शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक व वनअधिकाऱ्यांत संघर्ष वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:39 IST

नरभक्षक वाघिणीला ठार मारा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत असली तरी वन्यजीवप्रेमींचा मात्र याला तीव्र विरोध आहे. नेमका याच विषयावरून नागरिक व वनअधिकाºयांत संघर्ष वाढला आहे. अज्ूुन किती जणांचे बळी गेल्यानंतर नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त करणार, असा संतप्त सवाल आता कमालीच्या दहशतीखाली असलेले भयग्रस्त नागरिक विचारत आहेत.

ठळक मुद्देवाघिणीवरून मतभेद : प्रधान मुख्य वनसंरक्षक पांढरकवड्यात दाखल, गावांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : नरभक्षक वाघिणीला ठार मारा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत असली तरी वन्यजीवप्रेमींचा मात्र याला तीव्र विरोध आहे. नेमका याच विषयावरून नागरिक व वनअधिकाºयांत संघर्ष वाढला आहे. अज्ूुन किती जणांचे बळी गेल्यानंतर नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त करणार, असा संतप्त सवाल आता कमालीच्या दहशतीखाली असलेले भयग्रस्त नागरिक विचारत आहेत.हा संघर्ष लक्षात घेता, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशावरूनं प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.मिश्रा हे शनिवारी सायंकाळी पांढरकवडात दाखल झाले असून त्यामुळे आता वाघिणीला जीवंत पकडण्याची अथवा ती बेशुद्ध न झाल्यास तिला ठार मारण्याची मोहिम वेगवान होण्याची चिन्हे आहेत. वन्यजीवप्रेमींसाठी वाघांचा जीव वाचविणे महत्त्वाचे असले तरी माणसांचा जीव वाचविणे महत्त्वाचे नाही काय, असा संतप्त प्रश्न विचारून दहशतीखाली असलेले शेतकरी, शेतमजूर वनअधिकाºयांना भांडावून सोडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नरभक्षी वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा किंवा ठार मारण्याचा निर्णय ४ सप्टेंबरला दिला. त्यामुळे वनखात्याने शार्पशुटर शहाफज अली खान याला आंध्रप्रदेशातून बोलाविले होते. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने मोठा लवाजमा जंगलात लावला होता. वन्यजीवप्रेमींच्या विरोधाची दखल घेऊन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री तथा वन्यजीवप्रेमी मनेका गांधी यांनी शार्प शुटर नवाबला जंगलातून परत पाठविण्याचे आदेश दिले. परिणामी मुक्कामाला असलेल्या नवाबने येथून परतीचा मार्ग धरला. या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.मिश्रा यांचे मुख्यालय पांढरकवडा करून त्यांनी तेथेच राहून वाघीणीचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा हे शनिवारीच सायंकाळी पांढरकवडा येथे पोहोचले असून ते वाघिणीच्या वास्तव्याचे ठिकाण पाहण्याकरिता जंगलात गेल्याची माहिती सुत्राने दिली. त्याचे मुख्यालय उमरी राहणार असल्याची माहिती मिळाली.कामासाठी भयग्रस्तशेतमजुरांचे स्थलांतरदरम्यान, ज्या गावातील शेतकरी-शेतमजुरांचे या नरभक्षक वाघीणीने बळी घेतला त्या बोराटी, खैरगाव, झोटींगधरा, तेजनी, जिरामिरा, सराटी, सखी, जिरा, विहिरगाव, लोणी, वेडशी या गावातील व आजुबाजूच्या परिसरातील गावात या नरभक्षक वाघीणीची एवढी दहशत आहे की, शेतात कोणीही जायला तयार नाही. शेतीची कामे पूर्णत: ठप्प पडली आहे. जीरा, मिरा, वाठोडा, तेजनी, सराटी, बोराटी या भागातील शेतकरी, शेतमजूर शेतातील कामे सोडून करंजी, रूंझा, मोहदा, राळेगाव येथे हमालीची व इतर मजुरीची कामे करताना दिसत आहे.वाघापेक्षा माणसाचा जीव स्वस्त आहे का? -वासुदेव आत्रामनरभक्षी वाघीण लागोपाठ माणसे मारत आहे. आतापर्यंत या वाघिणीने १४ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेतल्यानंतरही या वाघिणीचा बंदोबस्त होत नाही. सरकार याचा बंदोबस्त करत नाही. वाघापेक्षा माणसाचा जीव स्वस्त आहे का, असा संतप्त सवाल वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शंकर आत्राम यांचा भाऊ वासुदेव आत्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.लोकांचा जीव जात असेल तर वन्यप्राणीही सुरक्षित नाहीतवन्यप्राण्यांचे वन्यप्राण्यांकडूनच जर जीव जात असतील तर वन्यप्राणीदेखिल सुरक्षीत राहणार नाही. त्यामुळे नरभक्षक वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रीया वन्यजीवप्रेमी प्रा.रमजान विराणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पोलीस आणि वनखात्याकडे एक्सपर्ट शार्पशुटर असताना वादग्रस्त शार्पशुटरला पाठविण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. मनुष्य-वन्यप्राणी संघर्ष वाढू नये, यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले.