शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

अध्यक्षपदावर काँग्रेसचे पाणी

By admin | Updated: September 21, 2014 00:02 IST

जिल्हा परिषदेत अडीच वर्ष विरोधी बाकावर बसल्यानंतर काँग्रेस नेते मुत्सदेगिरी दाखवत सत्ता स्थापनेत महत्त्वाची पदे मिळवतील अशी अपेक्षा काँग्रेस सदस्यांना होती. मात्र निवडणूक प्रक्रिया विधानसभा

पुत्र प्रेम : काँग्रेस आमदारांना उमेदवारीचीच अधिक चिंतायवतमाळ : जिल्हा परिषदेत अडीच वर्ष विरोधी बाकावर बसल्यानंतर काँग्रेस नेते मुत्सदेगिरी दाखवत सत्ता स्थापनेत महत्त्वाची पदे मिळवतील अशी अपेक्षा काँग्रेस सदस्यांना होती. मात्र निवडणूक प्रक्रिया विधानसभा आचारसंहितेत आल्याने येथेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पुत्रप्रेम आडवे आले. मुलाचा विधानसभेचा मार्ग मोकळा करण्यासाठी जिल्हा परिषदेतील अटी शर्तींकडे पूर्णत: डोळेझाक केली जात आहे. स्थानिक काँग्रेस आमदारांनाही विधानसभेचे डोहाळे लागल्याने जिल्हा परिषदेत काहीच देणे घेणे नसल्याची चर्चा काँग्रेस गोटात सुरू आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसची चांगलीच फरफट झाली. याचा वचपा काढण्याची संधी चालून आली. मात्र राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका कायम ठेवत काँग्रेसला नमते घेण्यास भाग पाडले. शिवाय विधानसभा निवडणूक असल्याने काँग्रेस आमदारांनीही जिल्हा परिषदेत फार लक्ष घातले नाही. प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी आपल्या पुत्राला अध्यक्ष बनविण्यासाठी २००९ मध्ये सहयोगी असलेल्या राष्ट्रवादीला बाजूला बसवून मुत्सदेगिरी दाखवत काँग्रेसची सत्ता स्थापन केली. आता अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्याने त्यांना या पदात स्वारस्य नाही. उलट यवतमाळ विधानसभेतून मुलाची उमेदवारी कशी निश्चित होईल याचा खटाटोप सुरू आहे. शिवाय राष्ट्रवादीला चुचकारून विरोध कसा कमी करता येईल अशीच भूमिका घेण्यात आली. याच काळात काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी आपल्या पुतण्याला पद मिळण्यासाठी खटाटोप केला. शिवाजीराव मोघे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकासाठी शब्द टाकला. आता मात्र ही नेतेमंडळी विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने त्यांनी पूर्णत: जिल्हा परिषदेतील निवड प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या सदस्यांची संयुक्त बैठकही घेतली नाही. सदस्यांची काय भूमिका आहे, हे विचारण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. प्रत्येकाला विधानसभेचे डोहाळे लागले आहे, अशी चर्चा दबक्या स्वरात काँग्रेस सदस्यांमध्ये सुरू आहे. औपचारिकता म्हणून २१ सप्टेंबरला सकाळी बैठक बोलवली आहे. त्यानंतर विधानसभेच्या प्रचार धुमाळीतच ४ आॅक्टोबरला विषय समित्यांची निवड होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नेतेमंडळी सदस्यांनी निर्णय घ्यावा असेही उघडपणे बोलायला तयार नाही. शिवाय त्यांच्याकडे या निवड प्रक्रियेसाठी देण्याकरिता वेळही नाही. त्यामुळेच काँग्रेसचे पद वाटपात नुकसान होत असल्याची खंत काही सदस्यांनी व्यक्त केली. (कार्यालय प्रतिनिधी)