शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

नेरच्या कापूस उत्पादकांची यवतमाळात अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

नेरमध्ये कापूस खरेदी केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी यवतमाळ आणि दारव्हा हे दोन केंद्र देण्यात आले होते. याठिकाणची मर्यादा संपली. यानंतरही एक हजारावर शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत होते. तालुक्यातून एक हजार २२६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. पण खरेदीसाठी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले नव्हते.

ठळक मुद्देमनमानीचा आरोप : कापूस परत पाठविला जातो, उद्धट वागणूक दिली जाते, वाहतुकीचा भुर्दंड पडतो

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कापूस विक्रीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले जात असल्याने त्यांना आर्थिक नुकसानीसोबतच मानसिक त्रासही होत आहे. एवढेच नाही तर खराब असल्याचे कारण सांगत दोन-दोन तीन-तीन क्विंटल कापूस परत केला जात आहे. यवतमाळ येथे खरेदी केंद्रावर अवहेलना होत असल्याची ओरड नेर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.नेरमध्ये कापूस खरेदी केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी यवतमाळ आणि दारव्हा हे दोन केंद्र देण्यात आले होते. याठिकाणची मर्यादा संपली. यानंतरही एक हजारावर शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत होते. तालुक्यातून एक हजार २२६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. पण खरेदीसाठी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले नव्हते.१ जुलैपासून यवतमाळ येथील केंद्रांवर नेरमधील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सुरू झाला. मागील पाच दिवसात ४८० शेतकऱ्यांचा कापूस यवतमाळ येथील खरेदी केंद्रावर घेण्यात आला. याठिकाणी अवहेलना होत आहे. चांगला कापूसही खरेदी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. वाहनातील दोन-दोन तीन-तीन क्विंटल कापूस परत केला जात आहे. कापूस खराब असल्याचे कारण सांगत हा प्रकार होत आहे. या केंद्रावर दररोज केवळ ३० गाड्या कापूस खरेदी होत आहे. संबंधित यंत्रणेकडून फोन करून गाडी मोजणीचा नंबर लागल्याची सूचना केली जाते.शेतकरी आपला संपूर्ण कापूस विक्रीसाठी यवतमाळ येथे घेऊन जातो तेव्हा त्यांना मनमानीचा अनुभव येत आहे. खरेदी केंद्रावरील कर्मचारी मनमानी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. आधीच कापूस विक्रीला उशीर झाला आहे. शेतीकामासाठी पैशाची गरज आहे. आहे तेवढा कापूस विकून यासाठी तजवीज केली जात आहे. त्यातही खरेदी केद्रांवर मनमानी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडले आहे.वणीतही विकला कापूसनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वणी येथील खरेदी केंद्र देण्यात आले होते. घरात कापूस पडून राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी ३०० किलोमीटर अंतर जाणे-येणे करून कापूस विकला. यात त्यांना प्रवास भाड्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.नेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही या पद्धतीने कापूस खरेदी करावी. यासाठी पाठपुरावा केला जात आहे.- भाऊराव ढवळे, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, नेर

टॅग्स :agricultureशेती