शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

भूमिगत वाहिन्यांमुळे अखंडित वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 02:24 IST

पावसाळ्याच्या दिवसात वीज, वादळी वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींमुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होतो.

पालकमंत्री : शहराच्या सौंदर्यीकरणात पडेल भरलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्याच्या दिवसात वीज, वादळी वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींमुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होतो. शिवाय अपघात होण्याची शक्यतासुध्दा जास्त असले. त्यातच संपूर्ण शहरात उपरीतार विद्युत जोडण्या असल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. शहराचे हे बकालपण दूर करण्यासाठी तसेच ग्राहकांना अखंड, निरंतर आणि सुरळीत सेवा देण्यासाठी भुमिगत विद्युत वाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.येथील विद्युत भवन कार्यालयात पायाभूत आराखडा योजनेंतर्गत शहरातील विविध ठिकाणच्या उपरीतार मार्ग उच्चदाब व लघुदाब वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला शुक्रवारी प्रारंभ झाला, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्षा कांचन बाळासाहेब चौधरी, अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, अधिक्षक अभियंता रामेश्वर माहुरे, अनिल वाकोडे, कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड उपस्थित होते. पायाभूत सुविधांसाठी महावितरणला ८० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शहरात हायमास्ट लाईट, एलएडी लाईटसाठी आलेला निधी गतीने खर्च झाला पाहिजे. तसेच निघालेल्या विद्युत खांबाजवळ पुन्हा अतिक्रमण होऊ नये, याची काळजी घ्यावी. कोणाचेही विस्थापन न करता पंतप्रधान आवास योजनेत त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे पालकमंत्री म्हणाले. प्रास्ताविकात अधिक्षक अभियंता माहुरे यांनी सांगितले की, राज्यात यवतमाळ ही पहिली नगर पालिका आहे, जेथे उपरी वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रुपांतर होत आहे. या भूमिगत विद्युत वाहिनीसाठी १६ कोटी २३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून कामाची निविदासुध्दा काढण्यात आली आहे. सदर काम एक वर्षात पूर्ण करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.