शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

दारव्हा येथे काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: December 22, 2016 00:14 IST

शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या मागण्यांसाठी तालुका काँग्रेसच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

दारव्हा : शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या मागण्यांसाठी तालुका काँग्रेसच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीमधून निघालेला मोर्चा तहसीलवर पोहोचल्यानंतर याठिकाणी सभा घेण्यात आली. मोर्चात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, पक्षाचे निरीक्षक श्याम उमाळकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, देवानंद पवार, मनमोहनसिंह चव्हाण, पंढरीनाथ सिंहे, माजी नगराध्यक्ष सैयद फारूक, अशोक चिरडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, महिला काँग्रेसच्या विजया सांगळे यांचा प्रामुख्याने सहभाग होता. आजच्या घडीला जनसामान्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या समस्या सोडवायच्या सोडून सरकार नाही ते प्रश्न उपस्थित करून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केला. प्रसंगी संजय देशमुख, श्याम उमाळकर, देवानंद पवार, विजया सांगळे, ज्ञानेश्वर बोरकर, पंढरीनाथ सिंहे आदींची भाषणे झाली. नोटबंदी, मायक्रो फायनान्स, शासनाचे शेतकरी विरोधी धोरण, जनधन योजना यासह विविध विषयांचा आपल्या भाषणात उल्लेख करून केंद्र व राज्य शासनावर टीकेची झोड उठविली. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा, उद्योजकांच्या धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, संपूर्ण कार्डधारकांना रेशनचा पुरवठा व्हावा, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, गरजूंना घरकुले द्यावी, महिला बचत गट आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ व्हावे, श्रावणबाळ योजनेचे अनुदान वाढवून मिळावे आदी मागण्यांचा समावेश या निवेदनात केला आहे. (तालुका प्रतिनिधी)