शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, भाजपाचा सर्वाधिक सरपंच निवडीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:10 IST

नोटाबंदी, जीएसटी, महागाई या मुद्यावर विरोधकांनी वातावरण कलूषित करूनही ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपालाच कौल दिल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळाले.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : भाजपा म्हणते, ९३ पैकी सर्वाधिक ४४ आमचे, काँग्रेस म्हणते, भाजपाला केवळ २२

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नोटाबंदी, जीएसटी, महागाई या मुद्यावर विरोधकांनी वातावरण कलूषित करूनही ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपालाच कौल दिल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळाले. जनतेतून थेट सरपंच निवडणुकीत ९३ पैकी सर्वाधिक ४४ जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार निवडून आल्याचा दावा भाजपाने केला आहे. दरम्यान, सर्वाधिक ४२ सरपंच काँग्रेस पुरस्कृत असल्याचा दावा केला जात असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नाहीत, परंतु भाजपाचे नेते आपले पॅनल किंवा आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवितात. त्याला पक्षाचा पाठिंबा जाहीर करतात. अशा पुरस्कृत उमेदवारांना विजयी करण्यात भाजपाने आघाडी घेतली आहे. यावेळी पहिल्यांदाच नगराध्यक्षाच्या धर्तीवर सरपंचाचीसुद्धा थेट जनतेतून निवडणूक घेण्यात आली. गावचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी जनतेतही प्रचंड उत्साह दिसून आला.जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी ४४ जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले. सरपंच निवडीवरून भाजपा आपलेच वर्चस्व असल्याचे सांगत असले तरी अनेक ठिकाणी सदस्य संख्येत जनतेने दुसºया गटाला कौल दिल्याचीही उदाहरणे पहायला मिळाली. सरपंच थेट जनतेतून असल्याने बहुतांश राजकीय पक्षांनी या एकाच पदाभोवती आपली शक्ती खर्ची घातली. सदस्य पदासाठी तेवढी चढाओढ पहायला मिळाली नाही. सरपंच जनतेतून असल्याने अनेकांनी सदस्य निवडणुकीत तेवढा इन्टरेस्ट घेतला नाही. कित्येकांनी बाहेर राहणेच पसंद केले. अनेक गावांमध्ये इच्छुकांची संख्या बरीच होती. मात्र ऐनवेळी आरक्षण सोईचे न आल्याने त्यांचा हिरमोड झाला.जिल्ह्यात यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी व उमरखेड या विधानसभेच्या पाच जागा भाजपाकडे आहेत. दिग्रस-दारव्हाची जागा शिवसेनेकडे तर पुसदची राष्टÑवादी काँग्रेसकडे आहे. यातील बहुतांश आमदारांनी आपल्या मतदारसंघातील सरपंच निवडून आणण्यात यश मिळविले. जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी आपल्या मतदारसंघातील यवतमाळ तालुक्यात १६ पैकी १३ जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार सरपंच म्हणून निवडून आणले आहेत. अन्य आमदारांनीही आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायती बºयापैकी कायम राखल्या. केवळ उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्याला अपवाद ठरले. त्यांना या तालुक्यात भोपळाही फोडता आला नाही. तेथे चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यातील सरपंच पदाच्या दोन जागा काँग्रेसने तर एक राष्टÑवादीने मिळविली.धानोरा या गावातील सरपंच पद अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी आरक्षित होते. परंतु गावात या संवर्गाचा एकही उमेदवार मिळाला नाही. पर्यायाने तेथील सरपंच पद रिक्त राहिले आहे. नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीत देवराव पाटील पॅनलला पाच तर अन्य गटाला चार जागा मिळाल्या. उमरखेडमधील भाजपा आमदाराचे अपयश राजकीय गोटात चर्चेचा विषय ठरले आहे.