शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक

By admin | Updated: November 15, 2014 02:08 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि अपुऱ्या पडलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे.

संजय भगत महागाव निसर्गाचा लहरीपणा आणि अपुऱ्या पडलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. सोयाबीनच्या उत्पन्नात ९० टक्के तर कपाशीच्या उत्पन्नात ६० टक्के तूट येण्याची शक्यता आहे. यामुळे सधन आणि मध्यम शेतकरीही धास्तावले आहे. महागाव तालुक्यावर गत काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आहे. गतवर्षी ओल्या दुष्काळाने संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त झाला होता. यावर्षीच्या खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांना मोठी आशा होती. मात्र अपुऱ्या पावसाने निराशा केली. ऐन पेरणीच्या वेळेसच पावसाने दडी मारली. दुबार, तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले. त्यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांनी पेरणी केली तर पीक बहरात असताना किडींनी हल्ला केला. सोयाबीनची तर पुरती वाट लागली. ज्या शेतकऱ्यांना २०० क्ंिवटल सोयाबीन व्हायचे त्यांना केवळ २० क्ंिवटलच उत्पादन झाले. सोयाबीनच्या एका बॅगला ८० किलोही उत्पादन येत नव्हते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकात जनावरे सोडली.कपाशीच्या उत्पन्नातही कमालीची घट होत आहे. बोंड परिपक्व होऊन फुटण्याच्या काळात थंडी बेपत्ता आहे. यापूर्वी अपुऱ्या पावसाने पऱ्हाटीची वाढ झाली नाही. पात्या, फुले गळून गेली. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात जवळपास ६० टक्के घट येत आहे. दुष्काळ सदृश परिस्थिती असून कृषी विभागानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात येणारी घट चांगलीच चिंतनीय झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातच काही नाही तर बाजारात येणार कोठून अशी अवस्था झाली आहे. परिणामी रोज चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. शेतातील कोणतीच अवजारे सुरक्षित नाही. रबीचे पीक घेतो म्हटले तरी विजेची समस्या कायम आहे. धरणाचे पाणी अजूनही शेतीला मिळाले नाही. चहुबाजूंनी कोंडी होत आहे. अशा स्थितीत तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.