शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

काँग्रेसला स्वीकारण्याची तयारी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:35 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे २०१४ पेक्षाही पानीपत झाले. त्यावेळी मतदारांनी निष्क्रीय काँग्रेसला झिडकारले होते. परंतु गेल्या पाच वर्षात काँग्रेस सक्रियच झाली नाही. त्यामुळे काँग्रेसला स्वीकारण्याची मतदारांची अद्यापही मानसिक तयारी झाली नसल्याचे यावेळच्या निकालावरून दिसून येते.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक । २०१४ ला झिडकारले, २०१९ लाही नाकारले, आत्मचिंतनाची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे २०१४ पेक्षाही पानीपत झाले. त्यावेळी मतदारांनी निष्क्रीय काँग्रेसला झिडकारले होते. परंतु गेल्या पाच वर्षात काँग्रेस सक्रियच झाली नाही. त्यामुळे काँग्रेसला स्वीकारण्याची मतदारांची अद्यापही मानसिक तयारी झाली नसल्याचे यावेळच्या निकालावरून दिसून येते.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर प्रचंड मरगळ आली होती. त्यातच नरेंद्र मोदींची मोठी व उघड लाट होती. त्यात काँग्रेस भूईसपाट झाली. २०१९ मध्ये नोटाबंदी, जीएसटी सारख्या निर्णयामुळे भाजप लोकसभेतील जागांबाबत अर्ध्यावर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात २०१९ मध्ये २०१४ पेक्षाही भाजप आघाडीची कामगिरी सरस राहिली. सलग दहा वर्षासाठी मतदारांनी काँग्रेसला नाकारले. यामागे काँग्रेसची निष्क्रीयता, गटबाजी, मवाळ भूमिका, सत्तेसाठी व वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय तडजोडी, विरोधकांशी घरठाव आदी कारणे सांगितली जात आहे. २०१४ च्या पानीपतपासून धडा घेऊन काँग्रेसने गेली पाच वर्ष जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणे, आक्रमक आंदोलने करणे, पक्षबांधणीवर जोर देणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात यापैकी काहीही काँग्रेसला साध्य करता आले नाही. काँग्रेसची आंदोलने फोटो-बातमीपुरतीच मर्यादित राहिली. आक्रमकता तर पहायलाच मिळाली नाही. वास्तविक काँग्रेसने आक्रमक भूमिका घ्यावी, जनतेचे प्रश्न सोडवावे, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. काँग्रेसचे नेते वर्चस्व आणि गटातटातच गुंतून राहिले. अखेर व्हायचे तेच झाले. जनतेने या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्टपणे नाकारल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चार महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. किमान आता तरी काँग्रेसचे डोळे उघडते का आणि जनतेच्या प्रश्नावर प्रामाणिक भावनेने काँग्रेसची मंडळी एकजुटीने आंदोलन करते का, समस्या खरोखरच सोडविते का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपचे अपयश आपल्या पथ्यावर पडेल ही काँग्रेसची मानसिकता बदलण्याची प्रतीक्षा आहे.धानोरकरांच्या आक्रमकतेला पसंतीवरोराचे शिवसेना आमदार सुरेश धानोरकर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये आले आणि खासदार म्हणून विजयी झाले. सर्वत्र काँग्रेस हरली असताना एकटे धानोरकरच विजयाचा चमत्कार कसे करू शकले, याचीच चर्चा रंगते आहे. मुळात मतदारांना जनतेच्या प्रश्नावर आक्रमकता भावते. ही आक्रमकता शिवसेनेतील सुरेश धानोरकर यांच्यात मतदारांनी पाहिली आणि त्यांना आक्रमक खासदार म्हणून पसंती दिली, असे मानले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालchandrapur-pcचंद्रपूर