शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेत्यांची ‘डिनर डिप्लोमसी’

By admin | Updated: April 4, 2015 23:53 IST

यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेते-पदाधिकाऱ्यांना गटबाजीने पोखरले असताना गेल्या कित्येक वर्षांनंतर येथील पाच प्रमुख नेते जेवणासाठी ...

भवितव्यावर चर्चा : नवी टीम, अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या प्रभावाचा मेन्यूयवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेते-पदाधिकाऱ्यांना गटबाजीने पोखरले असताना गेल्या कित्येक वर्षांनंतर येथील पाच प्रमुख नेते जेवणासाठी का होईना एकत्र बसल्याने राजकीय गोटात चर्चेचा विषय आहे. नेत्यांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’त नेमके काय शिजले, याचा अंदाज बांधला जात आहे.दारव्हा रोडवरील एका हॉटेलात गुरुवार, २ एप्रिल रोजी रात्री ही भोजन-बैठक झाली. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, माजी राज्यमंत्री संजय देशमुख आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार या पाच नेत्यांची ही बैठक झाली. विशेष असे, या बैठकीतून आपल्या कोणत्याही निकटस्थ कार्यकर्ते, पीएला दूर ठेवण्यात आले होते. ‘नेते केवळ जेवणासाठी गेले होते’ एवढे सहज वर्णन त्यांच्या निकटवर्तीयांकडून केले जात असले तरी प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. या बैठकीत पाचही प्रमुख नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केल्याची माहिती आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलले. ते आता राज्यात आपली नवी टीम तयार करणार. या टीममध्ये जिल्ह्यातून कुणाचा समावेश करावा, त्यांनी चेंज सुचविल्यास नवा जिल्हाध्यक्ष कोण असावा, यावर चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या गोटात सध्या शांतता दिसत असली तरी भविष्यात त्यांच्या राजकीय हालचाली वाढण्याची चिन्हे आहेत. ते पाहता कोणत्याही परिस्थितीत मैदानात राहून राष्ट्रवादीला ‘चेक’ देण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आल्याचे सांगण्यात येते.जिल्ह्यात काँग्रेसमध्ये अनेक गट पाहायला मिळतात. नेत्यांमधील या गटबाजीने कार्यकर्तेही विभागले गेले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या गटबाजीचा फटका बसला. काँग्रेसच्या ताब्यातील पाचही जागा निघून जाण्यामागे अनेक कारणांपैकी गटबाजी हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण ठरले. मात्र त्यानंतरही ही गटबाजी नियंत्रणात आली नाही. त्यातील भांडणे अलीकडे दिल्ली, मुंबईपर्यंत पोहोचली नाहीत, एवढेच. मात्र खासगीत संधी मिळेल तेव्हा श्रेष्ठींकडे आपल्या विरोधी गटाचा काटा काढण्यात कुणीही कसर ठेवली नाही. आतापर्यंत केवळ पक्षाच्या बैठकीच्यावेळी एका ठिकाणी दिसणारे आणि तेथून निघताच एकमेकांकडे पाठ करून फिरणारे जिल्ह्यातील प्रमुख पाच नेते जेवणाच्या टेबलवर एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)वर्चस्व कायम ठेवण्याचा खटाटोप जिल्हा काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांची साठमारी झाली होती. पक्षातील प्रवाहच संपुष्टात आणला होता. नेते मंडळी आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचेच पूत्र निवडणूक रिंगणात उतरविण्याची धडपड सुरू होती. आपल्याच कुटुंबातील व्यक्तीचे राजकीय पुनर्वसन व्हावे, असा प्रयत्न काँग्रेसच्या सर्वच स्थानिक नेत्यांकडून कमी-अधिक प्रमाणात करण्यात आला. परिणामी पक्षासाठी धडपडणारा कार्यकर्त्याच दूर गेला. केवळ नेत्यांची फौज असलेला पक्ष अशी ओळख निर्माण झाली. त्याचा परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून दिसून आला. आतासुद्धा ही नेते मंडळी पराभव स्वीकारायला तयार नाही. पक्षातील नव्या नेतृत्वाला संधी देण्याऐवजी अस्तित्वात येणाऱ्या कार्यकारिणीवर आपले वर्चस्व कसे कायम राखता येईल, याचा खटाटोप केला जात आहे. आज विरोधक म्हणून पक्ष सक्रिय होताना दिसत नाही. काही निवडक पदाधिकाऱ्यांना घेऊन निवेदन देण्यापुरताच उपक्रम राबविला जात असल्याचे चित्र आहे.