शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

ग्रामपंचायतींमधील संगणक संच धूळ खात

By admin | Updated: June 25, 2014 00:42 IST

ग्रामपंचायतींचे कामकाज गतिमान व्हावे, पेपरलेस कारभार व्हावा व ग्रामीण भागातील जनतेला त्वरित सेवा मिळावी या हेतूने ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायती कोट्यवधी रुपये खर्चून संगणकीय करण्यात आल्या.

नेर : ग्रामपंचायतींचे कामकाज गतिमान व्हावे, पेपरलेस कारभार व्हावा व ग्रामीण भागातील जनतेला त्वरित सेवा मिळावी या हेतूने ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायती कोट्यवधी रुपये खर्चून संगणकीय करण्यात आल्या. याठिकाणी संगणक परिचालकसुद्धा नियुक्त करण्यात आले. असे असले तरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीमधील संगणक सध्या धूळ खात असल्याचे दिसून येते.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू आहे. यामुळे ग्रामपंचायतींमधील संगणकांचा कोणताही उपयोग जनतेसाठी होत असल्याचे दिसून येत नाही. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून ही महत्त्वाकांक्षी योजना ग्रामीण भागात पोहोचविली आहे. परंतु भारनियमनामुळे या योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. भारनियमनाचे कारण समोर करून संगणक परिचालकसुद्धा दांड्या मारतात. त्यामुळे ग्रामपंचायतचे दाखले हे हातानेच लिहून देण्यात येत आहे. येथील संगणक आॅपरेटरची नियुक्त्या या संबंधित राजकीय व्यक्तींच्या दबावांतर्गत झाल्या असल्यामुळे संगणकचालकांनाही पुरेसे ज्ञान नाही. अनेक संगणक चालक हे बाहेरगावचे आहेत. त्यामुळे ते आठवड्यातून दोन ते तीनच दिवस मुख्यालयी असतात. ग्रामसेवकच ग्रामपंचायतमध्ये राहात नसल्याने संगणकचालकांनाही विचारणारे येथे कोणी नाही. शासकीय योजना या गावागावात पोहोचाव्या, लोकांना त्वरित सेवा मिळावी या हेतूने राबविण्यात आलेल्या या योजनेत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणक व संगणक चालकांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी या कामी त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. परंतु यामध्येही राजकारण शिरल्याने प्रामाणिक लोकांची भरती झाली नाही. त्यामुळे सध्या तरी ग्रामपंचायतींमधील संगणक हे शोभेची वस्तू बनली आहे. या संगणकांचा सर्वसामान्य ग्रामीण जनतेला कोणताही फायदा होत नसून शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची भावना सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. (तालुका प्रतिनिधी)