शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

अध्यक्षपदावर काँग्रेसचे पाणी

By admin | Updated: September 21, 2014 00:02 IST

जिल्हा परिषदेत अडीच वर्ष विरोधी बाकावर बसल्यानंतर काँग्रेस नेते मुत्सदेगिरी दाखवत सत्ता स्थापनेत महत्त्वाची पदे मिळवतील अशी अपेक्षा काँग्रेस सदस्यांना होती. मात्र निवडणूक प्रक्रिया विधानसभा

पुत्र प्रेम : काँग्रेस आमदारांना उमेदवारीचीच अधिक चिंतायवतमाळ : जिल्हा परिषदेत अडीच वर्ष विरोधी बाकावर बसल्यानंतर काँग्रेस नेते मुत्सदेगिरी दाखवत सत्ता स्थापनेत महत्त्वाची पदे मिळवतील अशी अपेक्षा काँग्रेस सदस्यांना होती. मात्र निवडणूक प्रक्रिया विधानसभा आचारसंहितेत आल्याने येथेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पुत्रप्रेम आडवे आले. मुलाचा विधानसभेचा मार्ग मोकळा करण्यासाठी जिल्हा परिषदेतील अटी शर्तींकडे पूर्णत: डोळेझाक केली जात आहे. स्थानिक काँग्रेस आमदारांनाही विधानसभेचे डोहाळे लागल्याने जिल्हा परिषदेत काहीच देणे घेणे नसल्याची चर्चा काँग्रेस गोटात सुरू आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसची चांगलीच फरफट झाली. याचा वचपा काढण्याची संधी चालून आली. मात्र राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका कायम ठेवत काँग्रेसला नमते घेण्यास भाग पाडले. शिवाय विधानसभा निवडणूक असल्याने काँग्रेस आमदारांनीही जिल्हा परिषदेत फार लक्ष घातले नाही. प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी आपल्या पुत्राला अध्यक्ष बनविण्यासाठी २००९ मध्ये सहयोगी असलेल्या राष्ट्रवादीला बाजूला बसवून मुत्सदेगिरी दाखवत काँग्रेसची सत्ता स्थापन केली. आता अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्याने त्यांना या पदात स्वारस्य नाही. उलट यवतमाळ विधानसभेतून मुलाची उमेदवारी कशी निश्चित होईल याचा खटाटोप सुरू आहे. शिवाय राष्ट्रवादीला चुचकारून विरोध कसा कमी करता येईल अशीच भूमिका घेण्यात आली. याच काळात काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी आपल्या पुतण्याला पद मिळण्यासाठी खटाटोप केला. शिवाजीराव मोघे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकासाठी शब्द टाकला. आता मात्र ही नेतेमंडळी विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने त्यांनी पूर्णत: जिल्हा परिषदेतील निवड प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या सदस्यांची संयुक्त बैठकही घेतली नाही. सदस्यांची काय भूमिका आहे, हे विचारण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. प्रत्येकाला विधानसभेचे डोहाळे लागले आहे, अशी चर्चा दबक्या स्वरात काँग्रेस सदस्यांमध्ये सुरू आहे. औपचारिकता म्हणून २१ सप्टेंबरला सकाळी बैठक बोलवली आहे. त्यानंतर विधानसभेच्या प्रचार धुमाळीतच ४ आॅक्टोबरला विषय समित्यांची निवड होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नेतेमंडळी सदस्यांनी निर्णय घ्यावा असेही उघडपणे बोलायला तयार नाही. शिवाय त्यांच्याकडे या निवड प्रक्रियेसाठी देण्याकरिता वेळही नाही. त्यामुळेच काँग्रेसचे पद वाटपात नुकसान होत असल्याची खंत काही सदस्यांनी व्यक्त केली. (कार्यालय प्रतिनिधी)