शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

नोटाबंदी विरोधात कचेरीवर काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

By admin | Updated: January 7, 2017 00:19 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नेतेमंडळींनी सरकारचा केला निषेध

यवतमाळ : नोटबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी अडचणीत आले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला अधोगतीकडे नेण्यात येत आहे. नोटबंदी करून सामान्य माणसांचा पैसा बँकेत भरून घेतला. याच पैशातून मोठ मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले, असा आरोप जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात केला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी सरकारचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जनआक्रोश मोर्चा हा पोस्टल मैदानातून निघाला. यात शेतकरी, शेतमजूर आणि काँग्रेसची सर्वच नेतेमंडळी उपस्थित होती. मोर्चा नेताजी चौक, दत्त चौक आणि बसस्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. येथे विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार कीर्ती गांधी, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी श्याम उमाळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच सोमवारी जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकेसमोर आंदोलन करण्याचे आवाहन श्याम उमाळकर यांनी केले. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मोर्चात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)