शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

काँग्रेस मेळाव्यावर दुसऱ्या फळीतील नेत्यांचा बहिष्कार

By admin | Updated: July 19, 2014 01:46 IST

शुक्रवारी काँग्रेसच्या येथे पार पडलेल्या जिल्हा

बंडाचे निशाण कायम : कार्यकर्त्यांना ऐनवेळी निमंत्रण यवतमाळ : शुक्रवारी काँग्रेसच्या येथे पार पडलेल्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यावर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जणू अघोषित बहिष्कार घातला होता. कुणीही असंतुष्ट नेता या मेळाव्याकडे फिरकला नाही. याचीच चर्चा मेळाव्यात होती. काँग्रेसच्या नवनियुक्त विधान परिषद सदस्यांचा सत्कार, लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. मात्र दोन विधान परिषद सदस्य वगळता कुणीही निमंत्रित या सत्काराकडे फिरकले नाही. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विद्यमान मंत्री-आमदार विरुद्ध दुसऱ्या फळीतील नेते असा वाद सुरू आहे. मध्यंतरी स्वाक्षरी मोहीम राबवून हा वाद मिटल्याचे चित्र निर्माण केले गेले. परंतु प्रत्यक्षात हा वाद कायम असल्याचे आज मेळाव्यात पहायला मिळाले. दुसऱ्या फळीतील १६ नेत्यांपैकी केवळ दोन सदस्य मेळाव्याला उपस्थित होते. या दोघांनीही जिल्हाध्यक्ष कायम ठेवण्याच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. दुसऱ्या फळीतील नेत्यांचा हा बहिष्कार पुढे कोणते वळण घेतो याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना हटविण्यात यावे, विद्यमान मंत्री-आमदार व त्यांच्या पूत्रांना आगामी विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करीत दुसऱ्या फळीतील नेत्यांनी उघड बंड पुकारले होते. मेळाव्यावर बहिष्कार टाकून बंडाचे निशाण कायम असल्याचे या नेत्यांनी दाखवून दिले. दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक एका कार्यकर्त्याला या मेळाव्याच्या आयोजनासाठी ‘बकरा’ बनविण्यात आल्याची चर्चा मेळावा स्थळी होती. उमेदवारी मिळण्याच्या आशेने या कार्यकर्त्यानेही अगदी घरच्या लग्नाप्रमाणे या मेळाव्याची तयारी केली होती. या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, पीरिपाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधान परिषद उपाध्यक्ष आमदार वसंतराव पुरके, आमदार नंदिनी पारवेकर, आमदार विजय खडसे, माजी मंत्री संजय देशमुख, आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार विजयाताई धोटे, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)1 काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात दरी वाढली आहे. ही कमी करणे आवश्यक आहे. ही दरीच लोकसभेतील पराभवाला कारणीभूत ठरली. 2जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट असूनही वीज कंपनी शेतकऱ्यांमागे देयक भरण्यासाठी तगादा लावत आहे. हा प्रकार थांबला पाहिजे. काँग्रेसच्या सरकारमध्ये आपण नेत्यांनी पदे भोगली. मात्र कार्यकर्त्यांना सन्मानाचे पद देऊ शकलो नाही. शासकीय समित्या व कार्यकारिणीचे गठण होऊ शकले नाही. 3लोकसभेत आपला पराभव झाला. तरीही चांगली मते घेतल्याचे समाधान आहे. नेते व कार्यकर्त्यांमध्ये आता दरीच उरली नाही, कारण कार्यकर्ते हे नेत्यांसारखे आणि अगदी नेत्यांच्या बरोबरीत राहतात. त्यामुळे कार्यकर्ता कोण आणि नेता कोण हे ओळखणे कठीण आहे. 4 यवतमाळच्या जिल्हाध्यक्षांचे राज्यात सर्वात चांगले काम आहे. जिल्ह्यात कुठेच गटबाजी नाही. त्यांच्या कार्यकाळात पक्षाचे अधिक आमदार निवडून आले. त्यांनी पक्षासाठी घर दिले, आता काय लंगोट सोडून देणार आहेत ? पावसासाठी ईश्वराकडे प्रार्थना करणे एवढेच आपल्या हातात आहे. 5दुसऱ्या फळीतील नेत्यांनी थेट प्रसार माध्यमांकडे जाण्याची आवश्यकता नव्हती. जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष, मंत्री, आमदार असे अनेक पर्याय उपलब्ध आहे. विरोधी पक्षात तर स्वत:चे मत मांडण्याची सोयच नाही. थेट आदेशच धडकतो. तेथे नेत्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्याची कुणाचीच बिशाद नाही. काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांसाठी आता शिस्त असण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. 6आजच्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यातून नवीन आशा, नवे मार्ग निर्माण होतील. नेत्यांनी कार्यकर्त्यांना महत्व दिले पाहिजे. नेत्यांनी कार्यकर्त्यांचे गुणगाण करावे. कारण कार्यकर्त्यांच्या खांद्यावरच नेत्यांच्या विजयाचे गणित अवलंबून असते. मेळाव्यात खुर्च्या तुटल्या ४काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा सुरू झाल्यानंतर काही वेळातच पाठोपाठ खुर्च्या तुटण्यास प्रारंभ झाला. खुर्चीवर बसलेले अनेक जण खुर्च्यांचे पाय तुटल्याने पडले. कार्यक्रमासाठी खुर्च्यांचा पुरवठा करणाऱ्या मंडप डेकोरेशन कंत्राटदाराच्या नावाने उपस्थित कार्यकर्ते बोटे मोडतानी दिसून आले. तर काहींनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या नेत्यांची अशीच गत होणार असल्याची उपरोधिक टीकाही केली.