शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

आत्महत्येचा विचार येतोय, थेट कलेक्टरला फोन करा

By admin | Updated: May 19, 2015 01:32 IST

शेतकऱ्यांनो कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नका, तसा विचार जरी डोक्यात आला तरी टोकाचा कोणताही

यवतमाळ : शेतकऱ्यांनो कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नका, तसा विचार जरी डोक्यात आला तरी टोकाचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एक फोन थेट मला करा, असे भावनिक आवाहन यवतमाळचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले आहे. सिंग यांचे सोमवारी सायंकाळी परभणीवरून आगमन झाले. त्यानंतर येथील जिल्हाधिकारी पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यांवर आणि विशेषत: शेतकरी आत्महत्यांवर सिंग यांनी यवतमाळचे मावळते आणि परभणीचे नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्यासोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सचिंद्र प्रताप सिंग यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. सिंग म्हणाले, शेतकरी आत्महत्या हा अत्यंत ज्वलंत विषय आहे. त्यातही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळेच प्रशासनाचा फोकस यवतमाळवर आहे. या आत्महत्या पुढील दोन वर्षात दिसणार नाहीत, या दृष्टीने उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कर्ज व नापिकी हे प्रमुख कारण असले तरी शेतकऱ्याने आत्महत्येचा विचारही मनात आणू नये. असे टोकाचे पाऊल उचलून आपल्या कुटुंबाला उघड्यावर सोडू नये. आत्महत्येचा विचार मनाला शिवणारसुद्धा नाही, असा प्रयत्न करावा. तरीही तसा विचार आल्यास जिल्हाधिकारी म्हणून थेट आपल्याशी ९४२२८८५५११ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. हा फोन २४ तास सुरू राहील. त्या एका कॉलवर तुमच्या मनातील आत्महत्येचा विचार दूर फेकण्याचा, तुम्हाला जगण्याची नवी आशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशा शब्दात सिंग यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, परभणीमध्येही कमी अधिक प्रमाणात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न आहे. तेथे शेतकऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी, प्रशासन तुमच्या सोबत आहे हा विश्वास निर्माण करण्यासाठी ‘उमेद’ प्रकल्प राबविला जात आहे. यवतमाळातही हा प्रकल्प शेतकऱ्यांमध्ये जगण्याची नवी आशा निर्माण करेल. शासन-प्रशासनाने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळेच प्रत्येक उपविभागात प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी देण्यात आला आहे. ते या आत्महत्यांची नेमकी कारणमिमांसा करणार असून त्यानंतर शासनाचे धोरण ठरणार आहे. महसूल यंत्रणेवर विविध अभियान, योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीमुळे ताण येत असल्याची बाब सिंग यांनी मान्य केली. मात्र हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा महसूल यंत्रणेचीच असल्याचे स्मरणही त्यांनी यावेळी करून दिले. राहुल रंजन महिवाल यांनी अलिकडे रेती घाटांवर धाड सत्र राबविले होते. ते पुढेही सुरू राहणार असल्याचे सूतोवाच सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी)