शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्वावर मात करीत ‘तो’ घालतो घणाचे घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:36 IST

धावपळीच्या युगात थोड्याशा अपयशाने खचून जाणारे अनेक असतात. मात्र आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगण्याच्या जिद्दीने ‘तो’ घणावर घाव घालीत संसार चालवित आहे.

ठळक मुद्देसंघर्षमय कहाणी : डिजिटल इंडियात मतदानापासून वंचित, दोन्ही मुलांनी शाळेचे तोंडच पाहिले नाही

विठ्ठल कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : धावपळीच्या युगात थोड्याशा अपयशाने खचून जाणारे अनेक असतात. मात्र आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगण्याच्या जिद्दीने ‘तो’ घणावर घाव घालीत संसार चालवित आहे.रमेश भाऊराव चव्हाण (३७) असे या जिद्दी तरुणाचे नाव आहे. शेती अवजारे बनविणे हा त्याचा व्यवसाय. त्याच्या कामात त्याची पत्नी संगीता मदत करते. संगीता भात्याच्या सहाय्याने लोखंड गरम करते, तर रमेश एका हाताने त्या तप्त लोखंडावर घणाचे घाव घालतो. पाहिजे तो आकार देऊन शेती अवजार बनवितो. २० वर्षांपूर्वी रमेशचा डावा हात काम करताना थ्रेशरमध्ये अडकला अन् त्याला अपंगत्व आले. काही दिवस घरी बसावे लागले. परंतु पोटाची भूक स्वस्थ बसू देईना. पत्नीची साथ लाभल्याने त्याने नव्या जोमाने अपंगत्वाचे भांडवल न करता, आहे त्या हाताला बळ देऊन घणाचे घाव घालू लागला. त्याला दहा आणि सात वर्षांची दोन अपत्ये आहे. फिरस्तीचे जीणे वाट्याला आल्याने त्याची मुले कोणत्याच शाळेत गेली नाही. दोघेही शिक्षणापासून वंचित आहे.मूळचा बोरगाव अंजीचा रहिवासी असलेल्या रमेशला एका ठिकाणी रोजगार मिळेना, म्हणून तो गावोगावी फिरू लागला. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यातील अनेक गावात तो फिरला. काही दिवसांपूर्वी तो शिरोली येथे आला. उघड्यावर संसार थाटून त्याने उपजिवीका सुरू केली. त्याच्या या जिद्दीला सर्व कुटुबांचे सहकार्य लाभत आहे.ना आधार, ना राशनकार्ड, मन मात्र खंबीररोजगाराच्या शोधात गावोगावी भटकंती करणाऱ्या रमेशकडे ना आधारकार्ड आहे, ना रेशनकार्ड. त्याला स्वत:चे गाव नाही. गावच नसल्याने रेशनकार्ड नाही. त्याच्याजवळ कोणतीच कागदपत्रे नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा प्रश्नच नाही. डीजिटल इंडियात त्याने अद्याप मतदानाचा हक्कही बजावला नाही. मेहनतीच्या जोरावर ‘तो’ श्रमाची मोठमोठी कामे करतो. परिस्थितीशी झगडत तो संघर्षमय जीवन जगतो. शरीर जरी अपंग असले, तरी त्याचे मन मात्र अद्यापही खंबीर आहे.