शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक त्रस्त : तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याचा आरोप

By admin | Updated: September 9, 2015 02:37 IST

वीज कंपनीकडून ग्राहकांना योग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार सातत्याने होत असते.

यवतमाळ : वीज कंपनीकडून ग्राहकांना योग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार सातत्याने होत असते. याला विविध कारणे असली तरी जिल्ह्यात वीज कंपनीमध्ये असलेले मोठ्या प्रमाणात रिक्त पदे हे देखील महत्वाचे कारण आहे. तब्बल १८९ पदे रिक्त आहेत. वीज कंपनीवरील वाढत्या कामाचा ताण पाहता नवीन पदे निर्माण करण्याची गरज असताना आहे ती पदे देखील रिक्त असल्यामुळे ग्राहकांना योग्य व वेळेवर सेवा मिळत नाही. ग्राहकांच्या तक्रारींची वेळेत दखलही घेतली जात नाही. जिल्ह्यात यवतमाळ, पुसद व पांढरकवडा या तीन सर्कलअंतर्गत वीज कंपनीचे कार्य चालते. या तीनही सर्कलमध्ये एकूण सर्व वर्गवारीतील १७८५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या १५९९ पदे भरली आहेत तर १८९ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे विविध कामे खोळंबतात त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे. विशेषत: ग्रामीण भागात एकाच वायरमनकडे अनेक गावे असल्यामुळे वेळेवर डीपी अथवा खांबावरील कामे केली जात नाहीत. त्यामुळे आधीच भारनियमन आणि त्यातही बिघाड झाल्यास नागरिकांना अनेक दिवस अंधारात काढावे लागतात. यवतमाळ, पुसद व पांढरकवडा या तीनही उपविभागांचा एकत्रित विचार केल्यास उपकार्यकारी अभियंत्यांची चार पदे रिक्त आहेत. सहाय्यक अभियंत्यांचा १५ पदे, सहाय्यक प्रोग्रॅमरची एक पद, उपव्यवस्थापक सहा पदे, कनिष्ठ अभियंत्यांची आठ पदे, सहायक दक्षता अधिकाऱ्याचे एक पद, सहाय्यक लेखाधिकाऱ्याची तीन पदे, मुख्य लिपिकाचे एक पद, युडीसी (एसी) २४ पदे, कार्यालयीन सहाय्यक १३ पदे, वेगवेगळ्या विभागांचे आॅपरेटर्स आठ पदे, वाहनचालकांची दोन पदे, वरिष्ठ तंत्रज्ञ २८ पदे, मुख्य तंत्रज्ञ सहा पदे, तंत्रज्ञ ४८, कनिष्ठ तंत्रज्ञ २१ व शिपायाची सात अशी जवळपास १८९ पदे रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या वीज कंपनीतील रिक्त पदांमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना वेळेवर व योग्य सेवा मिळत नाही. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा लक्ष दे्ण्यास तयार नसल्याचे दिसते. (प्रतिनिधी)एकीकडे ग्राहकांना वीज कंपनीकडून योग्य सेवा मिळत नाही. कोणताही बिघाड झाल्यास अनेक दिवस तो दुरूस्त केल्या जात नाही. त्यामुळे ग्रामीण जनतेला अंधारात रात्र काढावी लागते. सबंधितांकडे तक्रार नोंदविल्यास वेळेवर वायरमनला पाठविले जात नाही. याबाबत अधिक्षक अभियंता विजय भटकर यांच्याकडे विचारणा केली असल्यास आम्ही प्रत्येक विभागातील सबंधितांचे तसेच वरिष्ठांचे मोबाईल क्रमांक सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी जाहीर केले आहेत, रिक्त पदे असली तरी आम्ही ग्राहकांना योग्य सेवा देण्यास कटीबद्ध आहोत, परंतु तक्रारीच येत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ग्राहकांच्या तक्रारींसाठी १८००२३३३४३५ व १८००२००३४३५ हे टोल फ्री क्रमांक आहेत. शिवाय नियंत्रण कक्ष ०७२३२-२४२३१८ व ०८९७५००२५७१, सर्कल कंट्रोल रूम ०७८७५७६३०९९ या क्रमांकावरही वीज ग्राहक तक्रारी नोंदवू शकतात.