शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

काळा चहा पिऊन काँग्रेस नेत्यांनी केला मोदी सरकारचा निषेध

By admin | Updated: June 17, 2016 02:41 IST

दोन वर्षांपूर्वी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांना ‘आत्महत्या करू नका, सर्व काही ठिक होईल’ असे आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा

‘चाय की चर्चा’ : मोदींच्या पदवी आणि चहा विक्रीवर व्यक्त केला संशय आर्णी : दोन वर्षांपूर्वी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांना ‘आत्महत्या करू नका, सर्व काही ठिक होईल’ असे आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा गुरुवारी काँग्रेसने काळा चहा पिऊन निषेध नोंदविला. आर्णी येथील दाभडी रोडवर हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारला केंद्रात दोन वर्ष पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘चाय की चर्चा’ हे प्रतिकात्मक आंदोलन येथे केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिग्वीजयसिंग, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरींदरसिंग ब्रार, खासदार राज बब्बर, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम, आमदार अमित झणक, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार हरिभाऊ राठोड, उत्तर प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी हिंमतसिंग, तेलंगणाचे माजीमंत्री रामचंद्र रेड्डी, माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, संजय देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, विजय खडसे, विजयाताई धोटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, आर्णीचे नगराध्यक्ष आरीज बेग, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, भारत राठोड, जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजीराव मोघे यांनी केले. यावेळी दिग्वीजयसिंग यांनी मोदी सरकारच्या कारभारावर कठोर शब्दात टीका केली. त्यांनी मोदींची चहा विक्री आणि महाविद्यालयीन पदवीवर संशय व्यक्त करताना त्यांचा मित्र अथवा चहा खरेदीदार दाखविल्यास दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. अशोकराव चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने शेतकऱ्यांचे काहीही भले केले नाही. शेतकऱ्यांनी आता काळजी करू नये, कारण त्यांची लढाई लढण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नसल्याचे राज बब्बर यांनी सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. तर कार्यक्रमाचे संचालन नगराध्यक्ष आरीज बेग यांनी केले. या कार्यक्रमाला शेतकरी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भर ुउन्हातही नागरिक पूर्णवेळ थांबून होते. पाहुण्यांचे बैलगाडीतून कार्यक्रमस्थळी आगमन झाले. काळा चहा पिऊन काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदविला. यावेळी भाजपा, राष्ट्रवादी, मनसेने काँग्रेस विरोधी पत्रके वाटली. (शहर प्रतिनिधी)