शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

काँग्रेसला स्वीकारण्याची तयारी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:35 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे २०१४ पेक्षाही पानीपत झाले. त्यावेळी मतदारांनी निष्क्रीय काँग्रेसला झिडकारले होते. परंतु गेल्या पाच वर्षात काँग्रेस सक्रियच झाली नाही. त्यामुळे काँग्रेसला स्वीकारण्याची मतदारांची अद्यापही मानसिक तयारी झाली नसल्याचे यावेळच्या निकालावरून दिसून येते.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक । २०१४ ला झिडकारले, २०१९ लाही नाकारले, आत्मचिंतनाची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे २०१४ पेक्षाही पानीपत झाले. त्यावेळी मतदारांनी निष्क्रीय काँग्रेसला झिडकारले होते. परंतु गेल्या पाच वर्षात काँग्रेस सक्रियच झाली नाही. त्यामुळे काँग्रेसला स्वीकारण्याची मतदारांची अद्यापही मानसिक तयारी झाली नसल्याचे यावेळच्या निकालावरून दिसून येते.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर प्रचंड मरगळ आली होती. त्यातच नरेंद्र मोदींची मोठी व उघड लाट होती. त्यात काँग्रेस भूईसपाट झाली. २०१९ मध्ये नोटाबंदी, जीएसटी सारख्या निर्णयामुळे भाजप लोकसभेतील जागांबाबत अर्ध्यावर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात २०१९ मध्ये २०१४ पेक्षाही भाजप आघाडीची कामगिरी सरस राहिली. सलग दहा वर्षासाठी मतदारांनी काँग्रेसला नाकारले. यामागे काँग्रेसची निष्क्रीयता, गटबाजी, मवाळ भूमिका, सत्तेसाठी व वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय तडजोडी, विरोधकांशी घरठाव आदी कारणे सांगितली जात आहे. २०१४ च्या पानीपतपासून धडा घेऊन काँग्रेसने गेली पाच वर्ष जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणे, आक्रमक आंदोलने करणे, पक्षबांधणीवर जोर देणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात यापैकी काहीही काँग्रेसला साध्य करता आले नाही. काँग्रेसची आंदोलने फोटो-बातमीपुरतीच मर्यादित राहिली. आक्रमकता तर पहायलाच मिळाली नाही. वास्तविक काँग्रेसने आक्रमक भूमिका घ्यावी, जनतेचे प्रश्न सोडवावे, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. काँग्रेसचे नेते वर्चस्व आणि गटातटातच गुंतून राहिले. अखेर व्हायचे तेच झाले. जनतेने या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्टपणे नाकारल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चार महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. किमान आता तरी काँग्रेसचे डोळे उघडते का आणि जनतेच्या प्रश्नावर प्रामाणिक भावनेने काँग्रेसची मंडळी एकजुटीने आंदोलन करते का, समस्या खरोखरच सोडविते का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपचे अपयश आपल्या पथ्यावर पडेल ही काँग्रेसची मानसिकता बदलण्याची प्रतीक्षा आहे.धानोरकरांच्या आक्रमकतेला पसंतीवरोराचे शिवसेना आमदार सुरेश धानोरकर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये आले आणि खासदार म्हणून विजयी झाले. सर्वत्र काँग्रेस हरली असताना एकटे धानोरकरच विजयाचा चमत्कार कसे करू शकले, याचीच चर्चा रंगते आहे. मुळात मतदारांना जनतेच्या प्रश्नावर आक्रमकता भावते. ही आक्रमकता शिवसेनेतील सुरेश धानोरकर यांच्यात मतदारांनी पाहिली आणि त्यांना आक्रमक खासदार म्हणून पसंती दिली, असे मानले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालchandrapur-pcचंद्रपूर