शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

जिल्हा परिषदेवर काँग्रेस-भाजपा-राकाँची सत्ता

By admin | Updated: March 22, 2017 00:08 IST

जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी व अपक्षाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली.

शिवसेना विरोधी बाकावर : अध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी आडे, उपाध्यक्षपद भाजपाकडे यवतमाळ : जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी व अपक्षाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी अनिल आडे तर उपाध्यक्षपदी भाजपाचे श्याम जयस्वाल विजयी झाले. त्यांना प्रत्येकी ४१ मते मिळाली. २० मते मिळाल्याने शिवसेनेच्या कालिंदा पवार व विजय राठोड हे अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. ६१ सदस्यीय यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक २० जागा शिवसेनेने पटकाविल्या. भाजपा १८, काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी ११ तर अपक्षाकडे एक जागा आहे. सत्तेचे गणित बसविण्यासाठी किमान ३१ जागांची गरज होती. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या मदतीने हा जादुई आकडा गाठण्याचे निश्चित केले होते. तशी घोषणाही शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोमवारी सायंकाळी संयुक्त पत्रपरिषदेत केली होती. परंतु मंगळवारी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने शिवसेनेची साथ सोडून अचानक कमळ हाती घेतल्याने सेनेचे सत्तेचे गणित फिस्कटले. शिवसेनेला सत्तेचा लाभ मिळू नये हे एकमेव टार्गेट भाजपाने ठेवले होते. त्यासाठी भाजपाने चक्क ११ सदस्य असलेल्या काँग्रेसला अध्यक्षपदाची आॅफर दिली. सोबतीला राष्ट्रवादीलाही घेतले आणि सत्ता स्थापन केली. जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी गेल्या दोन दिवसांपासून राजकीय खलबते सुरू होती. काल रात्रीपासून अचानक वेगवान हालचाली झाल्या. पहाटेपर्यंत प्रमुख चारही राजकीय पक्षांमध्ये चर्चेच्या अनेक फेरी झाल्या. प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षातील काही उमेदवार फोडल्याचा दावा करीत होता. ३० सदस्य सोबत पर्यटनाला गेल्याने धोका होणार नाही, असे मानून शिवसेना काहीशी निश्चिंत होती. मात्र बेसावध राहण्याचा फटका सेनेला बसला. सेनेसोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीला आपल्याकडे खेचून आणण्यात भाजपाने यश मिळविले. सेनेकडून राष्ट्रवादीवर आता दगाफटका केल्याचा आरोप होत आहे. हा दगाफटका करुनही राष्ट्रवादीला मात्र एखाद दोन सभापतीपदावरच समाधान मानावे लागणार आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे ३० सदस्य चार दिवसांपूर्वीच हैदराबादला गेले होते. तेथून ते मंगळवारी परतले. नामांकन दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शिवसेनेसोबत जेवण घेतले. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सेनेची साथ सोडली. मंगळवारी ११ ते १ ही नामांकनाची वेळ होती. अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या माधुरी आडे व शिवसेनेच्या कालिंदा पवार यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसकडून डमी उमेदवार म्हणून वैशाली राठोड यांनीही नामांकन दाखल केले होते. उपाध्यक्ष पदासाठी भाजपासोबतच शिवसेनेचे विजय राठोड यांनी नामांकन दाखल केले. जिल्हा परिषद सभागृहामध्ये दुपारी ३ वाजता हात उंचावून मतदान झाले. त्यात काँग्रेस व भाजपाच्या अनुक्रमे अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या उमेदवाराला प्रत्येकी ४१ तर सेनेच्या उमेदवारांना २० मते मिळाली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी आडे विजयी झाल्या. भाजपाचा उपाध्यक्ष पदाचा उमेदवारही ४१ मते घेऊन निवडून आला. सभागृहाबाहेर भाजपा व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने उभे ठाकले होते. त्यांनी तेथे प्रचंड घोषणाबाजी केली. ते पाहता राडा होतो की काय अशी हूूरहूर उपस्थितांमध्ये ऐकायला मिळत होती. परंतु नंतर तणाव निवळला. अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच पहायला मिळाली. अखेर त्यात माजी मंत्री अ‍ॅड. मोघे यांनी यश मिळविले. वणी विभागातून खंडाळकरांचे नाव काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार व शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांनी पक्षात अनुभवी अरुणा खंडाळकर यांचे नाव रेटले. त्या अनेक वर्ष पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातही वारसा आहे. माणिकरावांचा आग्रह स्वाती येंडेसाठी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी आर्णी तालुक्यातून निवडून आलेल्या स्वाती येंडे यांचे नाव अध्यक्षपदासाठी रेटले होते. अखेरपर्यंत त्यांनी या नावाचाच आग्रह धरला. या निमित्ताने मराठा समाजाला खूश करुन लालदिवा आर्णी मतदारसंघात नेल्यास अ‍ॅड. मोघे आणि काँग्रेसला त्याचा निवडणुकीत राजकीय फायदा होईल, असे गणित मांडण्यात आले होते. काँग्रेस निष्ठावंतांचा वेगळा सूर भाजपाशी हातमिळवणी केल्याने काँग्रेसमधील निष्ठावंतांमध्ये मात्र नाराजी दिसून येते. काँग्रेसने जातीयवादी पक्षाशी युती करून आपल्या धर्मनिरपेक्ष भूमिकेशी फारकत घेतल्याचा निष्ठावंतांचा सूर आहे. विरोधी पक्षात बसावे लागले असते तरी चालले असते, परंतु भाजपाशी युती करायला नको होती, आता आम्ही मतदारांमध्ये कोणत्या तोंडाने जावे, असा काँग्रेसमधील या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सवाल आहे. (जिल्हा प्रतिनिधी) ‘काँग्रेसमुक्त भारता’च्या भाजपाच्या अजेंड्याला हरताळ ४केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासूनच ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा दिला आहे. तोच भाजपाचा राष्ट्रीय अजेंडा आहे. विविध राज्यांच्या निवडणुकीतही त्या दृष्टीने राजकीय प्रयत्न भाजपाकडून केले जात आहे. काँग्रेसला कायम सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असताना यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत खुद्द भाजपानेच ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या