शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शासकीय निविदांवर कंत्राटदारांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 02:22 IST

१ जुलैपूर्वीपासून चालू असलेल्या बांधकामांवरही १८ टक्के जीएसटी कंत्राटदारांकडून वसूल करणे योग्य नाही.

कामबंद आंदोलन : चालू कामांवर १८ टक्के जीएसटी अन्यायकारकलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : १ जुलैपूर्वीपासून चालू असलेल्या बांधकामांवरही १८ टक्के जीएसटी कंत्राटदारांकडून वसूल करणे योग्य नाही. त्यामुळे याबाबत रोष व्यक्त करीत यवतमाळ जिल्हा कंत्राटदार संघटनेने शासकीय निविदा प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत कामबंद आंदोलनाचा एकमुखी निर्णयही घेण्यात आला.१ जुलैपासून केंद्र सरकारने जीएसटी करप्रणाली लागू केली आहे. जिल्हा कंत्राटदार संघटनेने जीएसटीचे स्वागतच केले. परंतु, १ जुलैपूर्वीच्या चालू करारनाम्यामध्ये जीएसटी या कराचा समावेश नाही. त्यामुळे कंत्राटदारांना हा कर भरणे शक्य नाही. त्यासाठी शासनाच्या अखत्यारितील बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व इतर विभागांना त्या करारनाम्यावर अतिरिक्त तरतूद करून कंत्राटदारांना न्याय द्यावा. हा पर्याय शक्य नसल्यास त्यासाठी अन्य काय मार्ग काढता येईल, याबाबत विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जुन्या कंत्राटदाराला १८ टक्के जीएसटी भरणे शक्य नाही. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून शासन निर्णय होईपर्यंत चालू असलेली कामे कंत्राटदाराला बंद करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. १ जुलैनंतर प्रसिद्ध होणाऱ्या निविदेमध्ये जीएसटी कराचा समावेश केल्याशिवाय निविदा भरणे शक्य नाही, असा निर्णय एकमताने शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष अरविंद वाढोणकर, सचिव अमित उत्तरवार, कोषाध्यक्ष शरद जुमळे, जगजितसिंग ओबेरॉय, बाबूपाटील गुघाणे, संजय चिद्दरवार, नरेंद्र गुघाणे, राहुल काळे, सचिन जिरापुरे, महेश घुले, संतोष झेंडे, प्रसाद दुबे, संजय येरावार, राजू बोरकर, शैलेश राठी, अमित जगताप, हेमंत अग्रवाल, प्रशांत पोटे, दीपक दुर्गे, सागर जेमनगुंडे, अरुण खोरकुंभे, गजू शिरसागर, गजानन भोयर, वासे, अमोल घोडमारे, आत्माराम मस्के आदी उपस्थित होते.ऐन पावसाळ्यात रस्त्यांना ब्रेकजिल्हा कंत्राटदार संघटनेच्या भूमिकेमुळे चालू बांधकामांसह नवीन कामांचे तीनतेरा वाजण्याची दाट शक्यता आहे. १८ टक्के नाहक जीएसटीचा भुर्दंड बसणार असल्याने कंत्राटदार वैतागले आहेत. आता शासन-प्रशासनाने तोडगा न काढल्यास जिल्ह्यातील संपूर्ण कामे ठप्प होतील. तर नवीन कामांच्या निविदा कंत्राटदार भरणारच नसल्याने नवीन कामेही होणार नाहीत. पावसाळ्यात नागरिकांच्या मागणीनंतर बऱ्याच रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. काहींच्या निविदाही काढण्याच्या हालचाली आहेत. मात्र, कंत्राटदारांच्या बहिष्कारामुळे नवे रस्ते होणे कठीण आहे.