शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

काँग्रेसला स्वीकारण्याची तयारी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:35 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे २०१४ पेक्षाही पानीपत झाले. त्यावेळी मतदारांनी निष्क्रीय काँग्रेसला झिडकारले होते. परंतु गेल्या पाच वर्षात काँग्रेस सक्रियच झाली नाही. त्यामुळे काँग्रेसला स्वीकारण्याची मतदारांची अद्यापही मानसिक तयारी झाली नसल्याचे यावेळच्या निकालावरून दिसून येते.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक । २०१४ ला झिडकारले, २०१९ लाही नाकारले, आत्मचिंतनाची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे २०१४ पेक्षाही पानीपत झाले. त्यावेळी मतदारांनी निष्क्रीय काँग्रेसला झिडकारले होते. परंतु गेल्या पाच वर्षात काँग्रेस सक्रियच झाली नाही. त्यामुळे काँग्रेसला स्वीकारण्याची मतदारांची अद्यापही मानसिक तयारी झाली नसल्याचे यावेळच्या निकालावरून दिसून येते.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर प्रचंड मरगळ आली होती. त्यातच नरेंद्र मोदींची मोठी व उघड लाट होती. त्यात काँग्रेस भूईसपाट झाली. २०१९ मध्ये नोटाबंदी, जीएसटी सारख्या निर्णयामुळे भाजप लोकसभेतील जागांबाबत अर्ध्यावर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात २०१९ मध्ये २०१४ पेक्षाही भाजप आघाडीची कामगिरी सरस राहिली. सलग दहा वर्षासाठी मतदारांनी काँग्रेसला नाकारले. यामागे काँग्रेसची निष्क्रीयता, गटबाजी, मवाळ भूमिका, सत्तेसाठी व वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय तडजोडी, विरोधकांशी घरठाव आदी कारणे सांगितली जात आहे. २०१४ च्या पानीपतपासून धडा घेऊन काँग्रेसने गेली पाच वर्ष जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणे, आक्रमक आंदोलने करणे, पक्षबांधणीवर जोर देणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात यापैकी काहीही काँग्रेसला साध्य करता आले नाही. काँग्रेसची आंदोलने फोटो-बातमीपुरतीच मर्यादित राहिली. आक्रमकता तर पहायलाच मिळाली नाही. वास्तविक काँग्रेसने आक्रमक भूमिका घ्यावी, जनतेचे प्रश्न सोडवावे, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. काँग्रेसचे नेते वर्चस्व आणि गटातटातच गुंतून राहिले. अखेर व्हायचे तेच झाले. जनतेने या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्टपणे नाकारल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चार महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. किमान आता तरी काँग्रेसचे डोळे उघडते का आणि जनतेच्या प्रश्नावर प्रामाणिक भावनेने काँग्रेसची मंडळी एकजुटीने आंदोलन करते का, समस्या खरोखरच सोडविते का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपचे अपयश आपल्या पथ्यावर पडेल ही काँग्रेसची मानसिकता बदलण्याची प्रतीक्षा आहे.धानोरकरांच्या आक्रमकतेला पसंतीवरोराचे शिवसेना आमदार सुरेश धानोरकर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये आले आणि खासदार म्हणून विजयी झाले. सर्वत्र काँग्रेस हरली असताना एकटे धानोरकरच विजयाचा चमत्कार कसे करू शकले, याचीच चर्चा रंगते आहे. मुळात मतदारांना जनतेच्या प्रश्नावर आक्रमकता भावते. ही आक्रमकता शिवसेनेतील सुरेश धानोरकर यांच्यात मतदारांनी पाहिली आणि त्यांना आक्रमक खासदार म्हणून पसंती दिली, असे मानले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालchandrapur-pcचंद्रपूर