शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला उमरखेडमध्ये खिंडार

By admin | Updated: October 27, 2016 01:01 IST

नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण सध्या तापले असून रोज नवनवीन उलथापालथ शहरात होत आहे

माहेश्वरी गटाने काँग्रेस सोडली : भाजपा-परिवर्तन आघाडीची स्थापना उमरखेड : नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण सध्या तापले असून रोज नवनवीन उलथापालथ शहरात होत आहे. काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केलेल्या भारत खंदारे हा उमेदवार मान्य नसल्याचा आरोप करुन काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सुरेशचंद्र माहेश्वरी यांनी बंड पुकारले. व भाजपासोबत आघाडी केली. ही माहिती आमदार राजेंद्र नजरधने यांनी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली. त्यामुळे उमरखेड नगरपालिकेच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्व. जेठमलजी माहेश्वरी हे नगराध्यक्ष व माजी आमदार होते. त्यानंतर सलग ११ वर्ष त्यांचे पूत्र सुरेशचंद्र माहेश्वरी यांनी नगराध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले. माहेश्वरी परिवार आतापर्यंत काँग्रेसमध्ये होता. परंतु यावेळी नगराध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसने भारत खंदारे यांना जाहीर केले. यावरून उमरखेड काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. काँग्रेसमधील माहेश्वरी गटाने आपली परिवर्तन आघाडी निर्माण करून भाजपासोबत युतीची घोषणा केली. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये भूकंप निर्माण झाला आहे. यासंदर्भात बुधवारी दिवसभर बैठका झाल्या. भाजपाचे आमदार राजेंद्र नजरधने आणि माजी आमदार उत्तमराव इंगळे यांनी परिवर्तन आघाडीसोबत चर्चा करून दोघांनी एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरविले. त्यानुसार सायंकाळी माजी नगराध्यक्ष सुरेश माहेश्वरी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात येऊन आमदार नजरधने यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टीच्याच चिन्हावर लढणार असून त्यांचे नगरसेवक पदाचे उमेदवारही याच चिन्हावर लढतील, मात्र माहेश्वरी गटाचे परिवर्तन नावाने लढणार असल्याचे सांगितले. २४ जागेसाठी व नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पत्रकार परिषदेला नितीन माहेश्वरी, महेश काळेश्वरकर, नितीन भुतडा, अ‍ॅड. संतोष जैन, सुनील मुडे, दिलीप सुरजे आदींची उपस्थिती होती. बुधवारच्या या घडामोडींमुळे शहरातील राजकारणाने वेगळेच वळण घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. (शहर प्रतिनिधी)शहरात विविध चर्चांंना उधाणउमरखेड नगरपरिषदेसाठी लवकरच निवडणूक होऊ घातली आहे. त्या दृष्टीकोणातून प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असताना ऐनवेळेवर शहर काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले. दिवसभर सर्वत्र नगरपरिषद निवडणूक व राजकीय चर्चा होती. माहेश्वरी कुटुंबीय काँग्रेसचे निष्ठावंत असून गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षात कार्यरत आहे. असे असताना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार परस्पर जाहीर केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करून परिवर्तन आघाडीची घोषणा केली. एवढ्यावरच न थांबता भाजपासोबत युती जाहीर केली. या सर्व घडामोडींचा शहर काँग्रेसला नगरपरिषद निवडणुकीत फटका बसू शकेल, अशी चर्चा सुरु आहे.