शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

काँग्रेस-राष्ट्रवादी फिप्टी-फिप्टी

By admin | Updated: July 20, 2014 00:08 IST

जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक पार पडली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला समान तीन जागा मिळाल्या. तर एका जागेवर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला.

नगराध्यक्ष निवडणूक : चार महिलांना संधी, उपाध्यक्षपदांवर काँग्रेसचे वर्चस्वयवतमाळ : जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक पार पडली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला समान तीन जागा मिळाल्या. तर एका जागेवर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. उमरखेड, आर्णी व दारव्हा नगरपरिषदा काँग्रेसच्या तर यवतमाळ, पुसद व घाटंजी नगरपरिषदा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या. दिग्रसमध्ये दोन्ही पदावर परिवर्तन विकास आघाडीने बाजी मारली. नगराध्यक्षाच्या सात पैकी चार जागांवर महिलांना संधी मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सातपैकी सर्वाधिक पाच जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या. भाजपाला केवळ एक उपाध्यक्षपद मिळाले. यवतमाळच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष राय तर उपाध्यक्षपदी भाजपाचे मनीष दुबे बिनविरोध विजयी झाले. उपाध्यक्षपद भाजपाच्या मनीष दुबे यांना देण्यात आले. दारव्हा नगरपरिषदेत अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष अशोक चिरडे यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली. आर्णीमध्ये काँग्रेसचे नगर उपाध्यक्ष आरिज बेग यांना बढती देत नगराध्यक्ष बनविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने यवतमाळसह तीन नगरपरिषदांवर आपले वर्चस्व निर्माण केले. घाटंजीमध्ये राष्ट्रवादीच्या चंद्ररेखा रामटेके बिनविरोध निवडून आल्या. पुसदमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसची युती झाली. तेथे राष्ट्रवादीच्या माधवी गुल्हाने निवडून आल्या. दिग्रसच्या नगराध्यक्षपदी परिवर्तन विकास आघाडीच्या सरिता धुर्वे विजयी झाल्या आहेत. नगर उपाध्यक्ष पदासाठी सात पैकी पाच जागेवर निवडणूक पार पडली. तर दोन जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. यवतमाळात भाजपाचे मनीष दुबे, दिग्रसमध्ये परिवर्तनचे डॉ. मुश्ताक प्यार मोहंमद बिनविरोध निवडले गेले. पुसदमध्ये काँग्रेसचे डॉ. मोहंमद नदीम, उमरखेडमध्ये काँग्रेसच्या नजमाबी दौलतखान, घाटंजीत काँग्रेसचे परेश कारिया, आर्णीमध्ये काँग्रेसच्या नीता ठाकरे तर दारव्ह्यामध्ये काँग्रेसच्या माधुरी गडपायले उपाध्यक्ष पदी विजयी झाल्या. यवतमाळ नगरपरिषदेत अध्यक्षपद हातून गेल्यानंतर किमान उपाध्यक्षपद तरी पदरी पडावे म्हणून काँग्रेसने अखेरची धडपड चालविली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. गटनेते पदावरूनच काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये दोन गट पडले. काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी अवघ्या तासाभरात दोन गट नेते बदलविल्याने जिल्हा प्रशासनही संभ्रमात पडले होते. नगराध्यक्ष सुभाष राय यांच्या निवडीनंतर यवतमाळ शहरातून विजयी रॅली काढण्यात आली. त्यांचे चौकाचौकात स्वागत आणि पेढेतुला करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)