शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

डेंग्यू आजार रोखण्यासाठी घरोघरी स्वच्छता मोहीम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डासांची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे, शौचालयाच्या व्हेंट पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, सांडपाणी वाहते करणे, जुने टायर, प्लॅस्टिक इ. मध्ये पाणी साचू न देणे, वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवणे, आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाण्याचे भांडे स्वच्छ धुवून किमान दोन तास उन्हात पूर्णपणे वाळवून कोरडा दिवस पाळणे आदी उपाययोजना करण्यास सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ  :  जिल्ह्यात डेंग्यूचा आजार वाढू नये यासाठी जिल्हा परिषद व नगर परिषद यांनी सर्व नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी, नागरिकांनी कोरडा दिवस पाळून घराच्या परिसरातील भंगार साहित्याची विल्हेवाट लावून पाणी साचणार नाही यासाठी उपायोजना करून डेंग्यू व मलेरियाच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी आमोल येडगे यांनी केले.शुक्रवारी विशेष स्वच्छता अभियानाची सुरूवात यवतमाळ शहरातील जय-विजय चौक व संभाजीनगर परिसरातून करण्यात आली. याठिकाणी साफसफाई मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेवून जिल्हाधिकारी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. नगराध्यक्ष कांचन चौधरी, मुख्याधिकारी माधुरी मडावी तसेच आरोग्य सभापती साधना काळे, नगरसेवक सुजित राय, संगीता राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विजय आकोलकर आदी सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डासांची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे, शौचालयाच्या व्हेंट पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, सांडपाणी वाहते करणे, जुने टायर, प्लॅस्टिक इ. मध्ये पाणी साचू न देणे, वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवणे, आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाण्याचे भांडे स्वच्छ धुवून किमान दोन तास उन्हात पूर्णपणे वाळवून कोरडा दिवस पाळणे आदी उपाययोजना करण्यास सांगितले. ही साफसफाई केवळ एक दिवसासाठी न करता किमान सात दिवस  करावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियमितपणे स्वच्छता मोहिमेला भेटी देणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.  नगर परिषदेतील डॉ. विजय अग्रवाल, तालुका आरोग्य अधिकारी क्रांतीकुमार मावडीकर, डॉ. तनवीर शेख, प्रशांत पाटील, टी. व्ही. कुळकर्णी, धीरज पिसे, रवी रामेकर, सुनील वंजारी, मुन्ना शुक्ला, मोहन दहेकर, संतोष गजभिये आदी यावेळी मोहिमेदरम्यान उपस्थित होते. 

मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे आवाहन - यवतमाळ शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी प्रत्येक दुकानदार, तेथे काम करणारे कर्मचारी व अन्य प्रत्येक नागरिकाला कोरोना लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच डेंग्यू आजाराचा फैलाव रोखण्यासाठी त्यांनी उपाययोजना सूचविल्या आहे. डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डासांची उत्पत्ती साठलेल्या पाण्यातून होते. त्यामुळे घरातील अडगळीत ठेवलेले सामान, फ्रीजचा टफ, परिसरातील नाल्या स्वच्छ ठेवण्याची सूचना मडावी यांनी केली आहे. घरातील खिडक्यांना, फीश टॅंकला जाळ्या बसवाव्या, घराचा परिसर श्रमदानातून स्वच्छ ठेवावा, असे आवाहन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले.  

 

टॅग्स :dengueडेंग्यूcollectorजिल्हाधिकारी