शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

निरंतर शिक्षण अडगळीत

By admin | Updated: June 14, 2016 01:47 IST

एकेकाळी कर्मचाऱ्यांची वर्दळ असलेले निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालय आता अडगळीत पडले आहे. कर्मचाऱ्यांची वानवा

अविनाश साबापुरे ल्ल यवतमाळ एकेकाळी कर्मचाऱ्यांची वर्दळ असलेले निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालय आता अडगळीत पडले आहे. कर्मचाऱ्यांची वानवा असलेल्या या कार्यालयात आता उपक्रमांचीही टंचाई निर्माण झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शिक्षणाधिकारीच नसल्याने शिड तुटलेल्या जहाजासारखे हे कार्यालय अखेरच्या घटका मोजत आहे. शिक्षण विभाग म्हणताच, जिल्हा परिषद इमारतीतील प्राथमिक आणि गोधनी मार्गावरील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालय नजरेसमोर येते. मात्र, यासोबतच तितकेच महत्त्वाचे शिक्षणाधिकारी कार्यालयही यवतमाळात आहे. पण ते अगदीच कोपऱ्यात एका जुन्या ‘क्वार्टर’च्या दुर्दशा झालेल्या इमारतीत आहे. जुनाट झालेला फलक वाचल्यावरच कळते, हेही शिक्षणाधिकारी कार्यालयच!प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दिवसभर कर्मचारी, नागरिकांची वर्दळ असते. पण निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालयात कुणीच फिरकत नाही. सोमवारी या कार्यालयात तीन कर्मचारी बसलेले होते. वऱ्हांड्यात एक ‘पाशहीन श्वान’ निवांत निजलेले आणि परिसरात मरगळलेली शांतता. निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालयावर ही उपेक्षेची वेळ का आली, याचा शोध घेतला असता जिल्हा परिषदेकडेच अंगुलीनिर्देश झाला.पूर्वी या कार्यालयातून प्रौढ शिक्षणाच्या कामावर नियंत्रण ठेवले जायचे. रोज शेकडो नागरिकांची उठबस होत असे. पण काही वर्षांपूर्वी शासनाने यवतमाळ जिल्हा शंभर टक्के साक्षर झाल्याचा शोध लावून प्रौढ शिक्षणच बंद करून टाकले. आता जिल्ह्यात कुठेही रात्रीचे वर्ग भरत नाही. प्रौढ शिक्षण संपले अन् निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालयाचा सासूरवास सुरू झाला. कामेच नसल्याने येथे शिक्षणाधिकारी होण्यासही कोणी इच्छूक उरला नाही. २०१३ मध्ये डॉ. सुचिता पाटेकर येथे शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाल्या. मात्र, त्यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचाही प्रभार सोपविण्यात आला. निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालय पुन्हा उपेक्षितच राहिले. विशेष म्हणजे, डॉ. पाटेकर यांनी काही दिवसातच प्राथमिक शिक्षणाधिकारी पद स्वीकारले. त्यानंतर म्हणजे, २०१४ पासून निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालयातील क्लास वनची खुर्ची रिकामीच आहे. सध्या या कार्यालयाचा प्रभार प्राथमिक शिक्षणाधिकारी पाहात असल्या तरी खऱ्या अर्थाने केवळ क्लास थ्रीचे तीन कर्मचारीच येथे हजर असतात. पूर्वी हे कार्यालय तीन हजार रुपये भाड्याच्या इमारतीत होते. त्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याऐवजी एका जुन्या शासकीय क्वार्टमध्ये आता ते स्थानांतरित करण्यात आले आहे. हे क्वार्टर म्हणजे जुने पडके घर वाटावे. शिक्षणाधिकारी नाही, जिल्हा परिषदेकडून कुठलीही विचारपूस नाही, त्यात वेतनही नाही. अशा परिस्थितीमुळे हे कार्यालय आणि तेथील उणेपुरे कर्मचारी उपऱ्यासारखे कार्यालयात येतात आणि जातात. केवळ उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्याचा उपक्रम सुरू आहे.वास्तविक, हे कार्यालय अनुभवसंपन्न आहे. प्रौढ शिक्षणाच्या निमित्ताने येथील कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील खेड्यांचा अभ्यास केला आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या शैक्षणिक घोडदौडीत त्यांचाही सहभाग मोलाचा ठरू शकतो. पण जिल्हा परिषदेकडून ते ‘आपले’ कर्मचारी नाहीत, या सबबीखाली त्यांची उपेक्षा सुरू आहे.तीन महिन्यांपासून वेतन नाही४निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालयाची एवढी अवहेलना होण्याचे कारण म्हणजे, येथील कर्मचारी इतर दोन शिक्षणाधिकारी कार्यालयाप्रमाणे जिल्हा परिषदेला बांधील नाहीत. ते थेट राज्य शासनाचे कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनासाठीही जिल्हा परिषद जबाबदार नाही. अमरावतीचे शिक्षण उपसंचालक यांच्याशी याबाबतीत थेट संबंध आहे. गेल्या तीन महिन्यांपासून येथील कर्मचाऱ्यांचे वेतन थकित आहे. दहा टक्के डीसीपीएस मिळणे अपेक्षित असतानाही ते मिळत नाही. अर्धे अधिक कार्यालय रिकामे४येथे एकंदर १७ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. पण प्रौढ शिक्षण थांबल्यावर या ठिकाणी कर्मचारी देण्याची तसदी शासनाने घेतलेली नाही. आज १७ पैकी केवळ सहा कर्मचारी शिल्लक आहेत. १ प्रोग्राम आॅफिसर, १ सहायक प्रकल्प अधिकारी, ३ क्लार्क, १ स्टेनो आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी. मुळात शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी ही पदे रिक्त असल्याने इतर कर्मचारी असून नसल्यासारखेच.नवे शिक्षणाधिकारी बदल घडवतील का?४निरंतर शिक्षणाधिकारी म्हणून राज्य शासनाने नुकतीच ए. एस. पेंदोर यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते वाशीमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे, निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालयाला आता उपशिक्षणाधिकारीही मिळणार आहे. नांदेडचे गटशिक्षणाधिकारी के. पी. सोने यांना शासनाने यवतमाळ येथील कार्यालयात उपशिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे. पेंदोर आणि सोने हे दोन्ही अधिकारी लवकरच यवतमाळात रूजू होतील.