शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 20:48 IST

साहित्य संमेलनांतून लोकशिक्षण, लोकप्रबोधन आणि लोकसंस्कार होतात. तेच या संमेलनातही झाले, असे प्रतिपादन केंद्रीय सडक परिवहन व नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देविचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही मोठी समस्या; नितीन गडकरी;

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : विचार भिन्न असू शकतात. विचारभिन्नता ही समस्याच नाही. त्यापेक्षा विचारशून्यता ही मोठी समस्या आहे. आपल्या देश ज्या संरचनेवर उभा आहे, ज्या विचारांवर उभा आहे, ते अत्यंत दूरगामी परिणाम देणारे आहे. महाराष्ट्राची संस्कृती, मराठी साहित्य, महाराष्ट्राचे मराठीपण किती मोठे आहे, हे महाराष्ट्राबाहेर गेल्यावर कळते. साहित्य संमेलनांतून लोकशिक्षण, लोकप्रबोधन आणि लोकसंस्कार होतात. तेच या संमेलनातही झाले, असे प्रतिपादन केंद्रीय सडक परिवहन व नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी येथे समारोप झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ना. गडकरी बोलत होते. ते म्हणाले, सामाजिक जागृती करण्याचे काम साहित्य करीत असते. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा हे सर्व खोटं आहे. जीवन आनंदाने जगण्यासाठी विचारांची प्रेरणा लागते. विचारांतूनच व्यक्तिमत्त्व परिपक्व आणि भारदस्त होते. भारतीय समाजाला अशी परिपक्वता, प्रगल्भता दिली ती साहित्यानेच.चांगूलपणावर कुठेही ‘पेटेंट’ होत नाही. चांगूलपणाची ‘कॉपी’ करणे वाईट नाही. कारण चांगूलपणावर कोणाचीही ‘मोनोपली’ नाही. ज्यांना आपण फार मोठे समजतो, त्यांच्या जवळ गेल्यावर ते फार छोटे असल्यचे कळते. तर ज्यांना आपण लहान समजतो, त्यांच्या जवळ गेल्यावर कळते की ते किती मोठे आहे. वैशालीताई येडे यांना उद्घाटक म्हणून बोलावून आयोजकांनी महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी भलेही पुस्तक लिहिले नसेल. पण स्वत:च्या संघर्षातून जीवन कसे जगावे याचे उदाहरण त्यांनी आपल्यापुढे ठेवले आहे, अशा शब्दात ना. नितीन गडकरी यांनी आयोजकांना दाद दिली.

- पटलं तरच मत द्याना. गडकरी म्हणाले, राजकारणाचा अर्थ सत्ताकारण नाही. राष्ट्रनीती, लोकनीती हा राजकारणाचा भावार्थ समजावून सांगण्याची गरज आहे. म्हणूनच मी नेहमी लोकांना म्हणत असतो, पटलं तरच मला मत द्या, नाही पटलं तर नका देऊ . राजकारण्यांची साहित्य किंवा इतर क्षेत्रात हस्तक्षेप करू नये. पण म्हणून त्यांचे संबंधच असू नये हे बरोबर नाही. साहित्यिक आणि राजकारणी यांच्यात सहकार्य व संवाद असला पाहिजे. जातीवाद, धर्मांधता या आजच्या समाजाच्या समस्या आहेत. पण माणूस केवळ त्याच्या गुणाने श्रेष्ठ ठरतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. सत्ताधाऱ्यांना वळण लावण्यासाठी सामाजिक दंडशक्ती निर्माण झाली पाहिजे. ही शक्ती साहित्यिक व पत्रकारांतूनच निर्माण होईल.

संमेलनांमुळे मराठीचे वैभव वाढते- अहीरकेंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, संमेलनांमुळे मराठीचे वैभव वाढत आहे. शंभरीकडे निघालेले यवतमाळचे ९२ वे संमेलन साहित्य जगतासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या संमेलनाला यवतमाळकरांनी व सर्वच ठिकाणांहून आलेल्या रसिकांनी जी हजेरी लावली, त्यावरून साहित्याचे महत्त्व लक्षात येते.

रसिकांचा आत्मविश्वास वाढला- कुलगुरूसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणाले, या संमेलनाच्या यशस्वीतेमुळे विदर्भातील रसिकांचा आत्मविश्वास वाढला आहे. भारताचे संविधान अमलात येण्यापूर्वीच या देशाला राष्ट्रीय भाषा मिळाली. यावरुन मानवी जीवनातील भाषेचे महत्त्व लक्षात येते. १४० वर्षांपूर्वी पहिले साहित्य संमेलन झाले होते. पण १४० वर्षानंतर मराठीचा व्यवहारात वापर करा म्हणून शासनाला परिपत्रक काढावे लागते, हे दुर्दैव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार यांनी आयोजनासाठी हातभार लावणाºयांचे यावेळी आभार मानले. विद्या देवधर यांनी अध्यक्ष या नात्याने साहित्य महामंडळाची बाजू मांडली. प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी केले. तर सूत्रसंचालन कार्यवाह प्रा. घन:शाम दरणे यांनी केले.प्रतिकूलतेने वाढविला प्रतिसाद : ढेरेसंमेलनातील भरगच्च उपस्थितीने माणसांचे अजूनही साहित्यावर प्रेम आहे, हे सिद्ध झाले. संमेलनावर बहिष्कारासारखे संकट आले होते. पण आपण एकत्र येण्याचा, संवादाचा हट्ट सोडला नाही. प्रतिकूलतेमुळेच या संमेलनाला अधिक प्रतिसाद मिळाला, अशी भावना यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली. पैसे गोळा करणे सोपे असते, पण माणसं गोळा करणे महाकठीण. डॉ. रमाकांत कोलते या साध्या शिक्षकाने मात्र ही कामगिरी यशस्वी करून दाखविली. ग्रंथालयांच्या समस्या शासनाने तातडीने सोडवाव्या, अशी मागणीही संमेलनाध्यक्षांनी यावेळी नोंदविली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन