शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

काँग्रेसने ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले

By admin | Updated: October 11, 2014 02:16 IST

भाजपा खोटी आश्वासने देवून सत्तेत आली. देशाला भुलवून स्वत: सत्तेच्या झोक्यात झुलत आहे. खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज करणे ही काँग्रेसची परंपरा नाही.

पुसद : भाजपा खोटी आश्वासने देवून सत्तेत आली. देशाला भुलवून स्वत: सत्तेच्या झोक्यात झुलत आहे. खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज करणे ही काँग्रेसची परंपरा नाही. सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने आपल्या राजवटीत देशातील शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव तथा माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी येथे केले. पुसद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. सचिन नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपा सत्तेवर आली. मात्र त्यांनी निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. जीवनावश्यक वस्तूंचे भाव, रेल्वेभाडे १४ टक्क्याने वाढल्याचे सांगत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, महाराष्ट्राची अस्मिता महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज असून मराठी बांधवांना विकासाचे मॉडेल हवे असेल तर ते महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आहेत. एक अन्नदाता जो सर्वांचं पोट भरतो आणि दुसरा मतदाता माणसाला नेता बनवितो त्यांना अतिशय महत्त्व आहे. येणाऱ्या निवडणुकीत बदल हवा असेल तर राहुल गांधी यांच्या ब्रिगेडमधील अ‍ॅड.सचिन नाईक यांना निवडून पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. मध्य प्रदेश निवासी ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या मराठी भाषणामुळे उपस्थित जनसमूदाय प्रभावीत झाला. यावेळी उमेदवार अ‍ॅड.सचिन नाईक, राहुल गांधी टिमचे विनोद राठोड (हिमाचल प्रदेश), नसीम खान (मध्य प्रदेश) यांनीही सभेला संबोधित केले. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अनंतराव देवसरकर, आमदार हरिभाऊ राठोड, डॉ.मोहमद नदीम, महेश खडसे, अजय पुरोहित, पुंडलिक टारफे, उपसभापती अवधूत मस्के, अनिल शिंदे, जकी अन्वर, अ‍ॅड.गजानन देशमुख आदी उपस्थित होते.