शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

ग्रामपंचायतींमधील संगणक संच धूळ खात

By admin | Updated: June 25, 2014 00:42 IST

ग्रामपंचायतींचे कामकाज गतिमान व्हावे, पेपरलेस कारभार व्हावा व ग्रामीण भागातील जनतेला त्वरित सेवा मिळावी या हेतूने ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायती कोट्यवधी रुपये खर्चून संगणकीय करण्यात आल्या.

नेर : ग्रामपंचायतींचे कामकाज गतिमान व्हावे, पेपरलेस कारभार व्हावा व ग्रामीण भागातील जनतेला त्वरित सेवा मिळावी या हेतूने ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायती कोट्यवधी रुपये खर्चून संगणकीय करण्यात आल्या. याठिकाणी संगणक परिचालकसुद्धा नियुक्त करण्यात आले. असे असले तरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीमधील संगणक सध्या धूळ खात असल्याचे दिसून येते.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू आहे. यामुळे ग्रामपंचायतींमधील संगणकांचा कोणताही उपयोग जनतेसाठी होत असल्याचे दिसून येत नाही. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून ही महत्त्वाकांक्षी योजना ग्रामीण भागात पोहोचविली आहे. परंतु भारनियमनामुळे या योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. भारनियमनाचे कारण समोर करून संगणक परिचालकसुद्धा दांड्या मारतात. त्यामुळे ग्रामपंचायतचे दाखले हे हातानेच लिहून देण्यात येत आहे. येथील संगणक आॅपरेटरची नियुक्त्या या संबंधित राजकीय व्यक्तींच्या दबावांतर्गत झाल्या असल्यामुळे संगणकचालकांनाही पुरेसे ज्ञान नाही. अनेक संगणक चालक हे बाहेरगावचे आहेत. त्यामुळे ते आठवड्यातून दोन ते तीनच दिवस मुख्यालयी असतात. ग्रामसेवकच ग्रामपंचायतमध्ये राहात नसल्याने संगणकचालकांनाही विचारणारे येथे कोणी नाही. शासकीय योजना या गावागावात पोहोचाव्या, लोकांना त्वरित सेवा मिळावी या हेतूने राबविण्यात आलेल्या या योजनेत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणक व संगणक चालकांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी या कामी त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. परंतु यामध्येही राजकारण शिरल्याने प्रामाणिक लोकांची भरती झाली नाही. त्यामुळे सध्या तरी ग्रामपंचायतींमधील संगणक हे शोभेची वस्तू बनली आहे. या संगणकांचा सर्वसामान्य ग्रामीण जनतेला कोणताही फायदा होत नसून शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची भावना सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. (तालुका प्रतिनिधी)