शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

जिल्ह्यातील सातही मतदार संघात काँग्रेसला नाकारले

By admin | Updated: October 19, 2014 23:18 IST

पाच वर्षांपूर्वी सात पैकी तब्बल पाच आमदार निवडून देणाऱ्या जिल्ह्यातील मतदारांनी या निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना नाकारले.

यवतमाळ : पाच वर्षांपूर्वी सात पैकी तब्बल पाच आमदार निवडून देणाऱ्या जिल्ह्यातील मतदारांनी या निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना नाकारले. राळेगाव, उमरखेड, आर्णी या मतदारसंघात काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली. तर वणी, दिग्रसमध्ये तिसऱ्या, यवतमाळ व पुसदमध्ये चौथ्या स्थानावर काँग्रेस उमेदवार फेकले गेले. सातपैकी तीन उमेदवारांना आपले डिपॉझिटही वाचविता आले नाही. त्यामध्ये खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मुलाचाही समावेश आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पाचही जागा यावेळी मतदारांनी त्यांच्याकडून काढून घेऊन भाजपाच्या हाती दिल्या आहेत. यावरून काँग्रेस प्रती मतदारांमध्ये असलेली चिड स्पष्ट होते. अशीच अवस्था जिल्ह्यात पक्ष संघटनेची झालेली आहे. प्रदेशाध्यक्षांचा गृहजिल्हा असूनही येथे पक्षाची जिल्हा कार्यकारिणी नाही. या कार्यकारिणीशिवाय पक्ष निवडणुकीला सामोरे गेला. जिल्हा काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी आहे. प्रदेशाध्यक्ष विरुद्ध इतर असे चित्र या निवडणुकीत पहायला मिळाले. जिल्ह्यातील काँग्रेसच्या मंत्री-आमदारांना शह देण्यासाठी त्यांच्या बंडखोरांना आश्रय देणे प्रदेशाध्यक्षांना चांगलेच भोवले. पक्ष संघटन खिळखिळे झाले आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. जिल्ह्यात पाच वर्षे पाच आमदार आणि प्रदेशाध्यक्षपद असूनही जिल्ह्याच्या पदरी काहीच पडले नाही. साडेपाच वर्ष टाईमपास केल्यानंतर अखेरच्या सहा महिन्यात काँग्रेसच्या आमदारांनी भूमिपूजनाचा सपाटा लावून केवळ विकास कामांचा देखावा निर्माण केला. त्यामुळेच मतदारांनी काँग्रेसला जिल्ह्यात सपशेल नाकारले. पाचवरून शून्यावरसन २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने जिल्ह्यातील वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, उमरखेड या सात पैकी पाच जागा आपल्याकडे खेचून आणल्या होत्या. त्यावेळी या सर्व जागांचे श्रेय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्वत:कडे घेतले होते. मात्र आता त्यांच्याच कार्यकाळात काँग्रेस या पाच जागांवरून शुन्यावर आली आहे.