शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये घरकुलांचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

पालिकेने लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल बांधकामाची मंजुरी दिली. लाभार्थ्यांना अडीच लाखांचे अनुदान देण्याची तरतूद आहे. यात एक लाख राज्य शासन व दीड लाखाचे अनुदान केंद्र शासनाकडून दिले जाते. पालिकेने लाभार्थ्यांची निवड करून त्यांना घरकूल बांधकामास परवानगी दिली. पालिकेवर विश्वास ठेवून अनेकांनी आपले राहते घर तोडून नवीन बांधकामास सुरुवात केली. परिणामी अनेकांना किरायाने राहावे लागत आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून अनुदान नाही : लाभार्थ्यांसमोर पावसाळ्यात उभे ठाकले संकट

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पालिकेतर्फे अनेक लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल मंजूर झाले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून निधी न मिळाल्याने बांधकाम रखडले आहे. अनेक लाभार्थी बेघर झाले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहे.पालिकेने लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल बांधकामाची मंजुरी दिली. लाभार्थ्यांना अडीच लाखांचे अनुदान देण्याची तरतूद आहे. यात एक लाख राज्य शासन व दीड लाखाचे अनुदान केंद्र शासनाकडून दिले जाते. पालिकेने लाभार्थ्यांची निवड करून त्यांना घरकूल बांधकामास परवानगी दिली. पालिकेवर विश्वास ठेवून अनेकांनी आपले राहते घर तोडून नवीन बांधकामास सुरुवात केली. परिणामी अनेकांना किरायाने राहावे लागत आहे. काही लाभार्थी घरकूला शेजारीच तात्पुरती झोपडी उभारून वास्तव्य करीत आहे.उन्हाळ्यात रेती उपलब्ध झाली नाही. त्यातही विशिष्ट लाभार्थ्यांनाच अनुदानाचा ४० हजारांचा पहिला व दुसरा हप्ता मिळाला. मात्र त्यानंतर अनुदान मिळणेही बंद झाले. परिणामी अनेकांनी उसनवारी करून घरकुलाचे बांधकाम सुरू ठेवले. मात्र शासनाकडून निधी येत नसल्याने आता सर्वच लाभार्थी हवालदिल झाले आहे. त्यांच्यासमोर पावसाळ्यात राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाभार्थी पालिकेत चकरा मारून थकले आहे. मात्र निधी मिळणे दुरापास्त झाले आहे.पावसाळ्यात संपूर्ण लाभार्थ्यांवरच पावसात राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अनुदानाचे हप्ते मिळत नसल्याने पालिका प्रशासनही हवालदिल झाले आहे. यातून मार्ग काढणे आवश्यक आहे.लाभार्थ्यांचा आमरण उपोषणाचा इशाराबांधकामासाठी अनुदान मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहे. ज्यांनी उसनवारी पैशातून बांधकाम केले त्यांच्यासमोर पैसे परत करण्याचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांनी १५ जुलैपासून पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. शे.लतिफ शे.कठालू, रूपाली सोमवंशी, मोमीनाबी शेख युनूस, अनिसाबी, प्रकाश सहातोंडे, मारोती कामाजी, रुखमाजी हांडेवार, शिवाजी लोखंडे, किशोर बरडे, पांडुरंग विभूते, रज्जाकभाई डवर, शेख निसार, वाजीद खान इब्राहीम खान, अयूब खान उस्मान खान, प्रताप देशमुख, शेषराव वाघमोरे, जगदीश सोमवंशी आदींनी मुख्यमंत्री जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.राज्य शासनाकडून प्राप्त निधीचे वाटप केले. आता निधी उपलब्ध नाही. ३० जूनपर्यंत निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.- निर्मला राशीनकर, मुख्याधिकारी