शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस दिल्लीत, भाजपा दाभडीत

By admin | Updated: May 18, 2017 00:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाभडी गावासाठी काहीच केले नाही, याचे स्मरण करून देण्यासाठी काँग्रेसची नेते मंडळी बुधवारी दिल्लीला रवाना झाली.

‘चाय पे चर्चा’चे स्मरण : भाजपाची सारवासारव लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाभडी गावासाठी काहीच केले नाही, याचे स्मरण करून देण्यासाठी काँग्रेसची नेते मंडळी बुधवारी दिल्लीला रवाना झाली. तर इकडे दाभडीतील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी भाजपाचे मंत्री, आमदार दाभडीत पोहोचल्याने तेथे विसंगत राजकीय चित्र पहायला मिळाले. तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी या गावातून देशभरातील शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून संवाद साधला होता. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, भाजपाची सत्ता दिल्यास शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील, असे मोदींनी आश्वस्त केले होते. मोदी देशाचे पंतप्रधान झाले. शेतकरी व जनतेने त्यांना एकहाती सत्ता दिली. परंतु आजही शेतकरी उपेक्षितच आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचे वार त्याच्यावर सुरू आहे. शेतकरीच नव्हे तर मोदींनी जेथून संवाद साधला ते दाभडी गावही तीन वर्षानंतरसुद्धा उपेक्षित आहे. तीन वर्षानंतर दाभडीची स्थिती पूर्वीप्रमाणे कायम आहे. याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार व भाजपाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे दिल्लीत धडकणार आहेत. तेथे १८ मेच्या सायंकाळपासून जंतर-मंतरवर काँग्रेस धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनासाठी बुधवारी काँग्रेसचे कार्यकर्ते यवतमाळातून दिल्लीसाठी रवाना झाले. काँग्रेसच्या या आंदोलनाची ‘चर्चा’ झाल्याने भाजपाने दोन-तीन दिवसांपासूनच सारवासारव सुरु केली होती. अपेक्षेनुसार भाजपाने दाभडीत बुधवारी विकास कामांचे भूमिपूजन केले. त्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थित होते. दाभडीचे वास्तव दाखविण्यासाठी काँग्रेसवाले दिल्लीत गेले आणि भाजपावाले दाभडीत आल्याच्या या प्रकाराची जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा आहे. नरेंद्र मोदींच्या घोषणेकडे लक्ष वेधण्यासाठी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसने दाभडीतच ‘चाय की चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता. भाजपाने त्यावेळी दाभडी गावावर विकासाचा फोकस निर्माण करू, असे सांगितले होते. हे गाव दत्तक घेण्याची घोषणाही केली गेली होती. मात्र प्रत्यक्षात काहीही झाले नाही. दाभडीतील भूमिपूजन कार्यक्रमात या गावाचा किती व कसा विकास केला आणि करणार हे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेते मंडळींनी केला.