शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

काळा चहा पिऊन काँग्रेस नेत्यांनी केला मोदी सरकारचा निषेध

By admin | Updated: June 17, 2016 02:41 IST

दोन वर्षांपूर्वी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांना ‘आत्महत्या करू नका, सर्व काही ठिक होईल’ असे आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा

‘चाय की चर्चा’ : मोदींच्या पदवी आणि चहा विक्रीवर व्यक्त केला संशय आर्णी : दोन वर्षांपूर्वी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांना ‘आत्महत्या करू नका, सर्व काही ठिक होईल’ असे आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा गुरुवारी काँग्रेसने काळा चहा पिऊन निषेध नोंदविला. आर्णी येथील दाभडी रोडवर हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारला केंद्रात दोन वर्ष पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘चाय की चर्चा’ हे प्रतिकात्मक आंदोलन येथे केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिग्वीजयसिंग, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरींदरसिंग ब्रार, खासदार राज बब्बर, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम, आमदार अमित झणक, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार हरिभाऊ राठोड, उत्तर प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी हिंमतसिंग, तेलंगणाचे माजीमंत्री रामचंद्र रेड्डी, माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, संजय देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, विजय खडसे, विजयाताई धोटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, आर्णीचे नगराध्यक्ष आरीज बेग, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, भारत राठोड, जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजीराव मोघे यांनी केले. यावेळी दिग्वीजयसिंग यांनी मोदी सरकारच्या कारभारावर कठोर शब्दात टीका केली. त्यांनी मोदींची चहा विक्री आणि महाविद्यालयीन पदवीवर संशय व्यक्त करताना त्यांचा मित्र अथवा चहा खरेदीदार दाखविल्यास दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. अशोकराव चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने शेतकऱ्यांचे काहीही भले केले नाही. शेतकऱ्यांनी आता काळजी करू नये, कारण त्यांची लढाई लढण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नसल्याचे राज बब्बर यांनी सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. तर कार्यक्रमाचे संचालन नगराध्यक्ष आरीज बेग यांनी केले. या कार्यक्रमाला शेतकरी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भर ुउन्हातही नागरिक पूर्णवेळ थांबून होते. पाहुण्यांचे बैलगाडीतून कार्यक्रमस्थळी आगमन झाले. काळा चहा पिऊन काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदविला. यावेळी भाजपा, राष्ट्रवादी, मनसेने काँग्रेस विरोधी पत्रके वाटली. (शहर प्रतिनिधी)