शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

नेरमध्ये काँग्रेसची दैना

By admin | Updated: August 26, 2014 23:45 IST

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या मतदारसंघातील नेर तालुक्यात या पक्षाची दैना झाली आहे. अंतर्गत गटबाजीने हा पक्ष खिळखिळा झाला आहे. पोटभरू कार्यकर्त्यांचीही गर्दी वाढल्याने ते

किशोर वंजारी - नेरएकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या मतदारसंघातील नेर तालुक्यात या पक्षाची दैना झाली आहे. अंतर्गत गटबाजीने हा पक्ष खिळखिळा झाला आहे. पोटभरू कार्यकर्त्यांचीही गर्दी वाढल्याने ते पक्षासाठी बदनामीचे धन ठरत आहे. त्याच त्या लोकांना वारंवार पद दिल्याने निष्ठावानही दूर गेला आहे. ही परिस्थिती सावरण्यात तालुक्यातील अथवा राज्य पातळीवरील नेत्यांना अजूनही यश आलेले नाही. परिणामी काँग्रेसची या तालुक्यावरील पकड सैल झाली आहे. काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मतदारसंघातील हा तालुका आहे. त्यांचे पुत्र राहुल ठाकरे यांचा जिल्हा परिषद मतदारसंघही याच तालुक्यातील वटफळी हा आहे. मात्र या दोघांनीही तालुक्यातील विस्कटलेली घडी बसविण्याचा फारसा प्रयत्न केलेला नाही. केवळ निवडणुका तोंडावर आल्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न तेवढा होतो. आता तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीही याचीच प्रचिती येत आहे. काँग्रेसच्या वाट्यातून या तालुक्याला विकासाच्या बाबतीत फार काही मिळालेले नाही. त्यामुळेच सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थेत या पक्षाला सपाटून मार खावा लागला. कार्यकर्त्यांची मोठी फळी या पक्षातून दूर गेली. जे काही जवळ आहे त्यांनीही आता पक्षाचे लेबल वापरून कुणाची बदली, कुणाला विहीर, कोणाला योजनेचा लाभ मिळवून देण्याचे सांगत पाच-पन्नास रुपये मिळतील या उद्देशाने काम सुरू केले आहे. ही बाब पक्षातील ज्येष्ठ लोकांना माहीत असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्या व्यक्तीला पद देताना त्याचा परिसरात किती प्रभाव आहे, याची चाचपणीही कधी केली गेली नाही. जुना माणूस तेवढी उपलब्धी पाहून जबाबदारी सोपविण्यात आली. या प्रकाराने धडाडीचा कार्यकर्ता मागे राहिला. आपण कुठपर्यंत सतरंज्याच उचलायच्या अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. अशाच पद्धतीने कार्यकर्ते दूर गेले. गटबाजीने काँग्रेसला पोखरल्याची प्रचितीही नुकत्याच झालेल्या बाजार समिती प्रशासक नियुक्तीत आली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी सादर केलेल्या दोन वेगवेगळ्या याद्या हे त्याचेच उदाहरण आहे. या बाबींचा काँग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.