शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नागरिक व वनअधिकाऱ्यांत संघर्ष वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:39 IST

नरभक्षक वाघिणीला ठार मारा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत असली तरी वन्यजीवप्रेमींचा मात्र याला तीव्र विरोध आहे. नेमका याच विषयावरून नागरिक व वनअधिकाºयांत संघर्ष वाढला आहे. अज्ूुन किती जणांचे बळी गेल्यानंतर नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त करणार, असा संतप्त सवाल आता कमालीच्या दहशतीखाली असलेले भयग्रस्त नागरिक विचारत आहेत.

ठळक मुद्देवाघिणीवरून मतभेद : प्रधान मुख्य वनसंरक्षक पांढरकवड्यात दाखल, गावांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : नरभक्षक वाघिणीला ठार मारा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत असली तरी वन्यजीवप्रेमींचा मात्र याला तीव्र विरोध आहे. नेमका याच विषयावरून नागरिक व वनअधिकाºयांत संघर्ष वाढला आहे. अज्ूुन किती जणांचे बळी गेल्यानंतर नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त करणार, असा संतप्त सवाल आता कमालीच्या दहशतीखाली असलेले भयग्रस्त नागरिक विचारत आहेत.हा संघर्ष लक्षात घेता, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशावरूनं प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.मिश्रा हे शनिवारी सायंकाळी पांढरकवडात दाखल झाले असून त्यामुळे आता वाघिणीला जीवंत पकडण्याची अथवा ती बेशुद्ध न झाल्यास तिला ठार मारण्याची मोहिम वेगवान होण्याची चिन्हे आहेत. वन्यजीवप्रेमींसाठी वाघांचा जीव वाचविणे महत्त्वाचे असले तरी माणसांचा जीव वाचविणे महत्त्वाचे नाही काय, असा संतप्त प्रश्न विचारून दहशतीखाली असलेले शेतकरी, शेतमजूर वनअधिकाºयांना भांडावून सोडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नरभक्षी वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा किंवा ठार मारण्याचा निर्णय ४ सप्टेंबरला दिला. त्यामुळे वनखात्याने शार्पशुटर शहाफज अली खान याला आंध्रप्रदेशातून बोलाविले होते. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने मोठा लवाजमा जंगलात लावला होता. वन्यजीवप्रेमींच्या विरोधाची दखल घेऊन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री तथा वन्यजीवप्रेमी मनेका गांधी यांनी शार्प शुटर नवाबला जंगलातून परत पाठविण्याचे आदेश दिले. परिणामी मुक्कामाला असलेल्या नवाबने येथून परतीचा मार्ग धरला. या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.मिश्रा यांचे मुख्यालय पांढरकवडा करून त्यांनी तेथेच राहून वाघीणीचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा हे शनिवारीच सायंकाळी पांढरकवडा येथे पोहोचले असून ते वाघिणीच्या वास्तव्याचे ठिकाण पाहण्याकरिता जंगलात गेल्याची माहिती सुत्राने दिली. त्याचे मुख्यालय उमरी राहणार असल्याची माहिती मिळाली.कामासाठी भयग्रस्तशेतमजुरांचे स्थलांतरदरम्यान, ज्या गावातील शेतकरी-शेतमजुरांचे या नरभक्षक वाघीणीने बळी घेतला त्या बोराटी, खैरगाव, झोटींगधरा, तेजनी, जिरामिरा, सराटी, सखी, जिरा, विहिरगाव, लोणी, वेडशी या गावातील व आजुबाजूच्या परिसरातील गावात या नरभक्षक वाघीणीची एवढी दहशत आहे की, शेतात कोणीही जायला तयार नाही. शेतीची कामे पूर्णत: ठप्प पडली आहे. जीरा, मिरा, वाठोडा, तेजनी, सराटी, बोराटी या भागातील शेतकरी, शेतमजूर शेतातील कामे सोडून करंजी, रूंझा, मोहदा, राळेगाव येथे हमालीची व इतर मजुरीची कामे करताना दिसत आहे.वाघापेक्षा माणसाचा जीव स्वस्त आहे का? -वासुदेव आत्रामनरभक्षी वाघीण लागोपाठ माणसे मारत आहे. आतापर्यंत या वाघिणीने १४ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेतल्यानंतरही या वाघिणीचा बंदोबस्त होत नाही. सरकार याचा बंदोबस्त करत नाही. वाघापेक्षा माणसाचा जीव स्वस्त आहे का, असा संतप्त सवाल वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शंकर आत्राम यांचा भाऊ वासुदेव आत्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.लोकांचा जीव जात असेल तर वन्यप्राणीही सुरक्षित नाहीतवन्यप्राण्यांचे वन्यप्राण्यांकडूनच जर जीव जात असतील तर वन्यप्राणीदेखिल सुरक्षीत राहणार नाही. त्यामुळे नरभक्षक वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रीया वन्यजीवप्रेमी प्रा.रमजान विराणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पोलीस आणि वनखात्याकडे एक्सपर्ट शार्पशुटर असताना वादग्रस्त शार्पशुटरला पाठविण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. मनुष्य-वन्यप्राणी संघर्ष वाढू नये, यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले.