शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

काँग्रेस नेत्यांना चिंतनाचीही गरज नाही !

By admin | Updated: November 18, 2014 23:02 IST

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना लोटला आहे. परंतु जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना अद्यापही या पराभवाचे चिंतन करण्याची आवश्यकता वाटलेली नाही. चिंतन बैठक घेतल्यास

तब्बल महिना लोटला : कार्यकर्त्यांकडून धारेवर धरले जाण्याची भीती यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना लोटला आहे. परंतु जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना अद्यापही या पराभवाचे चिंतन करण्याची आवश्यकता वाटलेली नाही. चिंतन बैठक घेतल्यास धाडसी कार्यकर्त्यांकडून चिरफाड होण्याची हूरहूरही या नेत्यांना आहे. जिल्ह्यात वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ व उमरखेड या काँग्रेसच्या हाती असलेल्या पाचही जागांवर भाजपाने कब्जा केला आहे. विधानसभा निवडणुकांचा दीर्घ अनुभव पाठिशी असलेल्या दिग्गज काँग्रेस नेत्यांना पराभूत करून भाजपाचे नवखे चेहरे निवडून आले आहेत. काँग्रेसच्या या नेत्यांना मतदारांनीच धडा शिकविला आहे. निवडून देणाऱ्या मतदारांची कामे न करणे, कार्यकर्त्यांना दूर ठेवणे, त्यांची साधी शिफारस पत्राचीही कामे न होणे, मतदारसंघात संपर्कात न राहणे, सामान्यांच्या विकास कामाऐवजी मोठ्या मार्जीनच्या कामांना प्राधान्य देणे, निवडक कार्यकर्ते-कंत्राटदारांच्या चौकडीत वावरणे, निष्ठावंतांना डावलणे आदी कारणे काँग्रेसच्या पराभवासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नेत्यांचेच वेगवेगळे गट पडले. पर्यायाने कार्यकर्तेही विभागले गेले. पक्षाच्याच नेत्यांच्या विरोधात या कार्यकर्त्यांना वापरले गेले. अखेर मतदारांनी काँग्रेसच्या या गटातटाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना पराभूत केले. विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसचे हे नेते खळबडून जागे होतील, पुन्हा मतदारांच्या, कार्यकर्त्यांच्या गावात जातील, मतदारांनी आपल्याला नेमके का नाकारले, याचे आत्मचिंतन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात असे काहीही होताना दिसत नाही. काँग्रेसचे तब्बल पाच आमदार जिल्ह्यात पराभूत होऊनही जिल्हा काँग्रेस कमिटीला या पराभवाची कारणमिमांसा करण्याची गरज वाटली नाही. काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्या मात्र पराभवावर त्यात ब्रसुद्धा काढला गेला नाही. काँग्रेसने पराभवाची कारणे शोधण्यासाठी कार्यकर्त्यांची चिंतन बैठक बोलविल्यास हे कार्यकर्ते धारेवर धरण्याची भीती या नेत्यांना वाटत असल्याची काँग्रेसच्याच गोटातील माहिती आहे. शरद पवारांनी मंगळवारी अलिबागमध्ये चिंतन बैठक घेऊन सरकारच्या अस्थिरतेचे आणि कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणुका लागण्याचे संकेत दिले. काँग्रेसच्या गोटात मात्र सर्वत्र सामसूम आहे. काँग्रेस पराभवामागे सारखीच कारणे आहे. पराभवानंतरही काँग्रेसचे नेते जनतेच्या दरबारात गेले नाहीत. जिल्ह्यातील दोन हजार गावातील शेतकरी दुष्काळाचा सामना करतो आहे. मात्र पराभूत आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. विरोधी पक्षात असल्याने या पराभूत आमदारांकडून जनता मोर्चे-आंदोलनांची अपेक्षा ठेऊन आहे. मात्र या नेत्यांनी अद्यापही आपल्या आलिशान वाहनांचे काळे काच खाली केलेले नाहीत, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी)