शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संविधानाने उच्चपदावर गेलेलेही समाजद्रोही ठरले

By admin | Updated: April 13, 2017 00:58 IST

महात्मा फुले यांचे पुस्तक ‘सार्वजनिक सत्यधर्म’, डॉ. आंबेडकरांचे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ आणि ‘भारतीय संविधान’

गुरूनामसिंह शाक्य : ‘समता पर्वात’ प्रबोधन, सत्यधर्म व धम्मक्रांती विषयावर मार्गदर्शन यवतमाळ : महात्मा फुले यांचे पुस्तक ‘सार्वजनिक सत्यधर्म’, डॉ. आंबेडकरांचे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ आणि ‘भारतीय संविधान’ ही पुस्तकेच बहुजनांचा सर्वांगीण विकास करण्यात सक्षम आहेत. मानवी विकासाचा, करुणेचा एक प्रवाह या तीनही पुस्तकातून वाहतो आहे. महात्मा फुलेंचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठीच डॉ. आंबेडकर झिजले. संविधानाच्या माध्यमातून बहुजनांच्या विकासाचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. संविधानामुळेच अनेकांना उच्च पदे मिळाली. परंतु हे लाभ त्यांनी स्वत:पुरतेच मर्यादित ठेवले. समाजालाही हे लाभ मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही. ही स्वार्थी मंडळी फुले-आंबेडकर यांच्या विचारांशी, समाजाशी आणि राष्ट्राशीही कृतघ्न झाली आहे, असे मत गुरूनामसिंह शाक्य (अलाहाबाद) यांनी व्यक्त केले. येथील समता मैदानात आयोजित समता पर्वात ‘महात्मा फुलेजी का सार्वजनिक सत्यधर्म ओर डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी की धम्मक्रांती’ या विषयावर ते बोलत होते. प्रा. सविता हजारे अध्यक्षस्थानी होत्या. गुरुनामसिंह शाक्य पुढे म्हणाले, स्वर्ग-नर्क, पाप-पुण्य, जाती इत्यादी तथाकथित गोष्टींची चर्चा महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्मातून केली आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून बाबासाहेबांनी अत्यंत कारूनिक पद्धतीने बुद्ध तत्त्वज्ञानाचा सारांश सांगितला आहे. स्वत: स्वत:चे शिल्पकार होण्याचा संदेश दोनही पुस्तकात आहे. आंतरराष्ट्रीय आणि आंतरधर्मीय संकल्पना दोघांनीही मांडल्या आहेत. सर्वांना समान संधी आणि विकासाचे सूत्र हेच त्यांचे जीवनध्येय होते. आपण केवळ त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करून उपयोग नाही. त्यांचे विचार आचरणात येणे महत्त्वाचे आहे. यातच आम्ही कमी पडतो आहे. इतरांचे दोष दाखविण्यापेक्षा आपण आपल्या कल्याणाचा विचार करणे आवश्यक असताना नेमके तेच आम्ही टाळतो. राग, लोभ, अहंकार, इर्षा, द्वेष, मत्सर यांचे भंजन करणारा तो भगवान. भगवान हा पाली शब्द सर्वप्रथम गौतम बुद्धांसाठीच वापरला असून बुद्ध हेच भगवान होते. एवढा महत्त्वाचा हा शब्द नंतरच्या काळात अनेकांना वापरला गेला आणि त्या शब्दाचे महात्म्य संपुष्टात आले. आपण धार्मिक असल्याचे फक्त ढोंग करतो. धार्मिक म्हणविणाऱ्यांनीच या जगात सर्वात जास्त उन्माद केला आहे, हे इतिहासातून कळते. सावित्रीआई फुले विचार मंचावर यावेळी अ‍ॅड. प्रकाश मौर्य, अ‍ॅड. केसरी मौर्य, लालती शाक्य, मायाताई गोबरे, डॉ. दिलीप घावडे, किशोर भगत, प्रा. बाळकृष्ण सरकटे, अ‍ॅड. रामदास राऊत, ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते. संचालन आणि आभार नम्रता खडसे यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)