शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक

By admin | Updated: November 15, 2014 02:08 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि अपुऱ्या पडलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे.

संजय भगत महागाव निसर्गाचा लहरीपणा आणि अपुऱ्या पडलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. सोयाबीनच्या उत्पन्नात ९० टक्के तर कपाशीच्या उत्पन्नात ६० टक्के तूट येण्याची शक्यता आहे. यामुळे सधन आणि मध्यम शेतकरीही धास्तावले आहे. महागाव तालुक्यावर गत काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आहे. गतवर्षी ओल्या दुष्काळाने संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त झाला होता. यावर्षीच्या खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांना मोठी आशा होती. मात्र अपुऱ्या पावसाने निराशा केली. ऐन पेरणीच्या वेळेसच पावसाने दडी मारली. दुबार, तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले. त्यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांनी पेरणी केली तर पीक बहरात असताना किडींनी हल्ला केला. सोयाबीनची तर पुरती वाट लागली. ज्या शेतकऱ्यांना २०० क्ंिवटल सोयाबीन व्हायचे त्यांना केवळ २० क्ंिवटलच उत्पादन झाले. सोयाबीनच्या एका बॅगला ८० किलोही उत्पादन येत नव्हते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकात जनावरे सोडली.कपाशीच्या उत्पन्नातही कमालीची घट होत आहे. बोंड परिपक्व होऊन फुटण्याच्या काळात थंडी बेपत्ता आहे. यापूर्वी अपुऱ्या पावसाने पऱ्हाटीची वाढ झाली नाही. पात्या, फुले गळून गेली. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात जवळपास ६० टक्के घट येत आहे. दुष्काळ सदृश परिस्थिती असून कृषी विभागानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात येणारी घट चांगलीच चिंतनीय झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातच काही नाही तर बाजारात येणार कोठून अशी अवस्था झाली आहे. परिणामी रोज चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. शेतातील कोणतीच अवजारे सुरक्षित नाही. रबीचे पीक घेतो म्हटले तरी विजेची समस्या कायम आहे. धरणाचे पाणी अजूनही शेतीला मिळाले नाही. चहुबाजूंनी कोंडी होत आहे. अशा स्थितीत तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.