शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

आत्महत्येचा विचार येतोय, थेट कलेक्टरला फोन करा

By admin | Updated: May 19, 2015 01:32 IST

शेतकऱ्यांनो कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नका, तसा विचार जरी डोक्यात आला तरी टोकाचा कोणताही

यवतमाळ : शेतकऱ्यांनो कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नका, तसा विचार जरी डोक्यात आला तरी टोकाचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एक फोन थेट मला करा, असे भावनिक आवाहन यवतमाळचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले आहे. सिंग यांचे सोमवारी सायंकाळी परभणीवरून आगमन झाले. त्यानंतर येथील जिल्हाधिकारी पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यांवर आणि विशेषत: शेतकरी आत्महत्यांवर सिंग यांनी यवतमाळचे मावळते आणि परभणीचे नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्यासोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सचिंद्र प्रताप सिंग यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. सिंग म्हणाले, शेतकरी आत्महत्या हा अत्यंत ज्वलंत विषय आहे. त्यातही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळेच प्रशासनाचा फोकस यवतमाळवर आहे. या आत्महत्या पुढील दोन वर्षात दिसणार नाहीत, या दृष्टीने उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कर्ज व नापिकी हे प्रमुख कारण असले तरी शेतकऱ्याने आत्महत्येचा विचारही मनात आणू नये. असे टोकाचे पाऊल उचलून आपल्या कुटुंबाला उघड्यावर सोडू नये. आत्महत्येचा विचार मनाला शिवणारसुद्धा नाही, असा प्रयत्न करावा. तरीही तसा विचार आल्यास जिल्हाधिकारी म्हणून थेट आपल्याशी ९४२२८८५५११ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. हा फोन २४ तास सुरू राहील. त्या एका कॉलवर तुमच्या मनातील आत्महत्येचा विचार दूर फेकण्याचा, तुम्हाला जगण्याची नवी आशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशा शब्दात सिंग यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, परभणीमध्येही कमी अधिक प्रमाणात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न आहे. तेथे शेतकऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी, प्रशासन तुमच्या सोबत आहे हा विश्वास निर्माण करण्यासाठी ‘उमेद’ प्रकल्प राबविला जात आहे. यवतमाळातही हा प्रकल्प शेतकऱ्यांमध्ये जगण्याची नवी आशा निर्माण करेल. शासन-प्रशासनाने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळेच प्रत्येक उपविभागात प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी देण्यात आला आहे. ते या आत्महत्यांची नेमकी कारणमिमांसा करणार असून त्यानंतर शासनाचे धोरण ठरणार आहे. महसूल यंत्रणेवर विविध अभियान, योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीमुळे ताण येत असल्याची बाब सिंग यांनी मान्य केली. मात्र हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा महसूल यंत्रणेचीच असल्याचे स्मरणही त्यांनी यावेळी करून दिले. राहुल रंजन महिवाल यांनी अलिकडे रेती घाटांवर धाड सत्र राबविले होते. ते पुढेही सुरू राहणार असल्याचे सूतोवाच सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी)