शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

काँग्रेसची लक्तरे वेशीवर

By admin | Updated: December 11, 2014 23:15 IST

तब्बल ४६ वर्षानंतर म्हणजे शिंगणकरानंतर उमरखेडसाठी मागासवर्गाला उमेदवारी मिळाली. मागासवर्गाला उमेदवारी मिळताच ज्यांनी निरंकुश सत्ता भोगली त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

राजाभाऊ बेदरकर - उमरखेडतब्बल ४६ वर्षानंतर म्हणजे शिंगणकरानंतर उमरखेडसाठी मागासवर्गाला उमेदवारी मिळाली. मागासवर्गाला उमेदवारी मिळताच ज्यांनी निरंकुश सत्ता भोगली त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यातून दोन माजी आमदारांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे उमरखेड काँग्रेसची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. मागास आरक्षणातून निवडून आलेले माजी आमदार विजय खडसे यांना पहिलीच निवडणूक सत्त्व परीक्षा ठरली. काँग्रेसमधीलच काही दिग्गजांनी खडसेंची उमेदवारी जाहीर होताच नाक मुरडणे सुरू केले. परंतु त्यावेळी लोकांना बदल हवा होता. त्यामुळे खडसे विजयी झाले. हा विजय खडसे नको म्हणणाऱ्यांनी नाईलाजास्तव साजरा केला. नंतरच्या पाच वर्षात सगळे जण खडसेंच्या सत्तेच्या गाडीत बसले. वास्तविक खडसेंनीच या सगळ्यांना सोबत घेऊन काँग्रेसची आब राखत काँग्रेसच्या मतदारसंघातील विकासाचा गाडा पुढे रेटत नेला. पाच वर्षांपर्यंत सोबत राहणाऱ्यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली असता काँग्रेसचे निष्ठावान म्हणविणाऱ्यांनी मला विधानसभेच्या निवडणुकीत एकाकी का पाडावे, हाच खडसेंचा खरा राग होता. माजी आमदार अ‍ॅड.देवसरकर आणि खडसेंमध्ये पराभवाच्या निमित्ताने चांगलेच वादंग निर्माण झाले. कोण कसे बोलले, कुठे बोलले, काय बोलले हा वेगळा चर्चेचा व रोषाचा विषय असला तरी या निमित्ताने उमरखेड काँग्रेसची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली, एवढे मात्र खरे. खडसेंनीही अनेक दिवस केवळ मनात ठेवलेला रोष एकदाचा बोलून दाखविला. आता मात्र दोघेही माजी आमदार झाले आहेत. परंतु जनतेत मात्र काँग्रेसच्या दृष्टीने आवश्यक तो संदेश गेला नाही. संपूर्ण राज्यात काँग्रेसची गळती असताना लोकसभेतील काँग्रेसच्या विजयामुळे लोकांना थोडीफार आशा होती. तीसुद्धा अंतर्गत राजकारणामुळे धूसर झाली. व्यक्तिगत बाबींमुळे पक्षाची किती हानी होते हे या प्रकरणावरून सगळ्यांनाच जाणवले. पक्षापेक्षा कोणतीच व्यक्ती मोठी नसते याचा विचार दोन्ही आमदारांना पडलेला दिसतो. पक्षाच्या बळावरच अ‍ॅड.देवसरकर दोनदा या भागाचे आमदार झाले आणि खडसेही मोठे झाले. तालुका काँग्रेसमधील हे भांडण ज्यांचा काँग्रेसच्या कार्यशैलीवर विश्वास आहे त्यांचा हिरमोड करण्यास कारणीभूत ठरले. उमरखेड विधानसभा क्षेत्र मागासवर्गीय उमेदवाराला शाप ठरतो की काय, असे वाटायला लागले. ज्यांची खडसेंवर विशेषत: निष्ठा होती ते मागासवर्गीयसुद्धा आता बोलू लागले आहेत. त्यांच्या मनात कुठे तरी कळ उठत असून आंबेडकरी विचारसरणीला छेद देणारा गट तर मतदारसंघात सक्रिय होत नाही ना, या शंकेने त्यांना ग्रासले आहे. दोघा माजी आमदारांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, अशी सर्वसामान्यांची त्यांच्याकडून माफक अपेक्षा असल्याचे दिसून येते.