शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस उमेदवारांचा निर्णय मुंबईत

By admin | Updated: January 15, 2017 00:59 IST

जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या निवड मंडळाकडून स्थानिक पातळीवर मुलाखतींची खानापूर्ती केली जाणार आहे

निवडणूक : यवतमाळात केवळ मुलाखतींची खानापूर्ती यवतमाळ : जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या निवड मंडळाकडून स्थानिक पातळीवर मुलाखतींची खानापूर्ती केली जाणार आहे. उमेदवार नेमका कोण याचा निर्णय मात्र मुंबईत प्रदेशाध्यक्ष घेणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ६२ जागा आणि १६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद आहे. सात पैकी पाच आमदार असलेल्या सत्ताधारी भाजपाकडे जेवढे अर्ज आले, तेवढेच काँग्रेसकडेही आले आहेत. यावरून मोदी लाट ओसरत असल्याचे मानले जाते. नोटाबंदीनंतर मोदी लाटेला उतरती कळा लागल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. काँग्रेसकडे दीड हजारांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १७ व १८ जानेवारी रोजी घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी दिग्गज नेत्यांचा समावेश असलेले २० सदस्यीय निवड मंडळ आहे. परंतु या मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या मुलाखती जणू फॉर्मेलिटी ठरणार आहेत. कारण प्राप्त अर्ज हे निवड मंडळाकडून आपल्या शिफारसीसह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाला पाठविले जाणार आहे. अर्थात यवतमाळ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांमध्ये काँग्रेसचा कोण उमेदवार रहावा याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या स्तरावर घेतला जाणार आहे. तेथे निवड मंडळाने केलेल्या शिफारसी स्वीकारणे बंधनकारक नसल्याने या शिफारसी झुगारुन अन्य नावांवर विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार स्थानिक पातळीवर ठरणार असताना काँग्रेसच्या उमेदवारांचा निर्णय मात्र मुंबईत होणार असल्याने राजकीय गोटात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यात लॉबिंगमुळे एखाद्या सक्षम उमेदवारावर अन्याय होण्याची, क्षमता नसलेला उमेदवार लादला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी) गटबाजीमुळे तर नव्हे... ? यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसच्या नेत्यांमधील भांडणे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. या नेत्यांचे अनेक गट पडले आहेत. या गटा-तटामुळे इच्छुक उमेदवारांशी न्याय होण्याची शक्यता नसल्याचे पाहून तर पक्षश्रेष्ठींनी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुकांनी केलेले अर्ज अंतिम निर्णयाकरिता मुंबईत बोलावले नसावे ना अशी शंका राजकीय गोटात व्यक्त केली जात आहे. नेत्यांच्या भांडणात चुकीचा उमेदवार निवडला जाणे व त्याचा फटका पक्षाला बसण्याची भीती आहे. म्हणूनच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी इच्छुकांचे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे बोलविण्याची सावधगिरी बाळगली असावी, असे बोलले जाते.