शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नेरच्या कापूस उत्पादकांची यवतमाळात अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

नेरमध्ये कापूस खरेदी केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी यवतमाळ आणि दारव्हा हे दोन केंद्र देण्यात आले होते. याठिकाणची मर्यादा संपली. यानंतरही एक हजारावर शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत होते. तालुक्यातून एक हजार २२६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. पण खरेदीसाठी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले नव्हते.

ठळक मुद्देमनमानीचा आरोप : कापूस परत पाठविला जातो, उद्धट वागणूक दिली जाते, वाहतुकीचा भुर्दंड पडतो

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कापूस विक्रीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले जात असल्याने त्यांना आर्थिक नुकसानीसोबतच मानसिक त्रासही होत आहे. एवढेच नाही तर खराब असल्याचे कारण सांगत दोन-दोन तीन-तीन क्विंटल कापूस परत केला जात आहे. यवतमाळ येथे खरेदी केंद्रावर अवहेलना होत असल्याची ओरड नेर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.नेरमध्ये कापूस खरेदी केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी यवतमाळ आणि दारव्हा हे दोन केंद्र देण्यात आले होते. याठिकाणची मर्यादा संपली. यानंतरही एक हजारावर शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत होते. तालुक्यातून एक हजार २२६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. पण खरेदीसाठी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले नव्हते.१ जुलैपासून यवतमाळ येथील केंद्रांवर नेरमधील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सुरू झाला. मागील पाच दिवसात ४८० शेतकऱ्यांचा कापूस यवतमाळ येथील खरेदी केंद्रावर घेण्यात आला. याठिकाणी अवहेलना होत आहे. चांगला कापूसही खरेदी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. वाहनातील दोन-दोन तीन-तीन क्विंटल कापूस परत केला जात आहे. कापूस खराब असल्याचे कारण सांगत हा प्रकार होत आहे. या केंद्रावर दररोज केवळ ३० गाड्या कापूस खरेदी होत आहे. संबंधित यंत्रणेकडून फोन करून गाडी मोजणीचा नंबर लागल्याची सूचना केली जाते.शेतकरी आपला संपूर्ण कापूस विक्रीसाठी यवतमाळ येथे घेऊन जातो तेव्हा त्यांना मनमानीचा अनुभव येत आहे. खरेदी केंद्रावरील कर्मचारी मनमानी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. आधीच कापूस विक्रीला उशीर झाला आहे. शेतीकामासाठी पैशाची गरज आहे. आहे तेवढा कापूस विकून यासाठी तजवीज केली जात आहे. त्यातही खरेदी केद्रांवर मनमानी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडले आहे.वणीतही विकला कापूसनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वणी येथील खरेदी केंद्र देण्यात आले होते. घरात कापूस पडून राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी ३०० किलोमीटर अंतर जाणे-येणे करून कापूस विकला. यात त्यांना प्रवास भाड्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.नेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही या पद्धतीने कापूस खरेदी करावी. यासाठी पाठपुरावा केला जात आहे.- भाऊराव ढवळे, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, नेर

टॅग्स :agricultureशेती