शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

काँग्रेसच्या कार्यकाळातील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

By admin | Updated: December 18, 2014 23:02 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांवर करण्यात आलेल्या नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

जिल्हा नियोजन समिती : नव्या नियुक्त्यांसाठी हवेत पालकमंत्री यवतमाळ : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांवर करण्यात आलेल्या नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. शासनाने १७ डिसेंबर रोजी या संबंधीचे आदेश जारी केले आहे. जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार प्रस्ताव शासनाकडे पाठवायचे आहेत. मात्र शासनाने अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याच केलेल्या नाहीत. आधी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यात होतील त्यानंतर जिल्हा नियोजन समितीवर कुणाला घ्यायचे याच्या शिफारसी केल्या जाणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळात जिल्हा, तालुका समित्या, मंडळ-महामंडळे यावरील नियुक्त्यांचा वाद संपूर्ण पाच वर्ष सुरू होता. अनेक महामंडळांवर तर सरकारचा कार्यकाळ पूर्ण होऊनही नियुक्त्या झाल्या नाही. त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील आपसी वाद कारणीभूत ठरला होता. काही समित्यांवर अखेरच्या सहा महिन्यात नियुक्त्या केल्या गेल्या. आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळातील तीन-चार जागांप्रमाणेच अनेक तालुका, जिल्हा समित्यांसह मंडळ-महामंडळांवरील काही जागाही अखेरपर्यंत रिक्त ठेवल्या गेल्या. पक्षांतर्गत बंडखोर व नाराज कार्यकर्त्यांना याच रिक्त पदांचे अखेरपर्यंत गाजर दाखविले गेले. या रिक्त जागा भरणे काँग्रेस सरकारने नियोजनपूर्वक टाळले होते. आता राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार आपल्या कार्यकर्त्यांच्या विविध समित्या, मंडळ-महामंडळांवर तत्काळ नियुक्त्या करते की त्यांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करायला लावते याकडे लक्ष लागले आहे. सरकार हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाऊनही अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या नाहीत. ते पाहता युती सरकारचा कारभारही आघाडी सरकारप्रमाणेच तर राहणार नाही ना अशी हूरहूर कार्यकर्त्यांना लागली आहे. युती शासनाने काँग्रेसच्या कार्यकाळातील जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्यांच्या जुन्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. याच प्रमाणे जिल्हास्तरावरील व तालुका स्तरावरील अन्य समित्याही रद्द होणार आहे. तेथे भाजपा-शिवसेना पक्षाच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना नियुक्त्या दिल्या जाणार आहे. नव्या नियुक्त्यांच्या शिफारसी पालकमंत्री करतील. मात्र सध्या पालकमंत्रीच अस्तित्वात नसल्याने या नियुक्त्या लांबण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)