शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

यवतमाळात काँग्रेस गटनेतेपदाचा पोरखेळ

By admin | Updated: July 20, 2014 00:09 IST

शहरात काँग्रेस पूर्णत: दुबळी झाली आहे. येथील नगरसेवकांवर नेत्यांचे नियंत्रण नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नगरपरिषदेतील गटनेता सलग तीनदा बदलविण्यात आला आहे.

यवतमाळ : शहरात काँग्रेस पूर्णत: दुबळी झाली आहे. येथील नगरसेवकांवर नेत्यांचे नियंत्रण नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नगरपरिषदेतील गटनेता सलग तीनदा बदलविण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी अर्ध्या तासाच्या फरकाने दोन नगरसेवकांना गटनेता म्हणून नियुक्तीपत्र दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. नगरपरिषदेत काँग्रेसमध्ये कुणाचाच पायपोस कुणाला नसल्याचे दिसते. गटनेता निवडीवरून निर्माण झालेला वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचला. शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी समेटासाठी काँग्रेस नगरसेवकांची बैठक बोलाविली. यावेळी नगरसेवक अमोल देशमुख यांना गटनेता म्हणून नियुक्त करीत असल्याचे पत्र जिल्हाध्यक्षांनी दिले. त्यांना सात नगरसेवकांचे समर्थन आहे. मात्र त्यानंतर अर्ध्या तासातच अध्यक्ष वामनराव कासावार यांनी अमोल देशमुख यांची नियुक्ती रद्द ठरवत न्यायालयाच्या निकालाप्रमाणे जाफर सादिक गिलाणी गटनेते राहतील, असे पत्र दिले. काँग्रेससारख्या पक्षात गटनेता निवडण्यावरून एवढी मोठी विसंगती आणि विवाद उद्भवत असल्याचे चित्र पहिल्यांदाच पहावयास मिळत आहे. नगरसेवकांमध्ये दोन गट असून निलंबित नगरसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या बाजूने सात सदस्य तर चार सदस्यांचा वेगळा गट आहे. ही गटबाजी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही कायम असल्याचे काल पुन्हा सिद्ध झाले. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या एकाही नेत्याने आपल्या नगरसेवकांना बोलावून सूचना दिल्या नाही. यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत सुसंवाद संपल्याचे स्पष्ट होते. आज नगरपरिषदेत काँग्रेसकडे ११ नगरसेवक असले तरी त्यापैकी पक्षाचे किती हा प्रश्न निर्माण झाला आहे. नेत्यांमधील विसंगतीमुळे गटनेतेपदाचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहे. यात काय घडामोडी होतात याची उत्सुकता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)