शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना विस्थापित करण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: May 15, 2014 23:58 IST

यवतमाळ : आदिवासी अस्मितेची पहिली लढाई इंग्रजाविरोधात बाबा तिलकमानी यांच्या नेतृत्चात लढल्या गेली. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.

यवतमाळ : आदिवासी अस्मितेची पहिली लढाई इंग्रजाविरोधात बाबा तिलकमानी यांच्या नेतृत्चात लढल्या गेली. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.१८५७ च्या बंडाचा खोटा इतिहास समोर करून इतिहासकारांनी खरा इतिहास दडपण्याचे काम केले. आदिवासी हा लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे, त्यांची एक वैभवशाली संस्कृती आहे. जल, जंगल व जमिनीची अहोरात्र सुरक्षा करणार्‍या आदिवासींना प्रस्थापित व्यवस्थेने विस्थापित करण्याचे षडयंत्र रचले असल्याचा घनाघाती आरोप संथाली लेखक ग्लॅस्सन डुंगडुंग यांनी केला.

येथील समता पर्वात आयोजित ‘सरकार, नक्षलवाद व जीर्ण संस्कृतीच्या त्रिकोणात अडकलेला आदिवासी समाज’ या अखेरच्या विचारवेध सत्रात ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर पश्‍चिम बंगाल येथील रूबी हेम्ब्राम, प्रा. डॉ. सुनंदा वालदे, मंगला दिघाडे, प्रा. डॉ. छाया महाले, प्रा. माधव सरकुंडे. ज्ञानेश्‍वर गोबरे आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, आदिवासी हा इमानदार व सभ्यता पाळणारा समूदाय आहे. त्याने निसर्गाचे रक्षण करून निसर्गाचे सौंदर्य अबाधित ठेवले आहे. मात्र सरकार जमिनदारांच्या माध्यमातून आदिवासींना गुन्हेगार ठरवून त्यांच्या जमिनी लुटत आहे. इंग्रजांच्या काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळामध्येही आदिवासींना नकारात्मक व अन्यायकारक वागणूक दिली जात आहे.

आदिवासी समाजात मुलगा- मुलगी असा भेद पाळल्या जात नाही.आदिवासींच्या आंदोलनाला नक्षलवादाचे स्वरूप देऊन आंदोलन दडपण्यात येत असल्याचा आरोपही डुंगडुंग यांनी यावेळी केला. यावेळी रूबी हेम्ब्राम यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)