शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

काँग्रेसला उमरखेडमध्ये खिंडार

By admin | Updated: October 27, 2016 01:01 IST

नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण सध्या तापले असून रोज नवनवीन उलथापालथ शहरात होत आहे

माहेश्वरी गटाने काँग्रेस सोडली : भाजपा-परिवर्तन आघाडीची स्थापना उमरखेड : नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण सध्या तापले असून रोज नवनवीन उलथापालथ शहरात होत आहे. काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केलेल्या भारत खंदारे हा उमेदवार मान्य नसल्याचा आरोप करुन काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सुरेशचंद्र माहेश्वरी यांनी बंड पुकारले. व भाजपासोबत आघाडी केली. ही माहिती आमदार राजेंद्र नजरधने यांनी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली. त्यामुळे उमरखेड नगरपालिकेच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्व. जेठमलजी माहेश्वरी हे नगराध्यक्ष व माजी आमदार होते. त्यानंतर सलग ११ वर्ष त्यांचे पूत्र सुरेशचंद्र माहेश्वरी यांनी नगराध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले. माहेश्वरी परिवार आतापर्यंत काँग्रेसमध्ये होता. परंतु यावेळी नगराध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसने भारत खंदारे यांना जाहीर केले. यावरून उमरखेड काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. काँग्रेसमधील माहेश्वरी गटाने आपली परिवर्तन आघाडी निर्माण करून भाजपासोबत युतीची घोषणा केली. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये भूकंप निर्माण झाला आहे. यासंदर्भात बुधवारी दिवसभर बैठका झाल्या. भाजपाचे आमदार राजेंद्र नजरधने आणि माजी आमदार उत्तमराव इंगळे यांनी परिवर्तन आघाडीसोबत चर्चा करून दोघांनी एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरविले. त्यानुसार सायंकाळी माजी नगराध्यक्ष सुरेश माहेश्वरी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात येऊन आमदार नजरधने यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टीच्याच चिन्हावर लढणार असून त्यांचे नगरसेवक पदाचे उमेदवारही याच चिन्हावर लढतील, मात्र माहेश्वरी गटाचे परिवर्तन नावाने लढणार असल्याचे सांगितले. २४ जागेसाठी व नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पत्रकार परिषदेला नितीन माहेश्वरी, महेश काळेश्वरकर, नितीन भुतडा, अ‍ॅड. संतोष जैन, सुनील मुडे, दिलीप सुरजे आदींची उपस्थिती होती. बुधवारच्या या घडामोडींमुळे शहरातील राजकारणाने वेगळेच वळण घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. (शहर प्रतिनिधी)शहरात विविध चर्चांंना उधाणउमरखेड नगरपरिषदेसाठी लवकरच निवडणूक होऊ घातली आहे. त्या दृष्टीकोणातून प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असताना ऐनवेळेवर शहर काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले. दिवसभर सर्वत्र नगरपरिषद निवडणूक व राजकीय चर्चा होती. माहेश्वरी कुटुंबीय काँग्रेसचे निष्ठावंत असून गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षात कार्यरत आहे. असे असताना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार परस्पर जाहीर केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करून परिवर्तन आघाडीची घोषणा केली. एवढ्यावरच न थांबता भाजपासोबत युती जाहीर केली. या सर्व घडामोडींचा शहर काँग्रेसला नगरपरिषद निवडणुकीत फटका बसू शकेल, अशी चर्चा सुरु आहे.