शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

घटनेतील तरतुदींमुळे समाज विकासाला हातभार

By admin | Updated: April 6, 2016 02:40 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दूरदृष्टीतून देशाच्या विकासासह सर्वसामान्य समाजासाठी राज्यघटनेत केलेल्या महत्वपूर्ण तरतुदींमुळे ...

जिल्हाधिकारी : राजपत्रित अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा, विविध विषयांवर झाले व्याख्यानयवतमाळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दूरदृष्टीतून देशाच्या विकासासह सर्वसामान्य समाजासाठी राज्यघटनेत केलेल्या महत्वपूर्ण तरतुदींमुळे समाजाच्या विकासाला हातभार लागला, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त येथील बचत भवनात आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र्र काटपल्लीवार, बांधकामचे अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजय साळवे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. नीती दवे आदी उपस्थित होते. समाजात समता निर्माण व्हावी यासाठी घटनेत अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. येथे सर्वांना समान अधिकार आहे. सर्वसमावेशक घटनेच्या निर्मितीसाठी बाबासाहेबांचे फार मोठे योगदान असल्याचे पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले. समाजात जातपात, भेदभाव होऊ नये तसेच सामान्य नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्यासोबतच देशात एकता, अखंडता, समृध्दता निर्माण करण्यासाठी घटनेचे फार मोठे योगदान असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. कलशेट्टी म्हणाले, समाजात समता निर्माण करण्यासाठी सर्वांना समान पातळीवर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असे सांगितले. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांचेही यावेळी भाषण झाले. प्रेम हनवते, प्रा.माधव सरकुंडे, अ‍ॅड.नरेंद्र मेश्राम, डॉ.छाया महाले यांचे विविध विषयांवर व्याख्यान झाले. समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजय साळवे यांनी प्रास्ताविक तर, संचालन घायवटे यांनी केले. (वार्ताहर)