करणाऱ्या तंटामुक्त समित्यांना लोकसंख्येच्या निकषावर पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार राशी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होताच तंटामुक्त समिती व नियंत्रकांचा ग्रामपंचायत कमिटीला विसर पडला. त्यांना विश्वासात न घेता सरपंच, सचिवांनी निकष धाब्यावर बसवून नियमबाह्य खर्च करणे सुरू केले. या प्रकारामुळे तंटामुक्त समित्यांची गावावरील पकड सैल झाली. गावात पुन्हा अवैध धंदे फोफावू लागले. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय केला जात आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वच मटका, जुगार, दारू आदींच्या मागे लागले आहे. यातून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गावात भानगडीही निर्माण होत आहे.पुरस्कारप्राप्त गावांचीच ही अवस्था असेल तर इतर गावांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आता पुरस्कारप्राप्त गावांचे सर्वेक्षण पुन्हा करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातून गाव समित्यांना पुन्हा ऊर्जा मिळेल आणि नव्या दमाने काम करण्याची संधी निर्माण होईल. (तालुका प्रतिनिधी)