शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस दिल्लीत, भाजपा दाभडीत

By admin | Updated: May 18, 2017 00:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाभडी गावासाठी काहीच केले नाही, याचे स्मरण करून देण्यासाठी काँग्रेसची नेते मंडळी बुधवारी दिल्लीला रवाना झाली.

‘चाय पे चर्चा’चे स्मरण : भाजपाची सारवासारव लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाभडी गावासाठी काहीच केले नाही, याचे स्मरण करून देण्यासाठी काँग्रेसची नेते मंडळी बुधवारी दिल्लीला रवाना झाली. तर इकडे दाभडीतील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी भाजपाचे मंत्री, आमदार दाभडीत पोहोचल्याने तेथे विसंगत राजकीय चित्र पहायला मिळाले. तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी या गावातून देशभरातील शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून संवाद साधला होता. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, भाजपाची सत्ता दिल्यास शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील, असे मोदींनी आश्वस्त केले होते. मोदी देशाचे पंतप्रधान झाले. शेतकरी व जनतेने त्यांना एकहाती सत्ता दिली. परंतु आजही शेतकरी उपेक्षितच आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचे वार त्याच्यावर सुरू आहे. शेतकरीच नव्हे तर मोदींनी जेथून संवाद साधला ते दाभडी गावही तीन वर्षानंतरसुद्धा उपेक्षित आहे. तीन वर्षानंतर दाभडीची स्थिती पूर्वीप्रमाणे कायम आहे. याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार व भाजपाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे दिल्लीत धडकणार आहेत. तेथे १८ मेच्या सायंकाळपासून जंतर-मंतरवर काँग्रेस धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनासाठी बुधवारी काँग्रेसचे कार्यकर्ते यवतमाळातून दिल्लीसाठी रवाना झाले. काँग्रेसच्या या आंदोलनाची ‘चर्चा’ झाल्याने भाजपाने दोन-तीन दिवसांपासूनच सारवासारव सुरु केली होती. अपेक्षेनुसार भाजपाने दाभडीत बुधवारी विकास कामांचे भूमिपूजन केले. त्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थित होते. दाभडीचे वास्तव दाखविण्यासाठी काँग्रेसवाले दिल्लीत गेले आणि भाजपावाले दाभडीत आल्याच्या या प्रकाराची जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा आहे. नरेंद्र मोदींच्या घोषणेकडे लक्ष वेधण्यासाठी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसने दाभडीतच ‘चाय की चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता. भाजपाने त्यावेळी दाभडी गावावर विकासाचा फोकस निर्माण करू, असे सांगितले होते. हे गाव दत्तक घेण्याची घोषणाही केली गेली होती. मात्र प्रत्यक्षात काहीही झाले नाही. दाभडीतील भूमिपूजन कार्यक्रमात या गावाचा किती व कसा विकास केला आणि करणार हे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेते मंडळींनी केला.