शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

घटनेतील तरतुदींमुळे समाज विकासाला हातभार

By admin | Updated: April 6, 2016 02:40 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दूरदृष्टीतून देशाच्या विकासासह सर्वसामान्य समाजासाठी राज्यघटनेत केलेल्या महत्वपूर्ण तरतुदींमुळे ...

जिल्हाधिकारी : राजपत्रित अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा, विविध विषयांवर झाले व्याख्यानयवतमाळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दूरदृष्टीतून देशाच्या विकासासह सर्वसामान्य समाजासाठी राज्यघटनेत केलेल्या महत्वपूर्ण तरतुदींमुळे समाजाच्या विकासाला हातभार लागला, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त येथील बचत भवनात आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र्र काटपल्लीवार, बांधकामचे अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजय साळवे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. नीती दवे आदी उपस्थित होते. समाजात समता निर्माण व्हावी यासाठी घटनेत अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. येथे सर्वांना समान अधिकार आहे. सर्वसमावेशक घटनेच्या निर्मितीसाठी बाबासाहेबांचे फार मोठे योगदान असल्याचे पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले. समाजात जातपात, भेदभाव होऊ नये तसेच सामान्य नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्यासोबतच देशात एकता, अखंडता, समृध्दता निर्माण करण्यासाठी घटनेचे फार मोठे योगदान असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. कलशेट्टी म्हणाले, समाजात समता निर्माण करण्यासाठी सर्वांना समान पातळीवर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असे सांगितले. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांचेही यावेळी भाषण झाले. प्रेम हनवते, प्रा.माधव सरकुंडे, अ‍ॅड.नरेंद्र मेश्राम, डॉ.छाया महाले यांचे विविध विषयांवर व्याख्यान झाले. समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजय साळवे यांनी प्रास्ताविक तर, संचालन घायवटे यांनी केले. (वार्ताहर)