विरोधकांचे फंडे फेलनोटाबंदी, जीएसटी, महागाई, पेट्रोल दरवाढ, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कीटकनाशक फवारणीतील मृत्यू, अद्याप एक पैसाही न मिळालेली कर्जमाफी अशा विविध मुद्यांवर काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना व अन्य पक्षांनी भाजपाविरोधात राळ उठविण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर भाजपाविरोधात जणू मोहीमच उघडली गेली. परंतु या मोहिमेचा सामान्य ग्रामीण जनतेवर फारसा परिणाम झाला नसल्याचे ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपा समर्थित उमेदवारांना मिळालेल्या सकारात्मक कौलवरून स्पष्ट होते. ग्रामीण जनता आजही भाजपाच्या कारभारावर खूश असल्याचा दावा या पक्षांच्या नेत्यांकडून केला जात आहे. आगामी लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढण्याची भाषा करणाºया शिवसेनेला विशिष्ट बेल्ट वगळता जिल्ह्यात सर्वत्र फारसे यश मिळविता आलेले नाही. अशीच काहीशी स्थिती काँग्रेसचीही राहिली आहे. राष्टÑवादीला तर पुसद विभागाच्या बाहेर फारसे यश मिळाले नाही.सर्वाधिक ४२ जागांसह काँग्रेस मोठा पक्ष : जिल्हाध्यक्षांचा दावाग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून निवडल्या गेलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपाला केवळ २४ जागा मिळाल्या असून सर्वाधिक ४२ जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत, असा दावा जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. डॉ. मिर्झा म्हणाले, भाजपा पुरस्कृत केवळ २४ सरपंच निवडून आले आहेत. उर्वरित ६९ मध्ये सर्वाधिक ४२ काँग्रेस पुरस्कृत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष राहिला आहे. भाजपाच्या चुकीच्या ध्येय धोरणामुळे आणि केवळ आश्वासनांच्या खैरातमुळे ग्रामीण जनतेने भाजपाला स्पष्टपणे नाकारले आहे. काँग्रेस पक्षसंघटन बांधणीत आणि भाजपाचे खरे रुप जनतेपुढे आणण्यात आणखी प्रयत्न करणार असून आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे निकाल यापेक्षाही सरस राहतील, असा दावा डॉ. मिर्झा यांंनी केला आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील यवतमाळ तालुक्यामध्ये १६ पैकी भाजपाला केवळ चार जागा मिळाल्याचे सांगत काँग्रेस पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार सात जागांवर विजयी झाल्याचा दावाही डॉ. मिर्झा यांनी केला आहे. भाजपाने दिलेली आकडेवारी खोटी असून आपण गावनिहाय काँग्रेसचे विजयी उमेदवार सांगू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.दिग्रस, दारव्हा, वणीत सेना तर पुसदमध्ये राष्टÑवादीभाजपाचे झरीमध्ये चार पैकी दोन, दारव्हा आठ पैकी एक, दिग्रस पाच पैकी तीन, मारेगाव नऊ पैकी तीन, पुसद १२ पैकी दोन, आर्णी सात पैकी तीन, राळेगाव आठ पैकी पाच, घाटंजी चार पैकी दोन, वणी १८ पैकी नऊ तर यवतमाळ तालुक्यातील १६ पैकी १३ जागांचा समावेश आहे.काँग्रेसला १८, राष्टÑवादीला १२, शिवसेना १३ तर सहा जागांवर अपक्ष उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले.दिग्रस, मारेगाव, राळेगाव, वणी या तालुक्यांमध्ये अपक्षांना लॉटरी लागली.राष्टÑवादी काँग्रेसची घौडदौड केवळ पुसद विभागात पहायला मिळाली.शिवसेनेने दारव्हा, दिग्रस, वणी या तालुक्यांमध्ये सरपंचाच्या अधिक जागा निवडून आणल्या.राळेगावसह अनेक ठिकाणी सरपंच पदावर भाजपा व अन्य पक्ष दावा करीत आहेत. त्यामुळे आकड्यांचा खेळ दिसतो आहे.नेर तालुक्यातील सातेफळ ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. मात्र यावेळी काँग्रेसने ती सेनेकडून खेचून आणली. त्याच वेळी भाजपानेही या जागेवर आपला दावा सांगितला आहे.सरपंच पदाच्या ९३ पैकी ४४ जागांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्ह्यात भाजपाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पाहता ग्रामीण जनता आजही भाजपावर खूश असल्याचा हा पुरावा आहे.- राजेंद्र डांगेजिल्हाध्यक्ष, भाजपा.